शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

अहमदपुरातील प्रकल्पात २० टक्के जलसाठा; मोठ्या पावसाची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

अहमदपूर : तालुक्यातील २८ लघु, मध्यम प्रकल्प व साठवण तलावात सरासरी २० टक्के जलसाठा असून, सहा प्रकल्पांत अद्यापही ...

अहमदपूर : तालुक्यातील २८ लघु, मध्यम प्रकल्प व साठवण तलावात सरासरी २० टक्के जलसाठा असून, सहा प्रकल्पांत अद्यापही पाणीसाठा शून्य टक्क्यांवरच आहे. प्रकल्पात चांगला पाणीसाठा होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून, सध्या भिज पाऊस सुरू असला तरी रब्बीसाठी तालुक्यातील प्रकल्प भरणे गरजेचे आहे. मागील वर्षी याच काळात २५ टक्के जलसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत केवळ २० टक्के जलसाठा आहे.

अहमदपूर तालुक्यात २८ लघु, मध्यम व साठवण तलाव असून ते दोन विभागात विभागले आहेत. लातूर पाटबंधारे विभाग अंतर्गत दोन उपविभाग असून क्रमांक ९ अंतर्गत व्हटी, कोपरा, भुतेकरवाडी, उगिलेवाडी, नागठाणा, पाटोदा, गौताळा, काळेगाव, अहमदपूर, तेलगाव, वडगाव या ११ प्रकल्पांत सरासरी १२ टक्के जलसाठा आहे. तर पाटबंधारे उपविभाग क्रमांक १० अंतर्गत १७ प्रकल्पात मोघा, थोडगा, सावरगाव, तांबट सांगवी, मावलगाव, खंडाळी, गुगदळ, नागझरी, सोनखेड, धसवाडी, अंधोरी, ढाळेगाव, मोळवण, कावळवाडी, हंगेवाडी, येलदरी यांचा समावेश आहे. यामध्ये २५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. दोन्ही जलसाठ्यांची सरासरीनुसार तालुक्यातील प्रकल्पात २० टक्के जलसाठा आहे. सध्या भिज पाऊस चालू असून अनेक ठिकाणी जुलैची सरासरी ही पावसाने ओलांडली आहे. मात्र, प्रकल्प भरण्यासाठी परतीच्या पावसाची वाट पहावी लागणार असून, मोठा पाऊस पडला तरच रब्बीसाठी आवश्यक असणारा पाणीसाठा होणार असून त्यावरच अहमदपूर तालुक्याचे रब्बीचे क्षेत्र अवलंबून आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा...

दरवर्षी जुलैमध्ये २० ते २५ टक्के प्रकल्प भरलेले असतात. मात्र, ऑक्टोबर. नोव्हेंबरमध्ये परतीच्या पावसाने सर्वच प्रकल्प भरतात. मागील वर्षी ९० टक्के प्रकल्प भरले होते. त्यामुळे तालुक्यातील रब्बीचे क्षेत्र वाढले होते, असे लातूर पाटबंधारे या विभागाचे उपअभियंता ओमप्रकाश थोरमाेटे यांनी सांगितले.

भिज पावसाने शेतकरी आनंदित...

अहमदपूर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला असून, सर्वच मंडळात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. अहमदपूर मंडळात आतापर्यंत ४१०, किनगाव ३४४, अंधोरी ४१७, खंडाळी ५१६, शिरुर ताजबंद ५५३, हाडोळती ४३४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, भिज पावसामुळे खरिपातील पिके बहरली असून, तालुक्यातील प्रकल्प भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.