शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पावसाची उघडीप, निलंगा तालुक्यातील सोयाबीनचे ६० टक्के नुकसान

By संदीप शिंदे | Updated: August 31, 2023 18:20 IST

१०० गावात रॅन्डम सर्वे; कृषी, विमा कंपनीचा प्राथमिक पाहणी अहवाल

औराद शहाजानी : गेल्या महिनाभरापासून तालुक्यात पावसाने उघडीप दिली असून, खरीपातील पिके हातातून गेली आहेत. शासनाने पावसाचा २१ दिवसांचा खंड असल्यास रॅन्डम सर्वेक्षण करुन २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाला आदेशित केले आहे. त्यानुसार तालुक्यातील ३ मंडळातील १०० गावात कृषी विभाग व पिकविमा कंपनीकडून करण्यात आलेल्या पाहणी खरीप पिकांचे ६० टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

निलंगा तालुक्यातील तीन कृषी मंडळातील व दहा महसूल मंडळातील १०० गावातील ३ हजार ९४७ हेक्टर सोयाबीनचा रॅन्डम सर्वे करण्यात आला. यात जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. निलंगा, औराद व कासार शिरसी अशी तीन कृषी मंडळ आहेत. यात दहा महसुल मंडळे असून, यामध्ये औराद, हलगरा, कासार बालकुंदा, निलंगा, मदनसुरी, भूतमुगळी, कासारशिरसी, अंबुलगा, निटूर, पानचिंचोली या महसूल मंडळातील प्रत्येकी दहा गावाप्रमाणे शंभर गावे रॅडम पद्धतीने निवडण्यात आली होती. तालुक्यात ६९ हजार ५११ हेक्टवर साेयाबीन पेरा करण्यात आला आहे.

कृषी, विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतात...ऑगस्ट महिना काेरडा गेल्याने खरीप पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. शासनाने कृषी विभाग व विमा प्रतिनिधी यांना संयुक्त नुकसानीची पाहणी करून २५ टक्के नुकसान भरपाई पहिल्या टप्प्यात देण्यासाठी प्रक्रिया राबवण्यासाठी आदेशित केले हाेते. याप्रमाणे निलंगा तालुका कृषी अधिकारी अनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी सुनील घारोळे, आर.एम. राठोड यांच्यासह सहा कृषी पर्यवेक्षक, ३६ कृषी सहाय्यक, दहा विमा कंपनीचे प्रतिनिधी या टीमने २२ ते ३० ऑगस्टदरम्यान शेतात जाऊन रॅडम नुकसानीचा सर्वे केला. यात प्राथमिक अंदाजाप्रमाणे सोयाबीनचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे तालुका कृषी अधिकारी अनिल शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसlaturलातूर