शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

आठ वर्षांनी किल्लारी साखर कारखाना कर्जमुक्त, अवसायक मंडळाकडे ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST

किल्लारी : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा अशी सातत्याने शेतकऱ्यांतून मागणी होत होती. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा ...

किल्लारी : किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा अशी सातत्याने शेतकऱ्यांतून मागणी होत होती. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नांदेडने एक कोटी १५ लाख रुपये भरून हा कारखाना कर्जमुक्त करून तो अवसायक मंडळाच्या ताब्यात दिला आहे.

औसा तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा कर्जामुळे बंद होता. तो सुरू करण्यात यावा अशी सातत्याने ऊस उत्पादकांतून मागणी होत होती. त्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री अमित देशमुख, खा. ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री बस्वराज पाटील, आ. बाबासाहेब पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, सुरेश दाजी बिराजदार यांनी प्रयत्न केले होते. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले होते.

किल्लारी कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची दोन कोटी ४० लाखांची थकबाकी होती. राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर कारखान्यावर अवसायक मंडळ स्थापन झाले होते. या मंडळाने पक्षश्रेष्ठींना भेटून एक कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज माफ करून घेतले होते. उर्वरित एक कोटी १५ लाख रुपये थकीत राहिले होते.

अखेर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नांदेडने एक कोटी १५ लाख रुपये भरून हा कारखाना कर्जमुक्त करून तो अवसायक मंडळ आणि जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांच्याकडे ताबा दिला आहे. त्यामुळे कारखाना सुरू होण्यास गती मिळाली आहे. सोमवारी कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे नांदेडचे प्राधिकृत अधिकारी विवेकानंद देशमुख यांनी अधिकृतपणे कारखाना ताब्यात दिल्याचे लेखी दिले आहे. यावेळी अवसायक मंडळाचे विजयकुमार सोनवणे, केशव ऊर्फ बाबा पाटील यांनी ताबा घेतला. यावेळी रमेश मेश हेळंबे, विनोद बाबळसुरे, विकास हराळकर, शिवाजी कदम, वामन पाटील, संजय पवार तसेच नानाराव भोसले, बंकट पाटील, रुक्मानंद पवार, दत्ता भोसले, प्रकाश पाटील, कारखान्याचे एमडी टी. एन. पवार, सुरक्षा अधिकारी शिवाजी मोरे उपस्थित होते.

पुढील वर्षी कारखाना सुरू होणार...

किल्लारी कारखाना कर्जमुक्त करण्यात आल्याने तो सुरू होण्यासाठी गती मिळाली आहे. यंदा कारखान्यातील मशिनरींची दुरुस्ती करून घेण्यात येईल. पुढील हंगामात कारखाना सुरू होणार असल्याचे अवसायक मंडळाचे विजयकुमार सोनवणे, केशव ऊर्फ बाबा पाटील यांनी सांगितले.

यापुढेही मदत...

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अधिकारी विवेकानंद देशमुख म्हणाले, हा कारखाना सुरू करण्यासाठी पुढेही मदत व सहकार्य केले जाईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील.