शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

अवकाळी पाऊस, गारपिटीच्या मदतीपोटी लातूर जिल्ह्यातील २२ हजार शेतकऱ्यांसाठी १० कोटी

By संदीप शिंदे | Updated: April 12, 2023 21:00 IST

लातूर जिल्ह्यातील १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लातूर : जिल्ह्यात मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामातील पिके, फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करीत मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार १० एप्रिल रोजी महसूल व वनविभागाने जिल्ह्याला १० कोटी ५६ लाख ५५५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. लवकरच ही मदत जिल्हा प्रशासनास प्राप्त होणार असून, तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

मार्च महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. यामध्ये रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, द्राक्ष, टरबूज, खरबूज, आंबा, पपईसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर सहा पशुधन आणि एका शेतकऱ्याचा वीज पडल्याने मृत्यू झाला होता. दरम्यान, जिल्ह्यात दुपारी गारपीट झाल्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे केले होते. यामध्ये २२ हजार ५६५ शेतकऱ्यांचे १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार शासनाकडे १० कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. शासनाने त्यास प्रतिसाद देत १० एप्रिल रोजी जिल्ह्याला १० कोटी ५६ लाख ५५ हजार रुपयांच्या निधी जाहीर केला आहे. संपूर्ण राज्यासाठी १७७ कोटी रुपये असून, मराठवाड्यासाठी ८४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी आहे. दरम्यान, हा निधी जिल्हा प्रशासनास लवकरच प्राप्त होणार असून, निधी मिळताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा...जिल्ह्यात मागील दोन दिवसांपूर्वी निलंगा आणि देवणी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे द्राक्ष आणि टरबूज पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून या नुकसानीचेही पंचनामे पूर्ण करण्यात येत आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाल्यावर प्रशासनाने तातडीने अहवाल शासनाकडे सादर करून निधी मिळविला. त्याचप्रमाणे दोन दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी देवणी आणि निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी