शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर्व अंगणवाड्या सुरु करण्यासाठी प्रशासनाचा दबाव, कर्मचाऱ्यांचे झेडपीसमोर धरणे आंदोलन

By हरी मोकाशे | Updated: January 8, 2024 18:02 IST

कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न...

लातूर : अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान, प्रशासन दबावतंत्राचा वापर करुन अंगणवाड्या सुरु करण्यास भाग पाडत आहे, असा आरोप करीत सेविका व मदतनीसांनी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत धरणे आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणा देत सरकारच्या धोरणावर संताप व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राज्य संघटक दत्ता देशमुख, बापू शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाले होते. अंगणवाडी सेविका, मदतनीसांना शासकीय कर्मचारी घोषित करुन त्याअनुषंगाने वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्यनिर्वाह निधीचा लाभ द्यावा. सेविकांना मासिक २६ हजार तर मदतनिसांना मासिक २० हजार मानधन देण्यात यावे. आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६ तर अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये असा करावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या नोटिसा मागे घेऊन त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करु नये अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेस देण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न...अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. सोमवारी संपाचा ३६ वा दिवस आहे. त्यामुळे लाभार्थी पोषण आहार, शालेय पूर्व शिक्षण व इतर लाभापासून वंचित राहत आहेत. शासनाने तोडगा काढला असता तर संप इतके दिवस लांबला नसता. दरम्यान, प्रशासनाकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. मात्र, शासन व प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक चर्चा करुन प्रश्न सोडवावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन