शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
14
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
15
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
16
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
17
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
18
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
19
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
20
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी

कैद्यांनी पिकवलेल्या शेतीतून मिळाला ४५० जणांना दोनवेळच्या जेवणाचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : शहरालगत असलेल्या नांदगाव येथील जिल्हा कारागृहात सध्याला ४५० बंदीवान आहेत. त्यामध्ये ४२६ पुरुष आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : शहरालगत असलेल्या नांदगाव येथील जिल्हा कारागृहात सध्याला ४५० बंदीवान आहेत. त्यामध्ये ४२६ पुरुष आणि २४ महिलांचा समावेश आहे. कारागृहातील कैद्यांनी तुरुंगाच्या आवारातील दहा एकर शेती मेहनतीच्या बळावर फुलवली. याच शेतीने ४५० जणांना दोनवेळच्या भाकरीचा आधार दिला आहे.

दहा वर्षांपूर्वी लातूर येथे स्वतंत्र जिल्हा कारागृह अस्तित्वात आले. यापूर्वी उस्मानाबाद कारागृहात लातूर जिल्ह्यातील आरोपींना ठेवावे लागत होते. आता लातूरला कारागृह झाल्याने उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या कारागृहांची गरज भासत नाही. लातूर कारागृहाला दहा एकरची शेती आहे. यामध्ये कैद्यांच्या मेहनतीतून भोपळा, वांगी, भेंडी, टोमॅटो, दुधी भोपळा, पालक, कोथिंबीर, शेपू, मेथी असा भाजीपाला घेण्यात येतो. यातूनच कारागृहातील बंदीवानांना दोनवेळच्या भाकरीचा आधार मिळत आहे.

काय बनवले जाते

भाजीपाला : कारागृहातील दहा एकरावरील शेतीत दरवर्षी सोयाबीनबरोबर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते.

शिवणकाम : कारागृहातील कैद्यांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या माध्यमातून भविष्यात विविध उत्पादने केली जाणार आहेत.

मार्केटिंग : कारागृहातील शेतीत पिकवलेला भाजीपाला लातूरच्या बाजारपेठेत विक्री करून उत्पादन मिळविण्यासाठी मार्केटिंग शिकवले जाते.

कौशल्य : कारागृहातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे.

मास्क : कोरोना काळात शिवणकला आणि प्रशिक्षण बंद पडले. त्यामुळे मास्कची निर्मिती करता आली नाही.

कोरोना काळात शेती उत्पादन घटले

लातूरच्या कारागृहात असलेल्या दहा एकरावर कोरोनापूर्वी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात होते. मात्र, कोरोना काळात अनेक कैद्यांना पॅरोल रजेवर सोडण्यात आल्याने संख्या कमी झाली. त्यातून शेतीचे नियोजन कोलमडले. मात्र, आहे त्या कैद्यांच्या मेहनतीतून शेती फुलली आहे. याच भाजीपाल्यावर दोनवेळच्या जेवणाचे नियोजन करण्यात येत आहे.

अनेकजण पॅरोलवर बाहेर

लातूर कारागृहातील एकूण ४५० कैद्यांपैकी अनेकजण कोरोना काळात पॅरोल रजेवर बाहेर पडले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारागृह प्रशासनाने नियोजन केले होते.

काळजी म्हणून पॅरोलचा लाभ कैद्यांना देता आला. आता पुन्हा हे कैदी परतले आहेत. त्यांच्या मेहनतीतून शेतात भाजीपाला पिकवला जात आहे.

कारागृहाला शेती उत्पादनाचा आधार

लातूर येथील जिल्हा कारागृहाकडे एकूण दहा एकरची शेती आहे. यामध्ये भाजीपाल्यासह सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. कैद्यांसाठी बनविण्यात येणाऱ्या भोजनासाठी भाजीपाला लागतो. आता कारागृहातील शेतीतून तो मिळत आहे. अधिकचा भाजीपाला लातूरच्या भाजी मंडईत विकला जात आहे. - राहुल झुटाळे, कारागृह अधीक्षक