शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

युवकच नवभारत घडवितील, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास

By पोपट केशव पवार | Updated: December 1, 2023 16:49 IST

कोल्हापूर : देशात सध्या १८ ते २८ या वयोगटातील तरुणाईंची संख्या सर्वाधिक आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पेनेत तरुणाईला मोठ्या प्रमाणात ...

कोल्हापूर : देशात सध्या १८ ते २८ या वयोगटातील तरुणाईंची संख्या सर्वाधिक आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पेनेत तरुणाईला मोठ्या प्रमाणात केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे हे युवकच येणारा नवभारत घडवतील, असा विश्वास गाेव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 'आत्मनिर्भर भारत: युवकांचा सहभाग' या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. सावंत बोलत होते. कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉ. सावंत म्हणाले, स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना आम्ही पूर्णत्वास नेली आहे. दुध, भाजीपाल्यासाठी गोवा पूर्णपणे महाराष्ट्र व कर्नाटकवर अवलूबन होते. हेच अवलंबित्व कमी करण्यासाठी गावागावात जाऊन नागरिकांची गरज, अपेक्षा जाणून घेतल्या. आपण काय करू शकतो, सरकार काय देऊ शकते याचा अभ्यास करून त्यादृष्टीने योजना आखल्या. त्याच्या अंमलबजावणीसाठी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना गावे नेमून दिली. हर घर नल, प्रत्येक घरी गॅस, शौचालय, वीज दिली. याची गावागावात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने गोवा आज स्वयंपूर्ण झाले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राने जलयुक्त शिवार योजना प्रभावी राबवून २२ हजार गावे पाणीदार केली आहेत. शेतकऱ्यांना पिक विमा, पिकांना हमीभाव यामुळे शेतकऱ्याचा मार्ग सुकर होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात थेरीपेक्षा प्रॅक्टिलला महत्व दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपण जे शिकतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. प्रभावी योजनांद्वारे अवलंबित्व कमी केलेसरकार तुमच्या दारी, स्वयंपूर्ण युवा, स्वयंपूर्ण जेल, ग्रीन स्कूल अशा संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणल्या. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ई-बाजार सुरु केला. यामुळे गोव्यातील नागरिकांना आज दुसऱ्यावर अवलंबून राहवे लागत नसल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPramod Sawantप्रमोद सावंत