शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद आरक्षण सोडतीकडे लक्ष, १५ डिसेंबरला सोडत काढण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 10:37 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसत नाही तोवर आता जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठीचे सत्ताधीश कोण असणार, हे ठरविण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद आरक्षण सोडतीकडे लक्ष, १५ डिसेंबरला सोडत काढण्याचे नियोजनसत्ता सारीपाटावर होणार फेरजुळण्या

कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसत नाही तोवर आता जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षांसाठीचे सत्ताधीश कोण असणार, हे ठरविण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकूणच विधानसभेनंतर जिल्हा परिषदेतील पूर्वीचा सत्तेचा सारीपाट विस्कटला असून, खेळासाठी नवाच डाव मांडावा लागणार आहे. दरम्यान, आरक्षण सोडत डिसेंबरच्या १५ तारखेला काढण्यासंदर्भात आयुक्त पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत, यासंदर्भात विभागीय आयुक्तांशी संपर्क साधला असता, त्याला दुजोराही मिळाला आहे; पण तारीख मागे-पुढे होऊ शकते, असे सांगण्यात आले.कोल्हापूरसह राज्यातील जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गेले वर्षभर लटकला आहे. गेल्यावर्षी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये सोडत निघणार होती; पण दुष्काळ आणि अतिवृष्टी या कारणांमुळे ती पुढे गेली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाल्याने साधारणपणे मे महिन्यात निश्चितपणे सोडत निघेल, असे सांगितले जात होते; पण तोपर्यंत राज्य शासनानेच सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी बदलाचा निर्णय सहा महिन्यांसाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केले.

त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही प्रतीक्षा आणखी लांबत गेली. आता निवडणुकाही संपल्या आहेत, शिवाय सहा महिन्यांची दिलेली मुदतवाढ डिसेंबरमध्ये संपत आहे. नवीन वर्षात नवीन पदाधिकारी नेमावेच लागणार असल्याने प्रशासकीय पातळीवर आरक्षण सोडतीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.कोल्हापुरात सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले असून, भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेवर आहे. भाजपच्या शौमिका महाडिक या अध्यक्ष आहेत. ६७ सदस्य असलेल्या सभागृहात सत्ताधारी गटाकडे भाजपचे १४, जनसुराज्यचे सहा, युवक क्रांती आघाडीचे दोन, शिवसेनेचे सात, ताराराणी तीन, स्वाभिमानी दोन, आवाडे गट दोन, अपक्ष एक असे ३७ जणांचे बहुमत आहे.

याउलट काँग्रेस आघाडीकडे काँग्रेसचे १४, राष्ट्रवादी ११, शिवसेना तीन, शाहू आघाडी दोन असे ३0 जणांचे संख्याबळ विरोधात आहे. लोकसभा व त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे यात दोन्ही आघाड्यांतील बळात बराच बदल झाला आहे. भाजपला चिंता बहुमत टिकविण्याचीसत्ताधारी भाजपकडून अशोकराव माने, अनिल यादव यांनी राजीनामे दिल्याने हे बळ ३७ वरून ३५ वर आले आहे. स्वाभिमानी व आवाडे गट यांचे चार सदस्य भाजपच्या उघड विरोधात आहेत. शिवसेनेच्या सात सदस्यांमध्ये तीन नरके, दोन सत्यजित पाटील, मिणचेकर एक, संजय घाटगे एक, अशी विभागणी आहे. जनसुराज्यचे सहा सदस्य भाजपसोबत राहणार असल्यास विधानसभेत पराभूत झालेले सत्यजित पाटील यांचे दोन सदस्य काय भूमिका घेतात, यावर भाजप आघाडी अल्पमतात की बहुमतात ते ठरणार आहे. याचवेळी काँग्रेस आघाडीकडून रेश्मा राहुल देसाई आणि चंदगडमधून सचिन बल्लाळ यांची भाजपशी असलेली जवळीक कायम राहिली तर बहुमत टिकविता येणार आहे.काँग्रेसचा भर नाराजांची मोट बांधण्यावरविरोधी काँग्रेस आघाडीने लोकसभेपासूनच जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. विधानसभा निवडणुकीत आघाडीला मिळालेल्या एकतर्फी विजयामुळे तर सत्तापालट हाच प्रचार सुरू झाला आहे. काँग्रेसकडे ३0 चे संख्याबळ आहे, त्यात मंडलिक गटाचे दोन, उल्हास पाटील गटाचा एक, प्रकाश आबिटकर गटाचे दोन, असे सदस्य आहेत.

हे सदस्य आघाडीधर्म पाळणार की विरोधकांची सोबत करणार, यावर विरोधक सत्तेपर्यंत पोहोचणार का ते ठरणार आहे. त्यांना आवाडे आणि स्वाभिमानीच्या चार सदस्यांची मदत कोणाच्या पाठीशी राहणार यावरही सत्तेचा लंबक ठरणार आहे. एकमेव अपक्ष उमेदवाराची विरोधी गटाशी जवळीक वाढली आहे. चंदगडमधील कुपेकर व काँग्रेसचे सदस्यही निर्णायक भूमिकेत आहेत. बंडा माने यांच्या निधनामुळे काँग्रेसचे संख्याबळही एकने कमी झाले आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर