शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

बांबू आधारित इंधन विटा खनिज कोळशाला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST

लातूर : बांबू तसेच जैवभार आधारित इंधन विटा खनिज कोळशाला पर्याय होऊ शकतात, ज्याचा थेट लाभ बांबू शेती करणाऱ्या ...

लातूर : बांबू तसेच जैवभार आधारित इंधन विटा खनिज कोळशाला पर्याय होऊ शकतात, ज्याचा थेट लाभ बांबू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे कमी कार्बन सोडणाऱ्या ग्रीनकोल इंधन कांडीचा वापर औष्णिक विद्युत केंद्रांत केला जावा, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे.

खनिज कोळशाला आता पर्याय सुचवला असून, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, पर्यावरण मंत्री तसेच विरोधी पक्षनेते आणि विद्युत निर्मिती कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी पटेल यांनी चर्चा केली आहे. राज्यात महाजनकोच्या विद्युत निर्मिती केंद्रात दरवर्षी लाखो टन कोळसा वापरला जातो. यातून होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनामुळे जागतिक तापमान वाढीला हातभार लागतो.

बांबू किंवा शेतांत जे कृषी अवशेष उरतात, त्यापासून या इंधन कांड्या तयार करता येऊ शकतात. भाताचा पेंढा, गव्हाची काडं, ऊसाचे चिपाड, सोयाबीनचे कुटार, तुराट्या, कापसाच्या पन्हाट्या तसेच झाडाझुडपांच्या छाटणीमधून तयार होणारा जैवभार वापरून यंत्रांद्वारे या इंधन कांड्या तयार करता येतात. ऊर्जा शेतीद्वारे बांबूची लागवड करता येऊ शकते. बांबूचा उष्मांक ४ हजार किलो कॅलरीपेक्षा जास्त असल्याने त्याचा इंधन म्हणून वापर करता येईल. बालकोवा जातीच्या बांबूची शेती केल्यास प्रतिएकरी प्रतिवर्षी ४० ते ५० टन उत्पन्न मिळते. ३,५००ते ५,००० रुपये प्रतिटन या दराने शेतकऱ्यांकडून तो उपलब्ध होणे शक्य आहे. जैवभारावर आधारित इंधन कांड्यांच्या वापरामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

दिल्लीजवळ दादरी येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या औष्णिक वीज केंद्राने यावर्षी रोज १ हजार टन जैव इंधन ५,५०० रुपये प्रतिटन या भावाने खरेदी करण्याची निविदा काढली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होणार आहे. हे महाराष्ट्रातही औष्णिक विद्युत प्रकल्पामधून शक्य आहे, असे पटेल यांनी म्हटले आहे.