शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

क्षुल्लक कारणावरून नळेगावात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST

चाकूर ते वाढवणा रस्त्याची दुरवस्था लातूर : जिल्ह्यातील चाकूर ते वाढवणा पाटी या २० किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात ...

चाकूर ते वाढवणा रस्त्याची दुरवस्था

लातूर : जिल्ह्यातील चाकूर ते वाढवणा पाटी या २० किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. केवळ थातूरमातूर डागडुजी केली जात असल्याने सातत्याने हा रस्ता उखडतो. हा मार्ग दोन तालुक्यांना जोडणारा आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाढवणा, सुकणी, मन्ना उमरगा, एकुर्का रोड, आडोळवाडी, केसगीरवाडी, डांगेवाडी, खेर्डा, किनी, डाऊळ, हिप्परगा, डोंग्रज, राचन्नावाडी, संगाचीवाडी, शेळगाव, कलकोटी, बोथी, हणमंतवाडी आदी गावच्या ग्रामस्थ, वाहनधारकांतून होत आहे.

पैशाच्या कारणावरून हिप्परग्यात मारहाण

लातूर : विहीर पाडल्याचे पैसे मुलास का देत नाहीस या कारणावरून एकास मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना चवणहिप्परगा येथे घडली. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद अभंग संभाजी बिरादार (७२) यांना विहीर पाडल्याच्या पैशाच्या कारणावरून दिगंबर तुळशीराम बिरादार याच्यासह अन्य तिघांनी दगडाने मारून जखमी केले. शिवाय, जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

हाळी हंडरगुळी येथील बसस्थानकाची दुरवस्था

लातूर : उदगीर तालुक्यातील नांदेड-बीदर राज्य मार्गावर असलेल्या हाळी हंडरगुळी येथील बसस्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. बसस्थानक परिसरात डांबरीकरण करण्यात न आल्याने सर्वत्र खडी असल्याचे दिसून येते. परिणामी, महामंडळ कर्मचाऱ्यांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

प्रकल्पाखालील गावांत सिंचनाचे क्षेत्र वाढले

लातूर : यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. परतीच्या पावसाने तर जिल्ह्याला झोडपून काढले. परिणामी, शेत-शिवारातील लघु, मध्यम आणि साठवण तलावातील जलसाठा यंदा वाढला. यातून प्रकल्पाखालील परिसरात सिंचनाचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. पाण्याचा अंदाज घेऊन अनेक शेतकऱ्यांनी यंदा रबीचा पेराही मोठ्या प्रमाणात घेतला आहे. यातून भविष्यात खरिपातील नुकसानाची भरपाई रबीतून मिळेल.