शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

कोरोना संसर्ग ओसरल्यानंतरही जिल्ह्यातील ८६ टक्के शाळा बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST

लातूर : ग्रामीण भागातील काही माध्यमिक शाळा सुरु असून, शहरात मात्र, शाळा बंदच आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी ...

लातूर : ग्रामीण भागातील काही माध्यमिक शाळा सुरु असून, शहरात मात्र, शाळा बंदच आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी झाला असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ ०.८० टक्के आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांप्रमाणे शहरातील शाळा सुरु करण्याची मागणी होत असून, कोरोना ओसरल्यानंतरही जिल्ह्यातील ८६ टक्के शाळा बंदच आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण कधी मिळणार असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या एकूण २ हजार ५७० शाळा आहेत. यामध्ये माध्यमिकच्या ७७८ शाळांचा समावेश असून, यापैकी १०५ शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग घेतले जात आहेत. तर शहरातील शाळा बंदच आहेत. कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये आठवी नंतरचे वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी झाला आहे. तरीही शहरातील शाळांमध्ये अजूनही ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. शहरातील विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देण्याबाबत राज्य शासनाच्या आदेश आणि शिक्षण विभागाच्या सूचना नसल्याने शाळा प्रशासनाला आदेशाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, प्रत्यक्ष ऑफलाईन वर्ग सुरु करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले...

गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ऑनलाईन शिक्षणात मुलांना एकाच खोलीत मोबाईल समोर दिवसभर बसून रहावे लागते. शहरी भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला कंटाळले असून, त्यांना ऑफलाईनची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, अनेक मुलांना सततच्या मोबाईलच्या वापरामुळे डोळेदुखी, चिडचिडेपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आतापर्यंत १०५ शाळांची वाजली घंटा...

जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यात माध्यमिकच्या १०५ शाळा सुरु झाल्या आहेत. यामध्ये १० हजाराहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत वर्ग सुरु आहेत. याच नियमानुसार शहरातील शाळा सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी देण्याची मागणी विद्यार्थी, पालकांमधून होत असल्याचे मुख्याध्यापक गोविंद शिंदे यांनी सांगितले.

ग्रामीण भागामध्ये विद्यार्थांचा प्रतिसाद...

ग्रामीण भागातील काही शाळा नियमित सुरु आहे. वर्गामध्ये ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण समाधानकारक आहे. काेविड नियमांचे पालन करीत शाळा सुरु आहे. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- प्रकाश देशमुख, मुख्याध्यापक संघ

शहरातील शाळा सुरु करण्याची गरज...

गेल्या दीड वर्षांपासून शहरातील शाळा बंदच आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ग्रामीण भागात ज्या पद्धतीने कोविड नियमांचे पालन करीत शाळा सुरु आहेत. त्याच धर्तीवर शहरातील शाळा सुरु करण्यास परवानगी द्यावी. शासनाच्या कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

- श्रीनिवास जाधव, मुख्याध्यापक

जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या...

पहिली - ४२१५७

दुसरी - ४६०२८

तिसरी - ४६८४७

चौथी - ४७०००

पाचवी - ४७८६०

सहावी - ४८९४५

सातवी - ४८३८३

आठवी - ४७४५४

नववी - ४८४६८

दहावी - ४७३१८

अकरावी ५ ३६५८९

बारावी - ३२८९९