शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘हवामहल’मुळे जिल्हा परिषदेला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:08 IST

कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती परिसरातील कोट्यवधींच्या ‘हवामहल’ बंगल्याची मालकी मिळविताना जिल्हा परिषदेला नाकेनऊ आले आहेत. या ठिकाणी सध्या प्रांत कार्यालय असल्याने ही जागाच ताब्यात घेण्यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील असताना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केवळ चर्चा आणि ठराव करण्यापलीकडे पदाधिकाऱ्यांच्या हातात काहीच उरले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे यातून ...

कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती परिसरातील कोट्यवधींच्या ‘हवामहल’ बंगल्याची मालकी मिळविताना जिल्हा परिषदेला नाकेनऊ आले आहेत. या ठिकाणी सध्या प्रांत कार्यालय असल्याने ही जागाच ताब्यात घेण्यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील असताना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केवळ चर्चा आणि ठराव करण्यापलीकडे पदाधिकाऱ्यांच्या हातात काहीच उरले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे यातून व्यवहार्य मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे.इचलकरंजीचे संस्थानिक गोविंदराव नारायण घोरपडे अल्पवयीन असताना अनेक मालमत्ता या जिल्हाधिकाºयांच्या ताब्यात होत्या. जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर १९६३ साली इचलकरंजी-हातकणंगले-बोरपाडळे रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करताना हवामहल बंगला व सभोवतालची जागा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली. दरम्यान, घोरपडे यांनी याबाबत नुकसानभरपाईची मागणी केली व २५ जुलै १९८६ च्या दूरमुद्रित संदेशानुसार जिल्हा परिषदेने सहा लाख ७१ हजार ५८८ रुपये कोर्टात भरलेही. त्यानंतर बंगला व रिकाम्या जागेला जिल्हा परिषदेचे नाव लागले.१९९२ साली इचलकरंजी येथे नवीन उपविभागीय कार्यालय मंजूर झाल्यानंतर जागा नसल्याने यातील दोन खोल्या या कार्यालयासाठी देण्यात आल्या. यानंतर पुन्हा चार कक्ष मागण्यात आले. त्यानुसार ते प्रांत कार्यालयासाठी भाड्याने देण्यात आले. २00७ नंतर ‘हवामहल’ची जागा जिल्हा परिषदेच्या ताब्यात देण्याबाबत पत्रव्यवहार सुरू झाला. २00७ साली सुमारे १८ लाख रुपये भाडे महसूल खात्याने थकविले होते. दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या चिटणीसांनी १७ एप्रिल २00८ च्या पत्रानुसार या इमारतीमध्ये प्रांत कार्यालय आणि वरती जिल्हा परिषदेचे विश्रामगृह असणे योग्य असल्याचा अभिप्राय दिला होता.बंगल्यासह जागेसाठी ‘महसूल’चे प्रयत्नएकीकडे जिल्हा परिषद ही जागा आणि बंगला ताब्यात मिळावा म्हणून प्रयत्नशील असतानाच ही जागा आणि बंगला महसूल खात्याकडेच वर्ग व्हावा, यासाठीचा प्रस्ताव शासनाला सादर केला. एवढेच नव्हे, तर तेथील देखभाल आणि दुरुस्तीही महसूल विभागाने करावी, असेही आदेश देण्यात आले. त्यामुळे एकीकडे गरज असताना जागा दिली तर महसूल विभागाने ही सर्वच मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.५२ हजार चौरस फू ट रिकामी जागाया ठिकाणी ९१६७ चौरस फूट संस्थानकालीन बंगला असून, तो सुमारे १५0 वर्र्षांपूर्वीचा आहे. इचलकरंजीतील उंच जागा असल्याने आणि तेथे पूर्वी जंगल असल्याने उन्हाळ्यामध्ये हवापालटासाठी घोरपडे सरकार या बंगल्यात राहत असत. म्हणूनच याला ‘हवामहल’ असे नाव देण्यात आले. या बंगल्यातील खालच्या सहा प्रशस्त खोल्यांमध्ये प्रांत कार्यालय असून, वरच्या मजल्यावर जिल्हा परिषदेचे विश्रामगृह असून, याचा फारसा वापर होत नाही.हेरिटेज असल्याने मर्यादाही इमारत हेरिटेज प्रकारामध्ये मोडत असल्याने या ठिकाणी पुरातत्त्वच्या नियमानुसार या इमारतीला साजेसे असेच बांधकाम करणे बंधनकारक आहे. त्यामुळे तिथे व्यावसायिक कारणासाठीही वापर करायचा म्हटले तरी गाळे काढणेही अवघड बनणार आहे. दुसरीकडे याच परिसरात येत्या काही वर्षांत व्यापारी संकुल उभारण्याचे इचलकरंजी नगरपरिषदेचे नियोजन आहे. तसे झाल्यास या जागेतील गाळ्यांचा कितपत प्रतिसाद मिळणार असाही प्रश्न आहे.