शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

कोरोना संसर्ग ओसरल्यानंतरही जिल्ह्यातील ८६ टक्के शाळा बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:23 IST

लातूर : ग्रामीण भागातील काही माध्यमिक शाळा सुरु असून, शहरात मात्र, शाळा बंदच आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी ...

लातूर : ग्रामीण भागातील काही माध्यमिक शाळा सुरु असून, शहरात मात्र, शाळा बंदच आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी झाला असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ ०.८० टक्के आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांप्रमाणे शहरातील शाळा सुरु करण्याची मागणी होत असून, कोरोना ओसरल्यानंतरही जिल्ह्यातील ८६ टक्के शाळा बंदच आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण कधी मिळणार असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या एकूण २ हजार ५७० शाळा आहेत. यामध्ये माध्यमिकच्या ७७८ शाळांचा समावेश असून, यापैकी १०५ शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग घेतले जात आहेत. तर शहरातील शाळा बंदच आहेत. कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये आठवी नंतरचे वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले असून, कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी झाला आहे. तरीही शहरातील शाळांमध्ये अजूनही ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. शहरातील विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देण्याबाबत राज्य शासनाच्या आदेश आणि शिक्षण विभागाच्या सूचना नसल्याने शाळा प्रशासनाला आदेशाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, प्रत्यक्ष ऑफलाईन वर्ग सुरु करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले...

गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ऑनलाईन शिक्षणात मुलांना एकाच खोलीत मोबाईल समोर दिवसभर बसून रहावे लागते. शहरी भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला कंटाळले असून, त्यांना ऑफलाईनची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, अनेक मुलांना सततच्या मोबाईलच्या वापरामुळे डोळेदुखी, चिडचिडेपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आतापर्यंत १०५ शाळांची वाजली घंटा...

जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यात माध्यमिकच्या १०५ शाळा सुरु झाल्या आहेत. यामध्ये १० हजाराहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत वर्ग सुरु आहेत. याच नियमानुसार शहरातील शाळा सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी देण्याची मागणी विद्यार्थी, पालकांमधून होत असल्याचे मुख्याध्यापक गोविंद शिंदे यांनी सांगितले.

ग्रामीण भागामध्ये विद्यार्थांचा प्रतिसाद...

ग्रामीण भागातील काही शाळा नियमित सुरु आहे. वर्गामध्ये ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण समाधानकारक आहे. काेविड नियमांचे पालन करीत शाळा सुरु आहे. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- प्रकाश देशमुख, मुख्याध्यापक संघ

शहरातील शाळा सुरु करण्याची गरज...

गेल्या दीड वर्षांपासून शहरातील शाळा बंदच आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ग्रामीण भागात ज्या पद्धतीने कोविड नियमांचे पालन करीत शाळा सुरु आहेत. त्याच धर्तीवर शहरातील शाळा सुरु करण्यास परवानगी द्यावी. शासनाच्या कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

- श्रीनिवास जाधव, मुख्याध्यापक

जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या...

पहिली - ४२१५७

दुसरी - ४६०२८

तिसरी - ४६८४७

चौथी - ४७०००

पाचवी - ४७८६०

सहावी - ४८९४५

सातवी - ४८३८३

आठवी - ४७४५४

नववी - ४८४६८

दहावी - ४७३१८

अकरावी ५ ३६५८९

बारावी - ३२८९९