शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही हरभरा हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ

By हरी मोकाशे | Updated: June 22, 2023 19:40 IST

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात.

लातूर : हरभरा खरेदीसाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यासाठी २४ हजार ५०७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार ९६८ शेतकऱ्यांनी केंद्रावर हरभरा विक्री केला. उर्वरित ५ हजार ५३९ शेतकरी केंद्राकडे आलेच नाहीत. या शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी आणावा म्हणून केंद्र चालकांनी पाठपुरावा केला. मात्र, शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो. दरम्यान, गत पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली होती. त्यामुळे रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला होता.

नाफेडच्या वतीने जिल्ह्यात १५ फेब्रुवारी ते ११ जून या कालावधीत हरभरा खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले होते. तत्पूर्वी हरभरा विक्रीसाठी जिल्ह्यातील २४ हजार ५०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात मात्र १८ हजार ९६८ शेतकऱ्यांनी हरभरा विक्री केली आहे.

१४५ कोटींचा हरभरा खरेदी...नाफेडच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यात जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत १८ हजार ९६८ शेतकऱ्यांचा २ लाख ७२ हजार ८३७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. खरेदी केलेला हरभरा हा १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार ४४५ रुपये किमतीचा आहे.

दीड कोटी रक्कम थकीत...हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या १८ हजार ९६८ शेतकऱ्यांपैकी १८ हजार ८१४ शेतकऱ्यांना १४४ कोटी १३ लाख ६७ हजार ६२० रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. अद्यापही १५४ शेतकऱ्यांचे १ कोटी ४३ लाख ७७ हजार ८२५ रुपये थकीत राहिले आहेत. ११ जूनपासून हमीभाव खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहेत.

बी-बियाणे, खते खरेदी करणे कठीण...खुल्या बाजारपेठेत कमी भाव असल्याने आम्ही हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री केली. हरभरा विक्री करून जवळपास दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, अद्यापही रक्कम मिळाली नाही. खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदी करणे कठीण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर...यंदाच्या हंगामात जिल्ह्यात १८ हजार ९६८ शेतकऱ्यांचा २ लाख ७२ हजार ८३७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्याची रक्कम १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार आहे. १५४ शेतकऱ्यांचे १ कोटी ४३ लाख थकीत राहिले आहेत. ते लवकरात लवकर मिळावेत म्हणून पाठपुरावा सुरू आहे. तसेच जवळपास साडेपाच हजार शेतकऱ्यांनी केंद्रावर हरभरा विक्री केला नाही. त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.- विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी