शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

४० टक्के बसेस अद्यापही आगारातच; अनेक गावांना टमटमचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST

सध्या लातूर आगारातून वेगवेगळ्या मार्गांवरून ७० बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यातून लातूर आगाराला दिवसाकाठी ८ लाखांच्या आसपास उत्पन्न ...

सध्या लातूर आगारातून वेगवेगळ्या मार्गांवरून ७० बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यातून लातूर आगाराला दिवसाकाठी ८ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळत आहे. लॉकडाऊनपूर्वी १२ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळत होते. मात्र सद्यस्थितीत ते ८ लाखांवर आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यानंतर शंभर टक्के गाड्या सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून केले जाणार आहे.

या गावांना बसची प्रतीक्षा

सध्या जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांतही बस सुरू झालेली नाही. त्यामध्ये मोटेगाव, शेरा, पोहरेगाव, लहानेवाडी, वांजरखेडा, खरोळा, रामेश्वर आदींसह अन्य गावांचा समावेश आहे. शिवाय, ज्या मोठ्या गावांत कोरोनापूर्वी तीन-चार वेळा बसेस धावत होत्या, त्या गावात एक-दोन फेऱ्या केल्या जात आहेत. यामुळे या गावांना टमटमचा आधार शहरात येण्यासाठी घ्यावा लागत आहे.

प्रतिसाद वाढल्यानंतर बसेस सोडणार

प्रवाशांचा हळुहळू प्रतिसाद वाढत आहे. लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्याबाहेरील आणि आंतरराज्य बससेवा सुरू केलेली आहे. या बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. जिल्हाअंतर्गत मार्गावर काही गाड्या अद्याप सोडलेल्या नाहीत. प्रतिसाद वाढल्यानंतर त्या मार्गावरून लवकरच बसेस सुरू केल्या जातील, असे आगार व्यवस्थापक जाफर कुरेशी यांनी सांगितले.

बस अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे शहरात जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. खरेदी करण्यासाठी शहरात जावे लागते. परंतु, बस सुरू न झाल्यामुळे अडचण आहे. खासगी वाहनांचा आधार घेण्याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी नाही. - भागवत लांडगे, प्रवासी

आमच्या गावात पूर्वीप्रमाणे बसेस अद्याप सोडलेल्या नाहीत. त्यामुळे अडचण होते. खासगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. बस सुरू होईल, याची प्रतीक्षा आहे. महामंडळाने पूर्वीप्रमाणे गाड्या सोडल्या तर प्रवाशांची सोय होईल.

- प्रवासी