शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

१४ वर्षांचा वनवास संपला; अखेर दशरथ स्वगृही परतले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 11:53 IST

मनःस्थिती बरी नसल्याने १४ वर्षांपूर्वी घरापासून दुरावलेले दशरथ अखेर स्वगृही परतले.

लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर : मनःस्थिती बरी नसल्याने १४ वर्षांपूर्वी घरापासून दुरावलेले दशरथ अखेर स्वगृही परतले. ही कहाणी आहे सिंधुदुर्ग ते लातूर प्रवासाची. शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आणि बहिणीच्या मायेने दशरथ यांना घर गाठता आले. गेल्या वर्षी २१ मे २०२३ रोजी लातूर शहरातील औसा रोड लगत छत्रपती चौक भागात एक व्यक्ती असून ती नालीचे पाणी पीत आहे, काहीही कचऱ्यातले जेवण करत आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांना मिळाली होती.

त्यानंतर रिलीजन टू रिस्पॉन्सबिलिटी फाउंडेशनच्या माध्यमातून राहुल पाटील, असिफ पठाण, गोपाळ ओझा, मुस्तफा सय्यद, आकाश गायकवाड यांनी त्या मनःस्थिती बरी नसलेल्या व्यक्तीला चिखली (जि. बुलडाणा) येथील दिव्य सेवा संकल्पच्या अशोक काकडे यांच्याकडे उपचारासाठी पाठविले. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दशरथ यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविले. त्यांचे मूळ गाव कानेड (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) आहे. दशरथ हे अविवाहित आहेत. त्यांचे आई-वडील हयात नाहीत. मात्र, मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ करायचे ठरवले असून कुटुंबियांनी संस्थेचे आभार मानत आनंद व्यक्त केला. 

अनेकांना मिळाला दिलासा...रिलीजन टू रिस्पॉन्सबिलिटी फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वी अनेकांना दिलासा मिळाला आहे. मनःस्थिती बरी नसल्याने काही जण कुटुंबापासून दुरावतात. त्यांना कोणी जवळ करत नाही. घरच्यांनीही थकून शोध घेणे सोडलेले असते. पुलाखाली, तर कधी निवारा नसताना ते अमानवीय अवस्थेत आढळतात. त्यांना बरे करून कुटुंबाकडे सुपूर्द करणे शक्य असते, जे की कार्यकर्ते करत आहेत.

टॅग्स :laturलातूर