शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गावात दिवसभरातून येते एकाचवेळी बस; विद्यार्थ्यांना टपावरुन करावा लागतोय जीवघेणा प्रवास

By हरी मोकाशे | Updated: September 19, 2022 20:22 IST

लॉकडाऊननंतर आगाराने या मार्गावर दिवसभरातून केवळ एकच बस सुरु केली आहे.

लातूर : अहमदपूर तालुक्यातील कुमठा बु. व परिसरातील गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिरुर ताजबंद, अहमदपूरला दररोज जावे लागते. परंतु, या गावास सध्या एकच एसटी बस असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन बसच्या टपावरुन प्रवास करावा लागत आहे.

अहमदपूर तालुक्यातील कुमठा बु. छोटेसे गाव आहे. गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा असली तरी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिरुर ताजबंद अथवा अहमदपूरला जावे लागते. तसेच परिसरातील शिवणखेड, मोरतळवाडी, सय्यदपूर, वायगाव येथील विद्यार्थ्यांनाही माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणासाठी शिरुर, अहमदपूरला जावे लागते. कोविडच्या प्रादुर्भावापूर्वी शिरुर ताजबंद ते शिवणखेड अशी दर तास बस हाेती. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांची सोय होत होती.

लॉकडाऊननंतर आगाराने या मार्गावर दिवसभरातून केवळ एकच बस सुरु केली आहे. उर्वरित बस बंद केल्या. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच नागरिकांना विविध कामांसाठी शिरुर, अहमदपूरला ये- जा करण्यासाठी मोठी अडचण येत आहे. बहुतांशवेळा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विद्यार्थ्यांना दररोज खाजगी वाहनाने शाळेसाठी जाणे परवडत नाही. त्यामुळे गावात बस आली की बसमध्ये चढण्यासाठी तोबा गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, बसमध्ये उभारण्यासाठीही जागा नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन टपावर बसून प्रवास करावा लागत आहे.

तात्काळ बस सुरु करावी...एकच बस असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. त्यामुळे गावासाठी किमान आणखीन एक बस सुरु करावी. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असे सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्रसिंह बयास यांनी सांगितले. यासंदर्भात तहसीलदार, आगारप्रमुखांना निवेदनही दिले आहे. दरम्यान, अहमदपूरचे आगारप्रमुख शंकर सोनवणे म्हणाले, या मार्गावर लवकरच बससेवा सुरु करुन विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यात येईल.

टॅग्स :laturलातूरEducationशिक्षण