शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक

By हरी मोकाशे | Updated: July 8, 2023 17:49 IST

धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.

लातूर : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प व तलावावून दीड महिन्यात ३ लाख ३ हजार २४३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ शेतामध्ये पसरविण्यात आल्याने ७५८ एकर क्षेत्र सुपिक झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच शेतीचे उत्पन्न वाढणार आहे.

राज्यात धरण, प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. मात्र, या धरणांमध्ये दरवर्षी साठत असलेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत घट झाली आहे. धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. त्यामुळे राज्यात 'गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार' ही योजना राबविण्यास सुरुवात झाली.

यंदा अल निनोमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. यापूर्वी या योजनेत शासनाकडून केवळ इंधन खर्च देण्यात येत होता. मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरविण्यासाठीचा वाहतूक खर्च शेतकरी स्वतः करीत होते. 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेअंतर्गत यंदा शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देण्यात येत आहे.

लोकसहभागातूनही गाळ उपसा...जिल्ह्यात १७ मे ते १ जुलै या कालावधीत लोकसहभागातून रेणापूर, उदगीर, अहमदपूर, लातूर, औसा व निलंगा तालुक्यातील रेणापूर मध्यम प्रकल्प, गुत्ती साठवण तलाव, गुडसूर तलाव, तिरु मध्यम प्रकल्प, सोनखेड साठवण तलाव, सलगरा तलाव, भादा, वांगजी, बिरवली, तांबाळा येथील पाझर तलावातून गाळ उपसा करण्यात आला आहे.

३० कोटी लिटरने वाढली पाणी साठवण क्षमता...गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत औसा व निलंगा, तसेच गोंद्री, खुंटेगाव साठवण तलाव, मसलगा मध्यम प्रकल्प व निम्न तेरणा प्रकल्प, एकुर्का लघु पाटबंधारे तलाव, कल्लूर तलावातून गाळ काढला आला. लोकसहभाग आणि याेजनेतून एकूण ३ लाख ३ हजार २४३ घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ जवळपास ७५८ एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला आहे. त्यामुळे ३० कोटी ३२ लाख लिटर एवढ्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या उपक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरीlaturलातूर