शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लातूरमध्ये मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 20:45 IST

मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील मंगरुळ  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी घडली.

लातूर : मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील मंगरुळ  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी घडली आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांवर वाढवणा (बु़) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत़

जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे़ पटसंख्या २२० आहे़ नेहमीप्रमाणे आज दुपारी विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात आली़ ती खाल्ल्यानंतर काही वेळांनी १४१ विद्यार्थ्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखणे असा त्रास होऊ लागला़ काही विद्यार्थ्यांनी ही माहिती शिक्षकांना दिली तर काहींनी घरी जाऊन पालकांना दिली़ त्यामुळे गावचे सरपंच महेताब बेग यांच्यासह पालकांनी तात्काळ या विद्यार्थ्यांना उपचारासाठी वाढवणा (बु़) (ता़ उदगीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यातील १० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे़ उर्वरित १३१ विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़

१० जणांची प्रकृती गंभीरजुलाब, उलटी, पोटदुखी असा त्रास होणारे मंगरुळ येथील १४१ विद्यार्थी दाखल झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती गंभीर आहे़ खिचडीतील आळ्यामुळे हा त्रास होण्याची शक्यता आहे़ अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, असे वाढवणा बु़ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ़ वर्षा कानवटे व डॉ़ जी़पी़ भारती यांनी सांगितले

खिचडीत आळ्या असल्याचा आरोपविद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खिचडीत आळ्या होत्या़ त्यामुळेच विद्यार्थ्यांना हा त्रास झाला़ या घटनेची चौकशी करुन स्वयंपाकी, मुख्याध्यापकावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सरपंच महेताब बेग यांच्यासह पालकांनी केली आहे़

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीfood poisoningअन्नातून विषबाधा