शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरच्या मालधक्क्यावरून नागालँडला निघाले साखरेचे पोते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:19 IST

उदगीर : उदगीरातील रेल्वेच्या मालधक्क्याहून २१ बोगीतून १ हजार ३२३ टन साखर नागालँडमधील दिनापूरला पाठविण्यात आली आहे. त्याच्या भाड्यापोटी ...

उदगीर : उदगीरातील रेल्वेच्या मालधक्क्याहून २१ बोगीतून १ हजार ३२३ टन साखर नागालँडमधील दिनापूरला पाठविण्यात आली आहे. त्याच्या भाड्यापोटी रेल्वेला ३६ लाख ९१ हजार ६७७ रुपये मिळाले आहेत. उदगीरातील मालधक्क्यामुळे रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे.

उदगीर येथे यापूर्वी मालधक्का होता. कालांतराने तो नामशेष झाला होता. उदगीरातील मालधक्का पूर्ववत होण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे यंदा मालवाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली. त्याचा लाभ उठवत उदगीरातील व्यापाऱ्यांनी सोयाबीनची वाहतूक करीत पहिल्या टप्प्यात ३८ लाखांचे भाडे देणारे बुकिंग पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही ३८ लाखांचे भाडे देणाऱ्या सोयाबीनची वाहतूक करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात भालकेश्वर साखर कारखान्याने साखर वाहतूक केल्याने १० लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले. आता हा चौथा टप्पा ३६ लाख ९१ हजार ६७७ रुपयांचे भाडे मिळवून देणारा आहे.

नागालँडमधील दिनापूर येथे विकास साखर कारखान्याची साखर पाठविण्यात आली. २६ हजार ३७६ बॅगमधून १ हजार ३२३ टन साखर २१ बोगींतून पाठविण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १ कोटी २३ लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे.

यावेळी वाणिज्य निरीक्षक संतोष चिगळे, स्टेशन अधीक्षक दीपक जोशी, गोपाल यादव, संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे उपस्थित होते. विकास कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. पवार यांनी या निर्यातीसाठी पुढाकार घेतला होता.

सोयी-सुविधांसाठी होणार लाभ

उदगीर रेल्वेस्थानकाच्या नफ्यात मोठी भर पडली असून, भविष्यात सोयी-सुविधा व अनेक मंजुरीसाठी त्याचा लाभ होणार आहे. उदगीर व परिसरातील व्यापारी आणि कारखान्यांनी स्वस्त व सुरक्षित असणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उदगीर रेल्वे संघर्ष समिती सचिव मोतीलाल डोईजोडे व स्टेशन अधीक्षक दीपक जोशी यांनी केले आहे.

दरम्यान, उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे व स्टेशन अधीक्षक दीपक जोशी यांनी विविध व्यापारी व कारखान्यांना भेटी देऊन या वाहतुकीचे महत्त्व व फायद्याची जाणीव करून दिल्यानंतर आता नोंदणी वाढत आहे. उदगीर व परिसरातील व्यापारी आणि कारखान्यांनी स्वस्त व सुरक्षित वाहतूक असणाऱ्या रेल्वेचा लाभ घेतल्यामुळे उदगीर रेल्वेस्थानकाचा वेगाने विकास होईल, अशी अपेक्षा आहे.