शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

प्रवेश क्षमता ४१०४० जागांची; विद्यार्थी ४०१२२ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

लातूर : अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात ४१ हजार ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, दहावी उत्तीर्ण ...

लातूर : अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात ४१ हजार ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४० हजार १२२ आहे. या सर्व जागांवर प्रवेश दिला तरी ९१८ जागा रिक्त राहू शकतात. शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटीचा पर्याय ठेवला असला तरी दहावीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने अकरावी प्रवेशाच्या अनेक जागा रिक्त राहू शकतात. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाकडून २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. २६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. ही अकरावी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असून, एकूण चार विषयांवर प्रत्येकी २५ मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे. इंग्रजी, विज्ञान भाग-१,२, गणित भाग १,२ आणि सामाजिक शास्त्रावर पर्यायी उत्तरावर प्रत्येकी २५ गुणांची परीक्षा होणार आहे. शंभर गुणांसाठी शंभर प्रश्न असणार आहेत. या परीक्षेची विभागीय शिक्षण मंडळाने तयारी केली असून, तालुक्याच्या ठिकाणी तसेच परीक्षार्थ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी दिलेल्या पत्त्याचा विचार करून केंद्र दिले जाणार आहेत.

सीईटी वेबसाईट हँग

सीईटी वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने ती बंद आहे. राज्य मंडळाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत दुरुस्ती पूर्ण होणार आहे. शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील. चार विषयांवर बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास करावा.

चार विषयासाठी शंभर गुणांची परीक्षा

अकरावी प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी २१ ऑगस्टला होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण चार विषय राहणार आहेत. इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामाजिकशास्त्र हे विषय आहेत. प्रत्येक विषयाचे २५ प्रश्न विचारले जातील. एकूण शंभर गुणांची ही परीक्षा असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा संपताच उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिली जाणार आहे.

दहावी पास विद्यार्थी ४०१२२

अकरावीसाठी एकूण जागा ४०१२२

कला शाखा १६२००

वाणिज्य ५०४०

विज्ञान १७६४०

संयुक्त २१६०