शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

श्रावणसरींची किमया; पिकांना जीवदान, मांजरा प्रकल्पात तीन सेंटिमीटरने पाणी वाढलं!

By हणमंत गायकवाड | Updated: September 8, 2023 17:43 IST

लातूर जिल्ह्यात १३, तर मांजरा प्रकल्प क्षेत्रात २४ मि.मी. पाऊस पाऊस

लातूर : गेल्या तीन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र श्रावणसरी कोसळत आहेत. या सरी हलक्या स्वरूपाच्या असल्या तरी जिल्ह्यात सर्वदूर कोसळत असल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३ मि.मी. पाऊस झाला आहे. तर लातूर शहराला पिण्यासाठी प्रमुख स्रोत असलेल्या मांजरा प्रकल्प क्षेत्रात २४ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे मांजरा प्रकल्पाची पाणीपातळी तीन सेंटिमीटरने वाढली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मांजरा प्रकल्पात ०.६६२ द.ल.घ.मी. नवीन पाणीसाठा झाला. यामुळे मांजरा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २१ पाणीपुरवठा योजनांच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ४०६ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून श्रावणसरी कोसळत असल्यामुळे कोमात गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. उताऱ्यात घट होणार असली तरी सद्य:स्थितीत सोयाबीनसह अन्य पिके उभी टाकली आहेत. पाऊस मोठा नसला तरी हलक्या सरी कोसळत असल्याने थांबलेली पिकांची वाढ पुन्हा उभारी घेत आहे. तिकडे मांजरा प्रकल्पक्षेत्रात तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याची पातळी दिवसागणिक वाढत आहे. सध्या मांजरा प्रकल्पात २४.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे; तर गेल्या २४ तासांमध्ये ०.६६२ द.ल.घ.मी. नवीन पाणी आले आहे. हे नवीन पाणी किमान महिनाभर पुरू शकते. यामुळे लातूरसह अन्य गावांना दिलासा मिळाला आहे.

मांजरा प्रकल्पात ४३.१०१ जिवंत पाणीसाठामांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये यंदाच्या पावसाळ्यात १६.०८९ द.ल.घ.मी. नवीन पाणी आले आहे; तर गेल्या २४ तासांमध्ये ०.६६२ नवीन पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्प क्षेत्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २४ मि.मी. पाऊस झाला असून, सद्य:स्थितीत मांजरा प्रकल्पामध्ये २४.३६ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. म्हणजे ४३.१०१ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा झाला असल्याची माहिती मांजरा प्रकल्प शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.

थेंबे थेंबे तळे साचे; श्रावणसरींमुळे मिळाला दिलासाकाही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून श्रावणसरी कोसळत आहेत. धरणांमध्येही थेंबे-थेंबे पाणी साचत आहे. पोळ्यापर्यंत असाच पाऊस राहिला तर पाणीपातळीत मोठी वाढ होऊ शकते. गतवर्षीही मांजरा प्रकल्पात एकदम पाणीसाठा झाला नव्हता. शेवटच्या टप्प्यातच पाऊस झाल्यानंतर धरण भरले होते. यंदाही शेवटी धरण भरेल, अशी अपेक्षा आहे. सध्या श्रावणसरी कोसळत असल्याने धरणात थोडे-थोडे पाणी येत आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीManjara Damमांजरा धरण