शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

मराठा समाजातून उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:21 IST

राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे आरक्षण रद्द... सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला राज्य शासन जबाबदार ...

राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे आरक्षण रद्द...

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला राज्य शासन जबाबदार आहे. सरकारचा निष्काळजीपणा समाजाला भोवला आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत बाजू मांडताना योग्य व अभ्यासपुर्ण मांडली नाही. त्यामुळे आरक्षण रद्द झाले आहे. राज्य सरकारच्या या निष्क्रीयेतचा निषेध असून, आरक्षण रद्द होणे वेदनादायी आहे. - माजी मंत्री, आ. संभाजी पाटील निलंगेकर

आरक्षण मिळवून देणारच...

सरकारच्या बेजबाबदारपणामुळे आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे संताप आणि उद्रेकाची भावना आहे. परंतू, छावा संघटना मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी यापुढील काळातही तीव्र लढा उभारेल. सध्या कोरोनाचा काळ आहे त्यामुळे रस्त्यावर उतरुन भावना व्यक्त करता येत नाहीत. परंतू, समाजातील प्रत्येक घरात या निर्णयाविरुद्ध संताप आहे. - नानासाहेब जावळे पाटील, केंद्रीय अध्यक्ष, छावा संघटना

लोकसभेने ठराव घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा...

मराठा, पटेल, गुजर या समाजातून आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यामुळे लोकसभेने संसदेत ठराव घेऊन या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढायला हवा. परंतू, सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. मराठा समाजाला ओबीसाीमध्ये समाविष्ट केले पाहिजे ही मराठा सेवा संघाची भुमिका आहे. आलेला निर्णय अनपेक्षित आहे. प्रा. सुनील नावाडे, जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ

ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे...

मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळाले पाहिजे. ही आमची मागणी होती. परंतू, दोन्ही सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. त्यामुळेच आरक्षणाचा प्रश्न रेंगाळलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकालही दूर्देवी आहे. आरक्षण मर्यादा वाढवून ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले तर न्याय मिळेल. - वैभव तळेकर, माजी जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ

शासनामुळे निकाल विरोधात...

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी शिस्तबद्ध पद्धतीने ५८ मोर्चे काढले. शासनाला जागे केले. परंतू, मधल्या काळात आरक्षणाची बाजू मांडताना शासन कमी पडले आहे. त्यामुळे निकाल विरोधात गेला ही बाब वेदनादायी आणि समाजाचे नुकसान करणारी आहे. शासनाने ओबीसीमधून आरक्षण देण्याची भुमिका मांडावी. - डॉ. अभय कदम, लातूर

निकालामुळे भावी पिढीवर परिणाम...

राजकारण्यांमुळे निकाल विरोधात गेला आहे. या निकालामुळे समाजाच्या भावी पिढीवर परिणाम होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात भुमिका मांडताना दोन्ही सरकार बेजबाबदार वागले आहे. त्यामुळेच निकाल विरोधात गेला आहे. राजकारण्यांची इच्छाशक्तीच नव्हती. त्यामुळे समाजाचे नुकसान झाले आहे. - डॉ. हर्षवर्धन राऊत, लातूर