शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरातील ३० प्रकल्पांत ९१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST

अहमदपूर : महिनाभराच्या कालावधीत उघडीप दिलेल्या पावसाने अहमदपूर परिसरात दमदार हजेरी लावल्यानेे तालुक्यातील ३० पैकी १९ प्रकल्प १०० टक्के ...

अहमदपूर : महिनाभराच्या कालावधीत उघडीप दिलेल्या पावसाने अहमदपूर परिसरात दमदार हजेरी लावल्यानेे तालुक्यातील ३० पैकी १९ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तालुक्यातील प्रकल्पांत ९१ टक्के पाणीसाठा झाला असून, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामास मदत होणार आहे.

अहमदपूर तालुक्यात मोघा लघुसाठवण, थोडगा, सावरगाव थोट तलाव, तांबट सांगवी, मावलगाव, खंडाळी, हागदळ, गुगदळ, नागझरी साठवण तलाव; तर सोनखेड, धसवाडी, अंधोरी, ढाळेगाव, हंगेवाडी, येलदरी, कोपरा, भुतेकरवाडी, गौताळाल, काळेगाव, अहमदपूर. वाकी, येस्तार, मोळवण, कावळवाडी, नागठाणा, उगीलेवाडी, पाटोदा, तेलगाव, कौडगाव असे लघू, मध्यम व साठवण असे ३० प्रकल्प आहेत. तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने परिसरातील मोघा, सावरगाव थोट, तांबट सांगवी, मावलगाव, हगदळ, गुगदळ, नागझरी, सोनखेड, ढाळेगाव, येस्तार, कावळवाडी, हांगेवाडी, यलदरी, कोपरा, नागठाणा, उगिलेवाडी, पाटोदा, कौडगाव, केंद्रेवाडी, अहमदपूर प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. मात्र यंदा पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षेतच ठेवले होते. पावसाने ओढ दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या काळजीत भर पाडली होती. पावसाच्या पाण्याची ओढ बसल्यामुळे पिके हातची जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे. हा पाऊस जनावरांच्या चाऱ्यालाही फायदेशीर आहे; यामुळे दूध व्यावसायिकही सुखावले आहेत. तालुक्यातील प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रातदेखील वाढ होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाने अहमदपूर तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने नदी-नाल्यांना पूर आल्याने तालुक्यातील ३० लघू, मध्यम प्रकल्प व साठवण तलावांत सरासरी ९१ टक्के जलसाठा असून, ११ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ५० टक्क्यांवर आहे. झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामासाठी मदत होणार आहे.

पावसामुळे पशुपालकांनाही मिळाला दिलासा

तालुक्यात पशुुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पावसामुळे पशुधनाला हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. सोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. दरम्यान, पावसामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांना प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने सिंचनासाठी मदत होणार आहे.

रब्बी हंगामासाठी होणार फायदा

तालुक्यातील बरेच तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामातील रब्बी पिकांचे, उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तलाव भरल्यामुळे विहिरींची, बोअरवेलची पाणीपातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

- प्रवीण लांजे, शेतकरी