शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आयुर्वेदाचा प्रचार अन् प्रसाराचे ध्येय (लोकमत सखी मंच ॲचिव्हर्स २०२१ साठी लेख)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST

डॉ. गायत्री महानुरे यांचे शालेय शिक्षण श्री केशवराज विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयातून झाले आहे. त्यानंतर डॉ. ...

डॉ. गायत्री महानुरे यांचे शालेय शिक्षण श्री केशवराज विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयातून झाले आहे. त्यानंतर डॉ. गायत्री यांनी नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातून बी.ए.एम.एस. पूर्ण केले. आयुर्वेदाचे शिक्षण झाल्यानंतर एका रात्रीत अचानक पुण्याला जाण्याचा निर्णय डॉ. गायत्री यांचा टर्निंग पॉइंट ठरला. माधवबाग संस्थेने नुकतीच संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेची सुरुवात केली होती आणि त्यावेळपासूनच डॉ. गायत्री माधवबागसोबत आहेत.

मागील दहा वर्षांपासून डॉ. गायत्री यांनी लातूरच्या राजीव गांधी चौकात माधवबागची शाखा सुरू केली आहे. पूर्वी लातूरमध्येच दुसऱ्या शाखेमध्ये ए.एस.ए. क्लिनिक हेड म्हणून दहा वर्षे काम केले. माधवबागमधून आयुर्वेद आणि आधुनिक निदान पद्धती याचा चांगला उपयोग करून डॉ. गायत्री उत्तम चिकित्सा करीत आहेत. त्यांना आपल्या कामात समाधान मिळते, हे महत्त्वाचे आहे. यश असो की अपयश, त्यात तटस्थ राहणे हा डॉ. गायत्री यांचा स्थायीभाव आहे. त्या यशाने हुरळून जात नाहीत अन् अपयशाने खचतही नाहीत. ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार सेवा देण्यावर त्यांचा अधिक भर असतो. त्यासाठी सुसंवाद महत्त्वाचा ठरतो. प्रत्येकाला त्याच्या शारीरिक स्थितीची आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या पथ्याची माहिती सुलभ देणे आवश्यक असते. उपचारामध्ये डॉक्टरांचा सकारात्मक दृष्टिकोन मोलाचा ठरतो. डॉ. गायत्री यांचाही रुग्णांशी असलेला संवाद आणि दृष्टिकोन प्रशंसनीय आहे.

डॉ. गायत्री यांनी सदैव उत्तम काम करणे, त्या दिशेने पुढे जाणे हेच आदर्श तत्त्व जपले आहे. त्यांना सासरच्या मंडळीकडून आणि माहेरकडून साथ मिळाली आहे. रुग्णसेवा आणि घेतलेल्या निर्णयाला विरोध झाला नाही. प्रामुख्याने पती अर्जुन महानुरे यांनी माधवबागची फ्रेन्चाईसी घेण्याच्या निर्णयाला पाठबळ दिले. इतकेच नव्हे त्यांच्या संस्थेतील क्लिनिक मॅनेजमेंट तेच बघतात. डॉ. गायत्री यांनी आपली शाखा सांभाळताना गुणवत्तापूर्ण काम केले आहे. त्यामुळेच माधवबाग संस्थेच्या कार्यक्रमात २०१३ चा व २०१५ चा बेस्ट क्लिनिक हेड मराठवाडा पुरस्कार त्यांना मिळाला, तसेच २०१७ मध्ये बेस्ट क्लिनिक आणि बेस्ट क्लिनिक मॅनेजमेंटचा पुरस्कारही त्यांनी मिळविला. पुढच्या काळातही आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करावा. लोकांमध्ये हृदयरोगाविषयी, मधुमेहासंदर्भाने जनजागरण करावे किंबहुना हृदयरोग आणि मधुमेहमुक्त कुटुंब या दिशेने काम करावे, ही डॉ. गायत्री यांची तळमळ आहे.

- डॉ. गायत्री अर्जुन महानुरे