शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

२६२१ शेतकऱ्यांकडे अडकली ३६ कोटींची थकबाकी।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST

बेलकुंड : महावितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरातील १६ गावांमधील तब्बल २ हजार ६२१ शेतकऱ्यांकडे एकूण ३५ कोटी ८८ लाखांची ...

बेलकुंड : महावितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरातील १६ गावांमधील तब्बल २ हजार ६२१ शेतकऱ्यांकडे एकूण ३५ कोटी ८८ लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची पथके गावागावात दाखल झाली आहेत.

वीजबिलाच्या वसुलीसाठी वीज कर्मचारी गावोगावी जात शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलाची थकबाकी भरण्याबाबत सूचना करत आहेत. यावेळी ‘कृषी वीज धोरण २०२०’ या नवीन योजनेची माहितीही देत आहेत. त्याचबराेबर शेतकऱ्यांनी पूर्ण थकबाकी भरावी, असे आवाहनही केले जात आहे.

बेलकुंड परिसरात यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावलेला असताना, कोरोनाचा फटका बसल्याने शेतीमालाचे बाजारभाव घसरले आहेत. यातून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशास्थितीत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात शेतात गहू, ज्वारी, हरभरा, ऊसाची लागवड केली आहे. सध्या उपलब्ध पाण्यावर रब्बीची पिके बहरत आहेत. असे असताना महावितरण कंपनीकडून शेतातील कृषिपंपांच्या वीजबिलांची वसुली मोहीम राबवली जात आहे. बिलाची थकबाकी राहिल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे सांगितले जात आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास पाण्याअभावी शेतातील पिके वाळण्याची भीती व्यक्त हाेत आहे.

महावितरणकडून सध्या थकीत वीजबिल वसुलीसाठी ‘कृषी वीज धोरण २०२०’ ही योजना राबवली जात आहे. या योजनेत सप्टेंबर २०१५ ते आजपर्यंतच्या एकूण थकबाकीत शेतकऱ्यांनी एकरकमी अर्धी रक्कम जमा केली तर शेतकऱ्यांना जवळपास ५० ते ६० टक्के सवलत मिळणार आहे. ही योजना तीन टप्प्यात सुरु राहणार असून, दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांनी पैसे भरले तर त्यांना ३० टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांनी पैसे भरले तर त्यांना २० टक्के सवलत मिळणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

वसुलीसाठी गावागावात बैठक...

शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीचे पथक सध्या बेलकुंड परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेत आहे. या बैठकीत कंपनीच्या योजनांची माहिती देत वीजबिलाच्या अर्धी रक्कम एकरकमी भरल्यास पूर्ण वीजबिल माफ होणार, याबाबत माहिती दिली जात आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेऊन सहकार्य करावे अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे महावितरणचे सहायक अभियंता अमित शृंगारे यांनी सांगितले.