शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक

By हरी मोकाशे | Updated: July 8, 2023 17:49 IST

धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.

लातूर : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प व तलावावून दीड महिन्यात ३ लाख ३ हजार २४३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ शेतामध्ये पसरविण्यात आल्याने ७५८ एकर क्षेत्र सुपिक झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच शेतीचे उत्पन्न वाढणार आहे.

राज्यात धरण, प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. मात्र, या धरणांमध्ये दरवर्षी साठत असलेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत घट झाली आहे. धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. त्यामुळे राज्यात 'गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार' ही योजना राबविण्यास सुरुवात झाली.

यंदा अल निनोमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. यापूर्वी या योजनेत शासनाकडून केवळ इंधन खर्च देण्यात येत होता. मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरविण्यासाठीचा वाहतूक खर्च शेतकरी स्वतः करीत होते. 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेअंतर्गत यंदा शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देण्यात येत आहे.

लोकसहभागातूनही गाळ उपसा...जिल्ह्यात १७ मे ते १ जुलै या कालावधीत लोकसहभागातून रेणापूर, उदगीर, अहमदपूर, लातूर, औसा व निलंगा तालुक्यातील रेणापूर मध्यम प्रकल्प, गुत्ती साठवण तलाव, गुडसूर तलाव, तिरु मध्यम प्रकल्प, सोनखेड साठवण तलाव, सलगरा तलाव, भादा, वांगजी, बिरवली, तांबाळा येथील पाझर तलावातून गाळ उपसा करण्यात आला आहे.

३० कोटी लिटरने वाढली पाणी साठवण क्षमता...गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत औसा व निलंगा, तसेच गोंद्री, खुंटेगाव साठवण तलाव, मसलगा मध्यम प्रकल्प व निम्न तेरणा प्रकल्प, एकुर्का लघु पाटबंधारे तलाव, कल्लूर तलावातून गाळ काढला आला. लोकसहभाग आणि याेजनेतून एकूण ३ लाख ३ हजार २४३ घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ जवळपास ७५८ एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला आहे. त्यामुळे ३० कोटी ३२ लाख लिटर एवढ्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या उपक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरीlaturलातूर