शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

लातूरात ४० मुख्याध्यापकांना मिळाली बढती; केंद्रप्रमुख पदाची अपेक्षापूर्ती झाल्याने आनंदोत्सव

By हरी मोकाशे | Updated: March 7, 2024 19:37 IST

जिल्हा परिषद शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात एकूण १०२ केंद्र आहेत. त्यापैकी ५० टक्के पदे ही सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, असे शासनाचे आदेश आहेत.

लातूर : जिल्हा परिषद शाळांतील ज्येष्ठ मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नतीचे वेध काही वर्षांपासून लागून होते. अखेर गुरुवारी पदोन्नतीची प्रक्रिया होऊन ४० मुख्याध्यापकांची केंद्रप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या नूतन केंद्र प्रमुखांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

जिल्हा परिषद शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात एकूण १०२ केंद्र आहेत. त्यापैकी ५० टक्के पदे ही सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार गुरुवारी पदोन्नतीची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी समिती सभागृहात पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, बाबासाहेब पवार यांच्यासह कक्ष अधिकारी गिरी आदी उपस्थित होते.

तालुका - पदोन्नतीलातूर - ४औसा - ७रेणापूर - २निलंगा - ४उदगीर - ३अहमदपूर - ७चाकूर - ५देवणी - २जळकोट - ३शिरुर अनं. - ३एकूण - ४०

६४ मुख्याध्यापकांना पदोन्नतीसाठी बोलविले...जिल्हा परिषदेत केंद्र प्रमुखांची एकूण १०२ पदे आहेत. त्यातील ५० टक्के पदे ही सेवाज्येष्ठतेनुसार तर उर्वरित ५० टक्के पदे सरळ सेवेद्वारे भरण्याचे शासनाचे आदेश आहेत. दरम्यान, १०२ पैकी ११ ठिकाणी केंद्रप्रमुख असल्याने उर्वरित ४० मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार ६४ मुख्याध्यापकांना बोलाविण्यात आले हाेते. त्यापैकी ४० जणांना पदोन्नती देण्यात आली.

सहा मुख्याध्यापकांनी नाकारली पदोन्नती...४० जागांच्या पदोन्नतीसाठी ६४ मुख्याध्यापकांना बोलाविण्यात आले असले तरी त्यापैकी ४६ जणांना संधी मिळाली. त्यातील सहा जणांनी आपली वैयक्तिक अडचणी सांगून पदोन्नती नाकारली. आपण मुख्याध्यापक म्हणून काम करण्यात समाधानी असल्याचे सांगितले.

१० वर्षांनंतर पार पडली बढती प्रक्रिया...जिल्हा परिषदेत सन २०१४ मध्ये सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांना बढती देण्यात आली होती. त्यानंतर मात्र, सातत्याने विविध अडचणी निर्माण होत होत्या. परिणामी, पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. लवकरात लवकर पदोन्नती देण्यात यावी, अशी सातत्याने मागणी होत होती.

गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार...सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया विविध अडचणींमुळे रखडली होती. आता ही प्रक्रिया पार पडली आहे. केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीमुळे त्याअंतर्गतच्या शाळांची नियमित पाहणी करण्याबरोबर तपासण्या केल्या जाणार आहेत. शिवाय, गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.- वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी.

मुख्याध्यापकांची एकमेकांकडे चौकशी...पदोन्नती प्रक्रियेमुळे जिल्हा परिषदेत मुख्याध्यापकांनी मोठी गर्दी केली होती. समुपदेशन पध्दतीने पदोन्नती प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्याध्यापक एकमेकांशी संवाद साधून नवे केंद्र आपल्याला किती जवळचे आहे, त्यासाठी कोणता चांगला, जवळचा मार्ग आहे, यासंदर्भात चर्चा करीत होते.

टॅग्स :Teacherशिक्षकlaturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद