शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जि.प. शिक्षण विभागाचे उपक्रम देशपातळीवर : केंद्र शासनाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:48 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या प्रभावी उपक्रमांची दखल पुन्हा एकदा केंद्र शासनाने घेतली आहे. संपूर्ण देशभरामध्ये यातील उपक्रम राबवता यावेत यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सादरीकरणासाठी मसुरी (उत्तराखंड) येथे दुसºयांदा पाचारण केले होते.डॉ. खेमनार यांनी ७ मार्च २०१८ रोजी लालबहादूर शास्त्री ...

ठळक मुद्देमसुरी येथे कुणाल खेमनार यांच्याकडून सादरीकरण

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या प्रभावी उपक्रमांची दखल पुन्हा एकदा केंद्र शासनाने घेतली आहे. संपूर्ण देशभरामध्ये यातील उपक्रम राबवता यावेत यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सादरीकरणासाठी मसुरी (उत्तराखंड) येथे दुसºयांदा पाचारण केले होते.

डॉ. खेमनार यांनी ७ मार्च २०१८ रोजी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये या सर्व उपक्रमांबाबत सादरीकरण केले. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप हे प्राथमिक शिक्षण स्तरावरील विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी गतवर्र्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ६ आणि ७ मार्च रोजी विशेष दौºयावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन प्राथमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक शाळांची केलेली नोंद, राजर्षी शाहू निवासी क्रीडा प्रशालेतील खेळाडूंनी विविध आंतरराष्ट्रीय, देश व राज्यपातळीवर मिळविलेले यश, जि.प.ने सुरू केलेली देशातील पहिली निवासी शाळा, आदी उपक्रम तसेच शिक्षण विभागामार्फत औद्योगिक, सामाजिक उत्तरदायित्व, लोकसहभाग अंतर्गत शाळांसाठी भरीव निधी उपलब्ध करून त्यातून नवीन शाळा इमारती, दुरुस्ती, मुलामुलींसाठी स्वच्छतागृहे, ई- लर्निंग साहित्य, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेतले आहे. शिक्षकांना प्रशिक्षणे व कार्यशाळेमार्फत केले जाणाºया मार्गदर्शनाबाबत सादरीकरणामध्ये माहिती दिली. यावेळी उपसंचालक श्रीमती अश्वथी, उपसंचालक एस. श्रीधर, सर्व शिक्षा अभियानाच्या संचालिका सौम्या गुप्ता, ‘प्रथम’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुक्मिणी बॅनर्जी, उपस्थित भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांनी डॉ. कुणाल खेमनार यांचे अभिनंदन करून कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.अर्थसंकल्प २२ मार्चला मांडणारकोल्हापूर : जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प गुरुवारी (दि. २२) मांडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी अन्य पदाधिकाºयांसह सर्व विभागांचा आढावा घेतला.यंदा अर्थसंकल्प ३० कोटींपर्यंत मांडला जाण्याची शक्यता आहे. येथील समिती सभागृहात मंगळवारी दुपारी दोन तास झालेल्या बैठकीत अध्यक्षा महाडिक यांनी प्रत्येक विभागाने खर्च केलेला निधी, आगामी आर्थिक वर्षातील नियोजन याची माहिती घेतली. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती अंबरिष घाटगे, सर्जेराव पाटील पेरिडकर, विशांत महापुरे, शुभांगी श्ािंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. काही विभागांचा निधी शिल्लक राहणार आहे त्याचा विनियोग कसा करायचा यासह अनेक नावीन्यपूर्ण तसेच जिल्हा परिषदेचे उत्पन्नवाढीसाठीच्या योजनांबाबतही यावेळी चर्चा केली.