शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बांबू आधारित इंधन विटा खनिज कोळशाला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST

लातूर : बांबू तसेच जैवभार आधारित इंधन विटा खनिज कोळशाला पर्याय होऊ शकतात, ज्याचा थेट लाभ बांबू शेती करणाऱ्या ...

लातूर : बांबू तसेच जैवभार आधारित इंधन विटा खनिज कोळशाला पर्याय होऊ शकतात, ज्याचा थेट लाभ बांबू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे कमी कार्बन सोडणाऱ्या ग्रीनकोल इंधन कांडीचा वापर औष्णिक विद्युत केंद्रांत केला जावा, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे.

खनिज कोळशाला आता पर्याय सुचवला असून, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, पर्यावरण मंत्री तसेच विरोधी पक्षनेते आणि विद्युत निर्मिती कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी पटेल यांनी चर्चा केली आहे. राज्यात महाजनकोच्या विद्युत निर्मिती केंद्रात दरवर्षी लाखो टन कोळसा वापरला जातो. यातून होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनामुळे जागतिक तापमान वाढीला हातभार लागतो.

बांबू किंवा शेतांत जे कृषी अवशेष उरतात, त्यापासून या इंधन कांड्या तयार करता येऊ शकतात. भाताचा पेंढा, गव्हाची काडं, ऊसाचे चिपाड, सोयाबीनचे कुटार, तुराट्या, कापसाच्या पन्हाट्या तसेच झाडाझुडपांच्या छाटणीमधून तयार होणारा जैवभार वापरून यंत्रांद्वारे या इंधन कांड्या तयार करता येतात. ऊर्जा शेतीद्वारे बांबूची लागवड करता येऊ शकते. बांबूचा उष्मांक ४ हजार किलो कॅलरीपेक्षा जास्त असल्याने त्याचा इंधन म्हणून वापर करता येईल. बालकोवा जातीच्या बांबूची शेती केल्यास प्रतिएकरी प्रतिवर्षी ४० ते ५० टन उत्पन्न मिळते. ३,५००ते ५,००० रुपये प्रतिटन या दराने शेतकऱ्यांकडून तो उपलब्ध होणे शक्य आहे. जैवभारावर आधारित इंधन कांड्यांच्या वापरामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

दिल्लीजवळ दादरी येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या औष्णिक वीज केंद्राने यावर्षी रोज १ हजार टन जैव इंधन ५,५०० रुपये प्रतिटन या भावाने खरेदी करण्याची निविदा काढली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होणार आहे. हे महाराष्ट्रातही औष्णिक विद्युत प्रकल्पामधून शक्य आहे, असे पटेल यांनी म्हटले आहे.