शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

५११ ग्रामसेवकांना जि.प.कडून नोटिसा

By admin | Updated: July 6, 2014 00:25 IST

लातूर : जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरु केल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची विविध प्रमाणपत्रांसाठी गैरसोय होत आहे़

लातूर : जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरु केल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची विविध प्रमाणपत्रांसाठी गैरसोय होत आहे़ ही गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक कंत्राटी ग्रामसेवकावर १० ते १२ गावांच्या कारभाराचा भार टाकण्यात आला असला तरी तो अपुरा पडत आहे़ दरम्यान, जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामसेवकांना सात दिवसांत कामावर हजर राहण्याच्या सूचना देत नोटिसा बजावल्या आहेत़जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये ७८७ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी शंभर ग्रामविकास अधिकारी, ४११ ग्रामसेवक आहेत़ या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आणि ग्रामसेवकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे़ त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांवर होत असल्याचे दिसून येत आहे़ दहावी, बारावी आणि इतर वर्गांच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे़ त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता सध्या विद्यार्थ्यांची धावपळ सुरु आहे़ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ग्रामपंचायतीच्या विविध कागदपत्रांची आवश्यकता असते़ त्याचबरोबर पावसाने ताण दिल्याने टंचाईने तीव्र रुप धारण केले आहे़ त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ तसेच निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच संपुष्टात आली आहे़ आचारसंहितेमुळे अनेक प्रशासकीय कामे खोळंबली आहेत़ अशा परिस्थितीत ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन पुकारले असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी अडचण होत आहे़ विशेष म्हणजे, ग्रामपंचायतींच्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या कमी असल्याने प्रत्येक ग्रामसेवकाकडे किमान दोन ग्रामपंचायतींचा कारभार आहे़ त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना ग्रामसेवकाच्या कागदपत्रासाठी प्रतीक्षा करावी लागत असे़ आता ग्रामसेवकांच्या काम बंद आंदोलनामुळे तर मोठी गैरसोय होत आहे़ परिणामी, ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतींचे दोन दिवसांपासून कुलूपही उघडेनासे झाले आहे़ विविध कामानिमित्ताने नागरिकांचे हेलपाटे सुरु आहेत़ दरम्यान, प्रशासनाने त्याची दखल घेत काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले़ त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ग्रामसेवकांना शुक्रवारी नोटिसा बजावल्या आहेत़(वार्ताहर)नागरिकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून जिल्ह्यातील २३ विस्तार अधिकारी आणि ९७ कंत्राटी ग्रामसेवकांवर अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे़ प्रत्येक कंत्राटी ग्रामसेवकास किमान १०- १२ गावांचे काम पहावे लागत आहे़ तसेच पंचायत समितीच्या फलकावर तात्पुरत्या ग्रामसेवकांची यादी डकविण्यात आली आहे़ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांची वेतन त्रुटी दूर करावी, ग्रामपंचायतस्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरु करावी़, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून ग्राह्य धरावा़, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे़, प्रवासभत्ता वेतनासोबत ३ हजार रुपये करावा़ आंदोलनात सहभागी झालेले ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत़ ७ दिवसांत कामावर हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ संजय तुबाकले यांनी सांगितले़