शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

अहमदपुरातील ३० प्रकल्पांत ९१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST

अहमदपूर : महिनाभराच्या कालावधीत उघडीप दिलेल्या पावसाने अहमदपूर परिसरात दमदार हजेरी लावल्यानेे तालुक्यातील ३० पैकी १९ प्रकल्प १०० टक्के ...

अहमदपूर : महिनाभराच्या कालावधीत उघडीप दिलेल्या पावसाने अहमदपूर परिसरात दमदार हजेरी लावल्यानेे तालुक्यातील ३० पैकी १९ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तालुक्यातील प्रकल्पांत ९१ टक्के पाणीसाठा झाला असून, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामास मदत होणार आहे.

अहमदपूर तालुक्यात मोघा लघुसाठवण, थोडगा, सावरगाव थोट तलाव, तांबट सांगवी, मावलगाव, खंडाळी, हागदळ, गुगदळ, नागझरी साठवण तलाव; तर सोनखेड, धसवाडी, अंधोरी, ढाळेगाव, हंगेवाडी, येलदरी, कोपरा, भुतेकरवाडी, गौताळाल, काळेगाव, अहमदपूर. वाकी, येस्तार, मोळवण, कावळवाडी, नागठाणा, उगीलेवाडी, पाटोदा, तेलगाव, कौडगाव असे लघू, मध्यम व साठवण असे ३० प्रकल्प आहेत. तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने परिसरातील मोघा, सावरगाव थोट, तांबट सांगवी, मावलगाव, हगदळ, गुगदळ, नागझरी, सोनखेड, ढाळेगाव, येस्तार, कावळवाडी, हांगेवाडी, यलदरी, कोपरा, नागठाणा, उगिलेवाडी, पाटोदा, कौडगाव, केंद्रेवाडी, अहमदपूर प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. या पावसामुळे तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. मात्र यंदा पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षेतच ठेवले होते. पावसाने ओढ दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांच्या काळजीत भर पाडली होती. पावसाच्या पाण्याची ओढ बसल्यामुळे पिके हातची जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पावसाने पुनरागमन केल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे. हा पाऊस जनावरांच्या चाऱ्यालाही फायदेशीर आहे; यामुळे दूध व्यावसायिकही सुखावले आहेत. तालुक्यातील प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रातदेखील वाढ होणार आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाने अहमदपूर तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने नदी-नाल्यांना पूर आल्याने तालुक्यातील ३० लघू, मध्यम प्रकल्प व साठवण तलावांत सरासरी ९१ टक्के जलसाठा असून, ११ प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ५० टक्क्यांवर आहे. झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामासाठी मदत होणार आहे.

पावसामुळे पशुपालकांनाही मिळाला दिलासा

तालुक्यात पशुुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पावसामुळे पशुधनाला हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. सोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. दरम्यान, पावसामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांना प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने सिंचनासाठी मदत होणार आहे.

रब्बी हंगामासाठी होणार फायदा

तालुक्यातील बरेच तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामातील रब्बी पिकांचे, उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तलाव भरल्यामुळे विहिरींची, बोअरवेलची पाणीपातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

- प्रवीण लांजे, शेतकरी