शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बियाणे न उगवल्याच्या २२० तक्रारी, पंचनामे केवळ १४३ जणांचेच

By आशपाक पठाण | Updated: July 24, 2023 18:40 IST

शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे कर्मचारी सोबत घेऊन पंचनामे केले जात आहे.

लातूर : महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारींचा ओघ अजूनही कृषी विभागाकडे सुरूच आहे. सोमवारपर्यंत २२० शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या असून, यातील जवळपास १४३ जणांचे पंचनामे करण्यात आले आहेत. यासंदर्भात चार दिवसांत आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे उर्वरित पंचनामे गतीने करण्यात येत आहेत.

लातूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पाऊस उशिरा झाल्याने पेरण्याही उशिरा झाल्या. त्यातही विश्वासाच्या बियाणाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला आहे. औसा, निलंगा तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाणाबाबत तक्रारी केल्या होत्या. तक्रार दिल्यावरही आठ आठ दिवस पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाची वाट न पाहता दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी जवळपास दहा हजार रुपयांचा जास्तीचा खर्च करावा लागला आहे. शिवाय, पेरणीला उशीर झाल्याने उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

कृषी विभागाचे कर्मचारी बांधावर...बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभाग, महाबीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी पाहणी करून पंचनामे करीत आहेत. आतापर्यंत ७० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. चार दिवसांत उर्वरित पंचनामे पूर्ण करून याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे.

विभागीय आयुक्तांना अहवाल देणार...शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे कर्मचारी सोबत घेऊन पंचनामे केले जात आहे. सोमवारपर्यंत जवळपास २२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील ७० टक्के पंचमाने पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे सुरू आहे. यासंदर्भातचा अहवाल विभागीय आयुक्त, अकोला येथील महाबीज कंपनीला दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी दिली.

नुकसानभरपाई मिळणार कधी...महाबीजचे बियाणे न उगवण्याचे कारण पंचनाम्यातून स्पष्ट होईल. जिल्ह्यात औसा, निलंगा या दोनच तालुक्यातील सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यामुळे या भागात आलेल्या बियाणांचा लॉट खराब आला का, पेरणीत काही गडबड झाली, ओलावा होता की नाही याची माहिती घेतली जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर अहवाल गेला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार असा प्रश्न आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर