शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लातूरमध्ये मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 20:45 IST

मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील मंगरुळ  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी घडली.

लातूर : मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील मंगरुळ  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी घडली आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांवर वाढवणा (बु़) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत़

जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे़ पटसंख्या २२० आहे़ नेहमीप्रमाणे आज दुपारी विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात आली़ ती खाल्ल्यानंतर काही वेळांनी १४१ विद्यार्थ्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखणे असा त्रास होऊ लागला़ काही विद्यार्थ्यांनी ही माहिती शिक्षकांना दिली तर काहींनी घरी जाऊन पालकांना दिली़ त्यामुळे गावचे सरपंच महेताब बेग यांच्यासह पालकांनी तात्काळ या विद्यार्थ्यांना उपचारासाठी वाढवणा (बु़) (ता़ उदगीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यातील १० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे़ उर्वरित १३१ विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़

१० जणांची प्रकृती गंभीरजुलाब, उलटी, पोटदुखी असा त्रास होणारे मंगरुळ येथील १४१ विद्यार्थी दाखल झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती गंभीर आहे़ खिचडीतील आळ्यामुळे हा त्रास होण्याची शक्यता आहे़ अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, असे वाढवणा बु़ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ़ वर्षा कानवटे व डॉ़ जी़पी़ भारती यांनी सांगितले

खिचडीत आळ्या असल्याचा आरोपविद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खिचडीत आळ्या होत्या़ त्यामुळेच विद्यार्थ्यांना हा त्रास झाला़ या घटनेची चौकशी करुन स्वयंपाकी, मुख्याध्यापकावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सरपंच महेताब बेग यांच्यासह पालकांनी केली आहे़

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीfood poisoningअन्नातून विषबाधा