शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

उदगीरच्या मालधक्क्यावरून नागालँडला निघाले साखरेचे पोते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:19 IST

उदगीर : उदगीरातील रेल्वेच्या मालधक्क्याहून २१ बोगीतून १ हजार ३२३ टन साखर नागालँडमधील दिनापूरला पाठविण्यात आली आहे. त्याच्या भाड्यापोटी ...

उदगीर : उदगीरातील रेल्वेच्या मालधक्क्याहून २१ बोगीतून १ हजार ३२३ टन साखर नागालँडमधील दिनापूरला पाठविण्यात आली आहे. त्याच्या भाड्यापोटी रेल्वेला ३६ लाख ९१ हजार ६७७ रुपये मिळाले आहेत. उदगीरातील मालधक्क्यामुळे रेल्वेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे.

उदगीर येथे यापूर्वी मालधक्का होता. कालांतराने तो नामशेष झाला होता. उदगीरातील मालधक्का पूर्ववत होण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे यंदा मालवाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली. त्याचा लाभ उठवत उदगीरातील व्यापाऱ्यांनी सोयाबीनची वाहतूक करीत पहिल्या टप्प्यात ३८ लाखांचे भाडे देणारे बुकिंग पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही ३८ लाखांचे भाडे देणाऱ्या सोयाबीनची वाहतूक करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात भालकेश्वर साखर कारखान्याने साखर वाहतूक केल्याने १० लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले. आता हा चौथा टप्पा ३६ लाख ९१ हजार ६७७ रुपयांचे भाडे मिळवून देणारा आहे.

नागालँडमधील दिनापूर येथे विकास साखर कारखान्याची साखर पाठविण्यात आली. २६ हजार ३७६ बॅगमधून १ हजार ३२३ टन साखर २१ बोगींतून पाठविण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १ कोटी २३ लाखांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे.

यावेळी वाणिज्य निरीक्षक संतोष चिगळे, स्टेशन अधीक्षक दीपक जोशी, गोपाल यादव, संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे उपस्थित होते. विकास कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. पवार यांनी या निर्यातीसाठी पुढाकार घेतला होता.

सोयी-सुविधांसाठी होणार लाभ

उदगीर रेल्वेस्थानकाच्या नफ्यात मोठी भर पडली असून, भविष्यात सोयी-सुविधा व अनेक मंजुरीसाठी त्याचा लाभ होणार आहे. उदगीर व परिसरातील व्यापारी आणि कारखान्यांनी स्वस्त व सुरक्षित असणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उदगीर रेल्वे संघर्ष समिती सचिव मोतीलाल डोईजोडे व स्टेशन अधीक्षक दीपक जोशी यांनी केले आहे.

दरम्यान, उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे व स्टेशन अधीक्षक दीपक जोशी यांनी विविध व्यापारी व कारखान्यांना भेटी देऊन या वाहतुकीचे महत्त्व व फायद्याची जाणीव करून दिल्यानंतर आता नोंदणी वाढत आहे. उदगीर व परिसरातील व्यापारी आणि कारखान्यांनी स्वस्त व सुरक्षित वाहतूक असणाऱ्या रेल्वेचा लाभ घेतल्यामुळे उदगीर रेल्वेस्थानकाचा वेगाने विकास होईल, अशी अपेक्षा आहे.