शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वळवाच्या तडाख्याने फुटलेल्या द्राक्षांच्या घडावर मधमाशांचा हल्ला; हाताशी आलेला घास हिरावला

By हरी मोकाशे | Updated: April 8, 2023 17:26 IST

वादळी वाऱ्यासह पाऊस; पावसामुळे द्राक्षाचे दरही पडले...

औराद शहाजानी / वलांडी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी तसेच देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात शुक्रवारी रात्री जोरदार वळवाचा पाऊस झाला. त्यामुळे रबी ज्वारी, करडीसह भाजीपाला, द्राक्षे आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. निर्यातक्षम द्राक्षे मातीमोल झाले आहेत. द्राक्षांचे घड फुटल्याने त्यावर मधमाशा हल्ला करुन फस्त करीत आहेत.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह तगरखेडा, सावरी, माने जवळगा, हलगरा, म्हसाेबावाडी, संगारेड्डीवाडी, हालसी, काेयाजीवाडी, शेळगी, बाेरसुरी, देवणी तालुक्यातील वलांडी, हिसामनगर, जवळगा, हेळंब या भागात शुक्रवार व शनिवारी जाेरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडटात पाऊस झाला. त्यात रब्बी ज्वारीसह करडी, भाजीपाला, फळबागाचे मोठे नुकसान झाले.

तगरखेडा, सावरी, म्हसाेबावाडी येथील गोविंद बिरादार, गोपाळ पाटील, माणिक अंचुळे आदींच्या शेतातील द्राक्षाच्या बागेचे नुकसान झाले. जवळपास १५ एकरवरील द्राक्षे हे निर्यातीसाठी होते. अवघ्या दोन दिवसांत तोडणी करण्याचे नियोजन होते. मात्र, वादळी वारे आणि पावसाने द्राक्षांच्या घडांना मार लागला. त्यामुळे द्राक्षाची नासाडी झाली. दरम्यान, आद्रता वाढल्याने द्राक्षांची साल कमजोर होऊन गाेडवा कमी झाला. त्यामुळे द्राक्षे फुटली आहेत. आता त्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे.

औराद येथील शेतकरी सत्यवान मुळे, संताेष भंडारे यांच्या शेतातील शेवग्याच्या शेंगांची फुल गळती होऊन जमिनीवर सडा पडला आहे. तसेच अमाेल ढाेरसिंगे, भागवत उगिले, प्रदीप ढाेरसिंगे, उमाकांत भंडारे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २४ तासात ६० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

पावसामुळे द्राक्षाचे दरही पडले...वर्षभर लाखोंचा खर्च करून बाग मुलाप्रमाणे जपली. तोडणीवेळी अवकाळी पाऊस होऊन हाता- ताेडांशी आलेला घास हिरावला. माझ्या तीन एकर बागेत २० टन द्राक्षे विक्रीसाठी तयार होते. एक किलाे द्राक्षासाठी २५ रुपये खर्च झाला आहे. सततच्या पावसामुळे पदरात १५ ते २० रुपये प्रति किलो असा दर पडत आहे. शिवाय, निम्मी द्राक्षे खराब झाली असून एका घडाला १० ते १५ मधमाशा बसून रस शाेषण करीत आहेत.- गोविंदराव बिराजदार, शेतकरी.

वीज पडून सात शेळ्या दगावल्या...देवणी तालुक्यातील जवळगा येथील राम बालुरे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडली. त्यात दोन शेळ्या दगावल्या. तसेच हिसामनगर येथील भरत वाघमारे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडली. त्यात एका शेळीसह चार पिल्ले दगावले. त्याचबरोबर हिसामनगर येथील दोन घरांवरील पत्रे उडून गेल्याने धान्य भिजले.

नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी...वलांडीसह हिसामनगर, जवळगा, हेळंब परिसरात शुक्रवारी मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हिसामनगर- हेळंब रस्त्यावरील पुलाचा कठडा पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. बाळासाहेब डिगोळे यांच्या शेतातील शेडवर बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी तहसीलदार सुरेश घोळवे, मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, तलाठी अतिश बनसोडे, कृषी सहाय्यक बंडगर, सरपंच विजयकुमार मुखे, सरपंच हनुमंत बिरादार, सरपंच सोपान शिरसे आदींनी केली.

टॅग्स :Rainपाऊसlaturलातूरagricultureशेती