शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Killari Earthquake : २५ वर्षांत बसले भूकंपाचे ९९ धक्के, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतही घडली होती घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:25 IST

Killari Earthquake : २००७ मध्ये सर्वाधिक १७ वेळा भूकंप 

राजकुमार जोंधळे

लातूर : १९९३ च्या भूकंपानंतर मराठवाड्यात भूकंप कसा असतो, याची माहिती सर्वश्रुत झाली. २५ वर्षांत मराठवाड्यात भूकंपाचे ९९ धक्के बसले. त्यात सर्वाधिक २००७ मध्ये १७ वेळा भूकंप झाल्याची नोंद लातूरच्या भूकंप मापक केंद्रात झाली.

जमिनीतून आवाज आणि भूभागाला बसणारे धक्के म्हणजे भूकंप, हे किल्लारी परिसराला माहीत होते. परंतु, ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने मांडलेला विध्वंस ज्यांनी पाहिला, त्यांना नेमके काय घडले हेच कळत नव्हते. जमीन हादरली. क्षणार्धात घरे कोसळली. आकाशात मातीच्या धुळीचे लोट पसरले. त्यानंतरही भूकंपाची मालिका कैक वर्षे सुरू राहिली. त्यामुळे लातूरमध्ये शासकीय भूकंप वेधशाळा उभी राहिली. गेल्या २५ वर्षांत या वेधशाळेत ५०० किलोमीटर परिघातील ९९ धक्क्यांची नोंद झाली आहे. यामध्ये लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वाधिक ४८ धक्के बसले. १९९९ मध्ये ११ धक्के, २००० मध्ये ५ धक्के, २००३ मध्ये ५ धक्के, २००४ मध्ये ७ धक्के, २००५ मध्ये १० धक्के, २००६ मध्ये ५ धक्के, २००८ मध्ये २ धक्के, २००९ मध्ये ७ धक्के, २०१० ते ११ मध्ये १२ धक्के, २०१२ ते १८ या कालावधीत १५ धक्क्यांची नोंद आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यापाठोपाठ मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यांनाही अलिकडे भूकंपाचे धक्के जाणवले. केवळ किल्लारी परिसरातील भूकंपाची चर्चा कानी असलेल्या नांदेड-हिंगोली जिल्ह्यालाही भूकंपाचे धक्के बसले. २००७ मध्ये नांदेड शहर आणि जिल्ह्यात १० धक्के बसले. २०१६ आणि २०१७ मध्ये हिंगोली जिल्ह्यात २ धक्के जाणवले. ३० सप्टेंबर १९९३ ते १३ सप्टेंबर २०१८ या २५ वर्षांच्या कालावधीत २००७ मध्ये सर्वाधिक १७ धक्के लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील किल्लारी-लोहारा-उमगरा परिसराला बसले. तर १९९९ साली ११ धक्के जाणवले. त्याशिवाय २००१ मध्ये केवळ १ धक्क्याची नोंद आहे. तर २००२ मध्ये २ धक्क्यांची नोंद आहे.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर