शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

उदगीरच्या मालधक्क्यावरून नागालँडला निघाले साखरेचे पोते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:19 IST

उदगीर : उदगीरातील रेल्वेच्या मालधक्क्याहून २१ बोगीतून १ हजार ३२३ टन साखर नागालँडमधील दिनापूरला पाठविण्यात आली आहे. त्याच्या भाड्यापोटी ...

उदगीर : उदगीरातील रेल्वेच्या मालधक्क्याहून २१ बोगीतून १ हजार ३२३ टन साखर नागालँडमधील दिनापूरला पाठविण्यात आली आहे. त्याच्या भाड्यापोटी रेल्वेला ३६ लाख ९१ हजार ६७७ रुपये मिळाले आहेत. उदगीरातील मालधक्क्यामुळे रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे.

उदगीर येथे यापूर्वी मालधक्का होता. कालांतराने तो नामशेष झाला होता. उदगीरातील मालधक्का पूर्ववत होण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे यंदा मालवाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली. त्याचा लाभ उठवत उदगीरातील व्यापाऱ्यांनी सोयाबीनची वाहतूक करीत पहिल्या टप्प्यात ३८ लाखांचे भाडे देणारे बुकिंग पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही ३८ लाखांचे भाडे देणाऱ्या सोयाबीनची वाहतूक करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात भालकेश्वर साखर कारखान्याने साखर वाहतूक केल्याने १० लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले. आता हा चौथा टप्पा ३६ लाख ९१ हजार ६७७ रुपयांचे भाडे मिळवून देणारा आहे.

नागालँडमधील दिनापूर येथे विकास साखर कारखान्याची साखर पाठविण्यात आली. २६ हजार ३७६ बॅगमधून १ हजार ३२३ टन साखर २१ बोगींतून पाठविण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १ कोटी २३ लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे.

यावेळी वाणिज्य निरीक्षक संतोष चिगळे, स्टेशन अधीक्षक दीपक जोशी, गोपाल यादव, संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे उपस्थित होते. विकास कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. पवार यांनी या निर्यातीसाठी पुढाकार घेतला होता.

सोयी-सुविधांसाठी होणार लाभ

उदगीर रेल्वेस्थानकाच्या नफ्यात मोठी भर पडली असून, भविष्यात सोयी-सुविधा व अनेक मंजुरीसाठी त्याचा लाभ होणार आहे. उदगीर व परिसरातील व्यापारी आणि कारखान्यांनी स्वस्त व सुरक्षित असणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उदगीर रेल्वे संघर्ष समिती सचिव मोतीलाल डोईजोडे व स्टेशन अधीक्षक दीपक जोशी यांनी केले आहे.

दरम्यान, उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे व स्टेशन अधीक्षक दीपक जोशी यांनी विविध व्यापारी व कारखान्यांना भेटी देऊन या वाहतुकीचे महत्त्व व फायद्याची जाणीव करून दिल्यानंतर आता नोंदणी वाढत आहे. उदगीर व परिसरातील व्यापारी आणि कारखान्यांनी स्वस्त व सुरक्षित वाहतूक असणाऱ्या रेल्वेचा लाभ घेतल्यामुळे उदगीर रेल्वेस्थानकाचा वेगाने विकास होईल, अशी अपेक्षा आहे.