शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

प्रवेश क्षमता ४१०४० जागांची; विद्यार्थी ४०१२२ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

लातूर : अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात ४१ हजार ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, दहावी उत्तीर्ण ...

लातूर : अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात ४१ हजार ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४० हजार १२२ आहे. या सर्व जागांवर प्रवेश दिला तरी ९१८ जागा रिक्त राहू शकतात. शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटीचा पर्याय ठेवला असला तरी दहावीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने अकरावी प्रवेशाच्या अनेक जागा रिक्त राहू शकतात. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाकडून २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. २६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. ही अकरावी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असून, एकूण चार विषयांवर प्रत्येकी २५ मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे. इंग्रजी, विज्ञान भाग-१,२, गणित भाग १,२ आणि सामाजिक शास्त्रावर पर्यायी उत्तरावर प्रत्येकी २५ गुणांची परीक्षा होणार आहे. शंभर गुणांसाठी शंभर प्रश्न असणार आहेत. या परीक्षेची विभागीय शिक्षण मंडळाने तयारी केली असून, तालुक्याच्या ठिकाणी तसेच परीक्षार्थ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी दिलेल्या पत्त्याचा विचार करून केंद्र दिले जाणार आहेत.

सीईटी वेबसाईट हँग

सीईटी वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने ती बंद आहे. राज्य मंडळाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत दुरुस्ती पूर्ण होणार आहे. शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील. चार विषयांवर बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास करावा.

चार विषयासाठी शंभर गुणांची परीक्षा

अकरावी प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी २१ ऑगस्टला होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण चार विषय राहणार आहेत. इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामाजिकशास्त्र हे विषय आहेत. प्रत्येक विषयाचे २५ प्रश्न विचारले जातील. एकूण शंभर गुणांची ही परीक्षा असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा संपताच उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिली जाणार आहे.

दहावी पास विद्यार्थी ४०१२२

अकरावीसाठी एकूण जागा ४०१२२

कला शाखा १६२००

वाणिज्य ५०४०

विज्ञान १७६४०

संयुक्त २१६०