शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

उन्हं वाढले, पशुधनाची घ्या काळजी; अन्यथा दूध, रोगप्रतिकारशक्ती होईल कमी!

By हरी मोकाशे | Updated: March 16, 2024 16:06 IST

दावणीला जनावरे दाटीवाटीने बांधू नका

लातूर : मार्चमध्येच उन्हाची तीव्रता वाढली असून पारा ३९ अं. से. वर पोहोचला आहे. उष्ण हवामानामुळे पशुधनाचे दूध उत्पादन घटण्याबरोबरच रोगप्रतिकारशक्तीही कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे पशुपालकांनी अधिक काळजी घ्यावी. कडक उन्हात जनावरांना चरण्यासाठी सोडू नये, उष्णतेमुळे गरम झालेले पाणी पाजणे टाळावे, असा सल्ला जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.

काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. दुपारच्यावेळी अबालवृध्द घामाघूम होत आहेत. मनुष्याप्रमाणे पशुधनाच्या आरोग्यावरही उष्ण हवामानाचा परिणाम होतो. त्यामुळे पशुपालकांनाही आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशूधन ५ लाख १४ हजार ६४५ आहे तर शेळ्यांची संख्या १ लाख ४५ आणि ३५ हजार मेंढ्या आहेत. पशुपालकांनी पशुधनास कडक उन्हात चारण्यासाठी सोडू नये. लोखंडी हौदामध्ये गरम झालेले पाणी पाजणे टाळावे. दावणीस जनावरे दाटीवाटीने बांधू नये. मृत जनावरांची विल्हेवाट चराऊ कुरणाच्या ठिकाणी करु नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

कमाल अन् किमान तापमानात वाढ...तारीख - कमाल - किमान तापमान८ मार्च - ३८ - १८९ मार्च - ३७ - २०.५१० मार्च - ३६ - २१.५११ मार्च - ३९ - २२.५१२ मार्च - ३९ - २३.५१३ मार्च - ३९.५ - २४.५१४ मार्च - ३८.५ - २३१५ मार्च - ३९ - २३.५

उन्हामुळे अशी घ्या काळजी...जनावरांना शक्यतो सकाळी अन् सायंकाळी चरण्यासाठी सोडावे. हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत, जेणेकरुन गोठ्यात हवा खेळती राहील. छपराला शक्यतो पांढरा चुना अथवा रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा टाळावा. त्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल. गोठ्याच्या सभाेवताली झाडे असावी. दुपारी गोठ्याभोवती बारदाणा, शेडनेट लावावे. जनावरांना मुबलक प्रमाणात थंडी पाणी उपलब्ध करुन द्यावे. शेती मशागतीची कामे सकाळी व सायंकाळी करावीत. पाण्यात आवश्यकतेनुसार मिठाचा वापर करावा. थंड वातावरणात चारा टाकावा. वेळोवेळी लसीकरण करुन घ्यावे. म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घामग्रंथीच्या कमी संख्येमुळे गाईपेक्षा त्यांना उष्णेतेचा अधिक त्रास होतो. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी.

उन्हामुळे भूक मंदावते...उन्हामुळे जनावरांची भूक मंदावते. कोरडा चारा खात नाहीत. हलचाल मंदावते. शरीराचे तापमान वाढल्याने जाेरजोरात श्वास घेते. भरपूर घाम येतो. दूध उत्पादन कमी होण्याबराेबर प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात पशुधनाची अधिक काळजी घ्यावी.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र