शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

Killari Earthquake : २५ वर्षांत बसले भूकंपाचे ९९ धक्के, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतही घडली होती घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:25 IST

Killari Earthquake : २००७ मध्ये सर्वाधिक १७ वेळा भूकंप 

राजकुमार जोंधळे

लातूर : १९९३ च्या भूकंपानंतर मराठवाड्यात भूकंप कसा असतो, याची माहिती सर्वश्रुत झाली. २५ वर्षांत मराठवाड्यात भूकंपाचे ९९ धक्के बसले. त्यात सर्वाधिक २००७ मध्ये १७ वेळा भूकंप झाल्याची नोंद लातूरच्या भूकंप मापक केंद्रात झाली.

जमिनीतून आवाज आणि भूभागाला बसणारे धक्के म्हणजे भूकंप, हे किल्लारी परिसराला माहीत होते. परंतु, ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने मांडलेला विध्वंस ज्यांनी पाहिला, त्यांना नेमके काय घडले हेच कळत नव्हते. जमीन हादरली. क्षणार्धात घरे कोसळली. आकाशात मातीच्या धुळीचे लोट पसरले. त्यानंतरही भूकंपाची मालिका कैक वर्षे सुरू राहिली. त्यामुळे लातूरमध्ये शासकीय भूकंप वेधशाळा उभी राहिली. गेल्या २५ वर्षांत या वेधशाळेत ५०० किलोमीटर परिघातील ९९ धक्क्यांची नोंद झाली आहे. यामध्ये लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याला सर्वाधिक ४८ धक्के बसले. १९९९ मध्ये ११ धक्के, २००० मध्ये ५ धक्के, २००३ मध्ये ५ धक्के, २००४ मध्ये ७ धक्के, २००५ मध्ये १० धक्के, २००६ मध्ये ५ धक्के, २००८ मध्ये २ धक्के, २००९ मध्ये ७ धक्के, २०१० ते ११ मध्ये १२ धक्के, २०१२ ते १८ या कालावधीत १५ धक्क्यांची नोंद आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यापाठोपाठ मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यांनाही अलिकडे भूकंपाचे धक्के जाणवले. केवळ किल्लारी परिसरातील भूकंपाची चर्चा कानी असलेल्या नांदेड-हिंगोली जिल्ह्यालाही भूकंपाचे धक्के बसले. २००७ मध्ये नांदेड शहर आणि जिल्ह्यात १० धक्के बसले. २०१६ आणि २०१७ मध्ये हिंगोली जिल्ह्यात २ धक्के जाणवले. ३० सप्टेंबर १९९३ ते १३ सप्टेंबर २०१८ या २५ वर्षांच्या कालावधीत २००७ मध्ये सर्वाधिक १७ धक्के लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील किल्लारी-लोहारा-उमगरा परिसराला बसले. तर १९९९ साली ११ धक्के जाणवले. त्याशिवाय २००१ मध्ये केवळ १ धक्क्याची नोंद आहे. तर २००२ मध्ये २ धक्क्यांची नोंद आहे.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर