शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
2
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
3
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
4
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
5
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
7
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
8
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
9
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
10
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
11
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
12
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
13
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
14
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
15
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
16
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
17
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
18
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
19
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
20
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणसरींची किमया; पिकांना जीवदान, मांजरा प्रकल्पात तीन सेंटिमीटरने पाणी वाढलं!

By हणमंत गायकवाड | Updated: September 8, 2023 17:43 IST

लातूर जिल्ह्यात १३, तर मांजरा प्रकल्प क्षेत्रात २४ मि.मी. पाऊस पाऊस

लातूर : गेल्या तीन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र श्रावणसरी कोसळत आहेत. या सरी हलक्या स्वरूपाच्या असल्या तरी जिल्ह्यात सर्वदूर कोसळत असल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३ मि.मी. पाऊस झाला आहे. तर लातूर शहराला पिण्यासाठी प्रमुख स्रोत असलेल्या मांजरा प्रकल्प क्षेत्रात २४ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे मांजरा प्रकल्पाची पाणीपातळी तीन सेंटिमीटरने वाढली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मांजरा प्रकल्पात ०.६६२ द.ल.घ.मी. नवीन पाणीसाठा झाला. यामुळे मांजरा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २१ पाणीपुरवठा योजनांच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ४०६ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून श्रावणसरी कोसळत असल्यामुळे कोमात गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. उताऱ्यात घट होणार असली तरी सद्य:स्थितीत सोयाबीनसह अन्य पिके उभी टाकली आहेत. पाऊस मोठा नसला तरी हलक्या सरी कोसळत असल्याने थांबलेली पिकांची वाढ पुन्हा उभारी घेत आहे. तिकडे मांजरा प्रकल्पक्षेत्रात तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याची पातळी दिवसागणिक वाढत आहे. सध्या मांजरा प्रकल्पात २४.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे; तर गेल्या २४ तासांमध्ये ०.६६२ द.ल.घ.मी. नवीन पाणी आले आहे. हे नवीन पाणी किमान महिनाभर पुरू शकते. यामुळे लातूरसह अन्य गावांना दिलासा मिळाला आहे.

मांजरा प्रकल्पात ४३.१०१ जिवंत पाणीसाठामांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये यंदाच्या पावसाळ्यात १६.०८९ द.ल.घ.मी. नवीन पाणी आले आहे; तर गेल्या २४ तासांमध्ये ०.६६२ नवीन पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्प क्षेत्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २४ मि.मी. पाऊस झाला असून, सद्य:स्थितीत मांजरा प्रकल्पामध्ये २४.३६ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. म्हणजे ४३.१०१ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा झाला असल्याची माहिती मांजरा प्रकल्प शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.

थेंबे थेंबे तळे साचे; श्रावणसरींमुळे मिळाला दिलासाकाही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून श्रावणसरी कोसळत आहेत. धरणांमध्येही थेंबे-थेंबे पाणी साचत आहे. पोळ्यापर्यंत असाच पाऊस राहिला तर पाणीपातळीत मोठी वाढ होऊ शकते. गतवर्षीही मांजरा प्रकल्पात एकदम पाणीसाठा झाला नव्हता. शेवटच्या टप्प्यातच पाऊस झाल्यानंतर धरण भरले होते. यंदाही शेवटी धरण भरेल, अशी अपेक्षा आहे. सध्या श्रावणसरी कोसळत असल्याने धरणात थोडे-थोडे पाणी येत आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीManjara Damमांजरा धरण