शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
3
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
4
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
5
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
6
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
7
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
8
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
10
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
11
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
12
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
13
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
14
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
15
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
16
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
17
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
18
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
19
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
20
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे न उगवल्याच्या २२० तक्रारी, पंचनामे केवळ १४३ जणांचेच

By आशपाक पठाण | Updated: July 24, 2023 18:40 IST

शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे कर्मचारी सोबत घेऊन पंचनामे केले जात आहे.

लातूर : महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारींचा ओघ अजूनही कृषी विभागाकडे सुरूच आहे. सोमवारपर्यंत २२० शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या असून, यातील जवळपास १४३ जणांचे पंचनामे करण्यात आले आहेत. यासंदर्भात चार दिवसांत आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे उर्वरित पंचनामे गतीने करण्यात येत आहेत.

लातूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पाऊस उशिरा झाल्याने पेरण्याही उशिरा झाल्या. त्यातही विश्वासाच्या बियाणाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला आहे. औसा, निलंगा तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाणाबाबत तक्रारी केल्या होत्या. तक्रार दिल्यावरही आठ आठ दिवस पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाची वाट न पाहता दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी जवळपास दहा हजार रुपयांचा जास्तीचा खर्च करावा लागला आहे. शिवाय, पेरणीला उशीर झाल्याने उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

कृषी विभागाचे कर्मचारी बांधावर...बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभाग, महाबीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी पाहणी करून पंचनामे करीत आहेत. आतापर्यंत ७० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. चार दिवसांत उर्वरित पंचनामे पूर्ण करून याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे.

विभागीय आयुक्तांना अहवाल देणार...शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे कर्मचारी सोबत घेऊन पंचनामे केले जात आहे. सोमवारपर्यंत जवळपास २२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील ७० टक्के पंचमाने पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे सुरू आहे. यासंदर्भातचा अहवाल विभागीय आयुक्त, अकोला येथील महाबीज कंपनीला दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी दिली.

नुकसानभरपाई मिळणार कधी...महाबीजचे बियाणे न उगवण्याचे कारण पंचनाम्यातून स्पष्ट होईल. जिल्ह्यात औसा, निलंगा या दोनच तालुक्यातील सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यामुळे या भागात आलेल्या बियाणांचा लॉट खराब आला का, पेरणीत काही गडबड झाली, ओलावा होता की नाही याची माहिती घेतली जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर अहवाल गेला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार असा प्रश्न आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर