शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

श्रावणसरींची किमया; पिकांना जीवदान, मांजरा प्रकल्पात तीन सेंटिमीटरने पाणी वाढलं!

By हणमंत गायकवाड | Updated: September 8, 2023 17:43 IST

लातूर जिल्ह्यात १३, तर मांजरा प्रकल्प क्षेत्रात २४ मि.मी. पाऊस पाऊस

लातूर : गेल्या तीन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र श्रावणसरी कोसळत आहेत. या सरी हलक्या स्वरूपाच्या असल्या तरी जिल्ह्यात सर्वदूर कोसळत असल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३ मि.मी. पाऊस झाला आहे. तर लातूर शहराला पिण्यासाठी प्रमुख स्रोत असलेल्या मांजरा प्रकल्प क्षेत्रात २४ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे मांजरा प्रकल्पाची पाणीपातळी तीन सेंटिमीटरने वाढली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मांजरा प्रकल्पात ०.६६२ द.ल.घ.मी. नवीन पाणीसाठा झाला. यामुळे मांजरा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २१ पाणीपुरवठा योजनांच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ४०६ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून श्रावणसरी कोसळत असल्यामुळे कोमात गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. उताऱ्यात घट होणार असली तरी सद्य:स्थितीत सोयाबीनसह अन्य पिके उभी टाकली आहेत. पाऊस मोठा नसला तरी हलक्या सरी कोसळत असल्याने थांबलेली पिकांची वाढ पुन्हा उभारी घेत आहे. तिकडे मांजरा प्रकल्पक्षेत्रात तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याची पातळी दिवसागणिक वाढत आहे. सध्या मांजरा प्रकल्पात २४.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे; तर गेल्या २४ तासांमध्ये ०.६६२ द.ल.घ.मी. नवीन पाणी आले आहे. हे नवीन पाणी किमान महिनाभर पुरू शकते. यामुळे लातूरसह अन्य गावांना दिलासा मिळाला आहे.

मांजरा प्रकल्पात ४३.१०१ जिवंत पाणीसाठामांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये यंदाच्या पावसाळ्यात १६.०८९ द.ल.घ.मी. नवीन पाणी आले आहे; तर गेल्या २४ तासांमध्ये ०.६६२ नवीन पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्प क्षेत्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २४ मि.मी. पाऊस झाला असून, सद्य:स्थितीत मांजरा प्रकल्पामध्ये २४.३६ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. म्हणजे ४३.१०१ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा झाला असल्याची माहिती मांजरा प्रकल्प शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.

थेंबे थेंबे तळे साचे; श्रावणसरींमुळे मिळाला दिलासाकाही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून श्रावणसरी कोसळत आहेत. धरणांमध्येही थेंबे-थेंबे पाणी साचत आहे. पोळ्यापर्यंत असाच पाऊस राहिला तर पाणीपातळीत मोठी वाढ होऊ शकते. गतवर्षीही मांजरा प्रकल्पात एकदम पाणीसाठा झाला नव्हता. शेवटच्या टप्प्यातच पाऊस झाल्यानंतर धरण भरले होते. यंदाही शेवटी धरण भरेल, अशी अपेक्षा आहे. सध्या श्रावणसरी कोसळत असल्याने धरणात थोडे-थोडे पाणी येत आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीManjara Damमांजरा धरण