शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

दैठण्यात काॅनबॅकच्या धर्तीवर बांबूलागवड माहिती केंद्र उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:19 IST

शिरूर अनंतपाळ : वसुंधरेचा धोका टाळून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्यासाठी बांबूलागवड काळाची गरज बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील दैठणा ...

शिरूर अनंतपाळ : वसुंधरेचा धोका टाळून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्यासाठी बांबूलागवड काळाची गरज बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील दैठणा येथे काॅनबॅकच्या धर्तीवर बांबू लागवड माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचा या भागातील शेतकऱ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे, असे राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी गुरुवारी सांगितले.

किसान कट्ट्यावरून शेतकऱ्यांना त्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. पाशा पटेल म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वसुंधरेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वसुंधरा टिकली तर त्यावरील सजीवसृष्टी टिकणार आहे. वसुंधरेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबूलागवड केली पाहिजे. बांबूच्या लागवडीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडणार आहे, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यासाठी काॅनबॅक संस्थेच्या धर्तीवर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथे बांबूलागवड माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. दैठणा येथील काही शेतकऱ्यांनी बांबूलागवड सुरू केली आहे.

बांबूलागवडीचा दुहेरी फायदा...

बांबूलागवड शेतकऱ्यांसाठी फलदायी आहेच. बांबू ही शंभर टक्के कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेऊन शंभर टक्के ऑक्सिजन देणारे आहे. मानवाला आज ऑक्सिजनची गरज आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी बांबूचा मोठा फायदा होणार आहे. बांबू लागवडीचा खर्च अत्यंत माफक असून, एकदा लागवड केल्यानंतर ती वर्षानुवर्षे टिकते. मात्र उत्पादन सुरूच राहते. हेक्टरी शेतकऱ्यांना अडीच लाखांचे उत्पन्न मिळते. माहिती केंद्राच्या माध्यमातून बांबूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बांबू कारखान्यास कच्चा माल पुरविण्यासाठी बांबूपासून कुट्टा करण्याकरिता ५० लाखांची मशीनसुध्दा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, असेही पाशा पटेल यांनी सांगितले.