शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

उन्हं वाढले, पशुधनाची घ्या काळजी; अन्यथा दूध, रोगप्रतिकारशक्ती होईल कमी!

By हरी मोकाशे | Updated: March 16, 2024 16:06 IST

दावणीला जनावरे दाटीवाटीने बांधू नका

लातूर : मार्चमध्येच उन्हाची तीव्रता वाढली असून पारा ३९ अं. से. वर पोहोचला आहे. उष्ण हवामानामुळे पशुधनाचे दूध उत्पादन घटण्याबरोबरच रोगप्रतिकारशक्तीही कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे पशुपालकांनी अधिक काळजी घ्यावी. कडक उन्हात जनावरांना चरण्यासाठी सोडू नये, उष्णतेमुळे गरम झालेले पाणी पाजणे टाळावे, असा सल्ला जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.

काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. दुपारच्यावेळी अबालवृध्द घामाघूम होत आहेत. मनुष्याप्रमाणे पशुधनाच्या आरोग्यावरही उष्ण हवामानाचा परिणाम होतो. त्यामुळे पशुपालकांनाही आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशूधन ५ लाख १४ हजार ६४५ आहे तर शेळ्यांची संख्या १ लाख ४५ आणि ३५ हजार मेंढ्या आहेत. पशुपालकांनी पशुधनास कडक उन्हात चारण्यासाठी सोडू नये. लोखंडी हौदामध्ये गरम झालेले पाणी पाजणे टाळावे. दावणीस जनावरे दाटीवाटीने बांधू नये. मृत जनावरांची विल्हेवाट चराऊ कुरणाच्या ठिकाणी करु नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

कमाल अन् किमान तापमानात वाढ...तारीख - कमाल - किमान तापमान८ मार्च - ३८ - १८९ मार्च - ३७ - २०.५१० मार्च - ३६ - २१.५११ मार्च - ३९ - २२.५१२ मार्च - ३९ - २३.५१३ मार्च - ३९.५ - २४.५१४ मार्च - ३८.५ - २३१५ मार्च - ३९ - २३.५

उन्हामुळे अशी घ्या काळजी...जनावरांना शक्यतो सकाळी अन् सायंकाळी चरण्यासाठी सोडावे. हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत, जेणेकरुन गोठ्यात हवा खेळती राहील. छपराला शक्यतो पांढरा चुना अथवा रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा टाळावा. त्यामुळे सूर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल. गोठ्याच्या सभाेवताली झाडे असावी. दुपारी गोठ्याभोवती बारदाणा, शेडनेट लावावे. जनावरांना मुबलक प्रमाणात थंडी पाणी उपलब्ध करुन द्यावे. शेती मशागतीची कामे सकाळी व सायंकाळी करावीत. पाण्यात आवश्यकतेनुसार मिठाचा वापर करावा. थंड वातावरणात चारा टाकावा. वेळोवेळी लसीकरण करुन घ्यावे. म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घामग्रंथीच्या कमी संख्येमुळे गाईपेक्षा त्यांना उष्णेतेचा अधिक त्रास होतो. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी.

उन्हामुळे भूक मंदावते...उन्हामुळे जनावरांची भूक मंदावते. कोरडा चारा खात नाहीत. हलचाल मंदावते. शरीराचे तापमान वाढल्याने जाेरजोरात श्वास घेते. भरपूर घाम येतो. दूध उत्पादन कमी होण्याबराेबर प्रजनन क्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात पशुधनाची अधिक काळजी घ्यावी.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र