शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक

By हरी मोकाशे | Updated: July 8, 2023 17:49 IST

धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.

लातूर : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प व तलावावून दीड महिन्यात ३ लाख ३ हजार २४३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ शेतामध्ये पसरविण्यात आल्याने ७५८ एकर क्षेत्र सुपिक झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच शेतीचे उत्पन्न वाढणार आहे.

राज्यात धरण, प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. मात्र, या धरणांमध्ये दरवर्षी साठत असलेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत घट झाली आहे. धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. त्यामुळे राज्यात 'गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार' ही योजना राबविण्यास सुरुवात झाली.

यंदा अल निनोमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. यापूर्वी या योजनेत शासनाकडून केवळ इंधन खर्च देण्यात येत होता. मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरविण्यासाठीचा वाहतूक खर्च शेतकरी स्वतः करीत होते. 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेअंतर्गत यंदा शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देण्यात येत आहे.

लोकसहभागातूनही गाळ उपसा...जिल्ह्यात १७ मे ते १ जुलै या कालावधीत लोकसहभागातून रेणापूर, उदगीर, अहमदपूर, लातूर, औसा व निलंगा तालुक्यातील रेणापूर मध्यम प्रकल्प, गुत्ती साठवण तलाव, गुडसूर तलाव, तिरु मध्यम प्रकल्प, सोनखेड साठवण तलाव, सलगरा तलाव, भादा, वांगजी, बिरवली, तांबाळा येथील पाझर तलावातून गाळ उपसा करण्यात आला आहे.

३० कोटी लिटरने वाढली पाणी साठवण क्षमता...गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत औसा व निलंगा, तसेच गोंद्री, खुंटेगाव साठवण तलाव, मसलगा मध्यम प्रकल्प व निम्न तेरणा प्रकल्प, एकुर्का लघु पाटबंधारे तलाव, कल्लूर तलावातून गाळ काढला आला. लोकसहभाग आणि याेजनेतून एकूण ३ लाख ३ हजार २४३ घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ जवळपास ७५८ एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला आहे. त्यामुळे ३० कोटी ३२ लाख लिटर एवढ्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या उपक्रमास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरीlaturलातूर