शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

तुळशी विवाहानंतर वाजणार सनई चौघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:43 IST

वधू-वर पित्यांची मंगल कार्यालय बुकिंगसाठी लगबग

ठळक मुद्देनोव्हेंबर आणि डिसेंबरात महिन्यात ११ मुहूर्त मार्च-एप्रिल महिन्यातील मुहूर्तासाठी वाढली बुकिंग

- निशिकांत मायी

लातूर : दोन मनांचे मिलन घडविणारा आणि दोन कुटुंबांना जोडणारा विवाह संस्कार सोहळा समीप आला असून तुळशी विवाहानंतर लातुरात सनई-चौघडे मोठ्या प्रमाणात वाजणार आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यातच तब्बल ११ विवाह मुहूर्त असून शहरातील मंगल कार्यालये सज्ज झाली आहेत.

येत्या ९ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार असून १२ नोव्हेंबरला समाप्ती होणार आहे. साधारणपणे तुळशी विवाहाच्या मुहूर्तापासूनच विवाहांना सुरुवात केली जाते. त्यानुषंगाने ११ नोव्हेंबरला लग्नाचा पहिला बार फुटणार आहे. लातूर शहरात लग्नाचे वय झालेल्या मुलामुलींच्या लग्नघरी त्या दृष्टीने तयारी पूर्णत्वाकडे आली असून मंगल कार्यालयेही दुमदुमणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षी गुरु अस्तामुळे एक महिना उशिराने लग्नसराई सुरू झाली होती. मात्र यावर्षी तसे काही नाही. यंदा झालेला दमदार पाऊस विवाह सोहळ्याच्या आनंदात भर टाकणारा आहे. नोव्हेंबर महिन्यात विवाहाचे चार मुहूर्त असून शहरातील अनेक मंगल कार्यालयांचे बुकिंग आधीच करण्यात आले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने मिळून ११ शुभ मुहूर्त फुल्ल असल्याचे मंगल कार्यालयातून सांगण्यात आले.जिल्ह्यातील अनेक गावात मंगल कार्यालयांची निकड असून अनेकांनी आपल्या घराच्या अंगण परिसरातच मंडप टाकून विवाह सोहळा उरकण्याचे ठरविले आहे. सामान्य कुटुंबातील पालकांची लग्न जुळलेल्या मुला-मुलींच्या विवाहासाठी मंगल कार्यालयांची बुकिंग करण्यासाठी लगबग वाढली आहे.

असे आहेत विवाहाचे मुहूर्तनोव्हेंबर : २०, २१, २३, २८़ डिसेंबर : १, २, ३, ६, ८, ११, १२़ जानेवारी : १८, २०, २९, ३०, ३१़ फेब्रुवारी : १, ४, १२, १४, १६, २०, २७, मार्च : ३, ४, ८, ११, १२, १९़ एप्रिल : १५, १६, २६, २७़ मे : २, ५, ६, ८, १२, १४, १७, १८, १९, २४, जून : ११, १४, १५़ पुढील वर्षी २०२० च्या मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त असल्याने मंगल कार्यालये बुकिंगसाठी आतापासूनच धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मार्च-एप्रिलची वाढली बुकिंगलातूर शहरात सद्यपरिस्थितीत २५ ते ३० मंगल कार्यालये असून ६ ते ७ लॉन आहेत. लातूरची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. अशावेळी २५ ते ३० मंगल कार्यालये आणि ६-७ लॉन म्हणजे शहरासाठी कमीच ठरतात. पुढील वर्षात लग्नाचे अधिक मुहूर्त असल्याने मार्च, एप्रिल, मे महिन्यासाठी आतापासूनच बुकिंगसाठी प्रयत्न केले जात आहेत. आधी मंगल कार्यालये बुक केली जाऊन जी तारीख बुक केली तीच लग्नाची तारीख ठरविली जात आहे.

विवाह मुहूर्त पाळा...विवाह मुहूतार्साठी केवळ तारखेला महत्त्व नाही तर त्या दिवशीचा अग्नी महत्त्वाचा असतो. मंगल नामाने त्या दिवसाची सुरुवात होत असते. मात्र अनेकदा लग्न वेळेवर लागत नाहीत, असे लक्षात आले आहे. शुभ वेळ पाहूनच मुहूर्त काढलेला असतो. घटिका ही महत्त्वाची असते. शास्त्रात मुहूतार्चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा पत्रिकेवर लग्नाची जी वेळ दिली आहे, ती प्रत्येकाने पाळावी, असे साई मंदिरचे पुजारी नागेश जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :marriageलग्नlaturलातूरFamilyपरिवार