शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

प्रवेश क्षमता ४१०४० जागांची; विद्यार्थी ४०१२२ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

लातूर : अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात ४१ हजार ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, दहावी उत्तीर्ण ...

लातूर : अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात ४१ हजार ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून, दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४० हजार १२२ आहे. या सर्व जागांवर प्रवेश दिला तरी ९१८ जागा रिक्त राहू शकतात. शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटीचा पर्याय ठेवला असला तरी दहावीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने अकरावी प्रवेशाच्या अनेक जागा रिक्त राहू शकतात. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाकडून २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. २६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. ही अकरावी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असून, एकूण चार विषयांवर प्रत्येकी २५ मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे. इंग्रजी, विज्ञान भाग-१,२, गणित भाग १,२ आणि सामाजिक शास्त्रावर पर्यायी उत्तरावर प्रत्येकी २५ गुणांची परीक्षा होणार आहे. शंभर गुणांसाठी शंभर प्रश्न असणार आहेत. या परीक्षेची विभागीय शिक्षण मंडळाने तयारी केली असून, तालुक्याच्या ठिकाणी तसेच परीक्षार्थ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी दिलेल्या पत्त्याचा विचार करून केंद्र दिले जाणार आहेत.

सीईटी वेबसाईट हँग

सीईटी वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने ती बंद आहे. राज्य मंडळाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत दुरुस्ती पूर्ण होणार आहे. शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येतील. चार विषयांवर बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास करावा.

चार विषयासाठी शंभर गुणांची परीक्षा

अकरावी प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी २१ ऑगस्टला होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण चार विषय राहणार आहेत. इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामाजिकशास्त्र हे विषय आहेत. प्रत्येक विषयाचे २५ प्रश्न विचारले जातील. एकूण शंभर गुणांची ही परीक्षा असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा संपताच उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी दिली जाणार आहे.

दहावी पास विद्यार्थी ४०१२२

अकरावीसाठी एकूण जागा ४०१२२

कला शाखा १६२००

वाणिज्य ५०४०

विज्ञान १७६४०

संयुक्त २१६०