शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

युवकच नवभारत घडवितील, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास

By पोपट केशव पवार | Updated: December 1, 2023 16:49 IST

कोल्हापूर : देशात सध्या १८ ते २८ या वयोगटातील तरुणाईंची संख्या सर्वाधिक आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पेनेत तरुणाईला मोठ्या प्रमाणात ...

कोल्हापूर : देशात सध्या १८ ते २८ या वयोगटातील तरुणाईंची संख्या सर्वाधिक आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पेनेत तरुणाईला मोठ्या प्रमाणात केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे हे युवकच येणारा नवभारत घडवतील, असा विश्वास गाेव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 'आत्मनिर्भर भारत: युवकांचा सहभाग' या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. सावंत बोलत होते. कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉ. सावंत म्हणाले, स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना आम्ही पूर्णत्वास नेली आहे. दुध, भाजीपाल्यासाठी गोवा पूर्णपणे महाराष्ट्र व कर्नाटकवर अवलूबन होते. हेच अवलंबित्व कमी करण्यासाठी गावागावात जाऊन नागरिकांची गरज, अपेक्षा जाणून घेतल्या. आपण काय करू शकतो, सरकार काय देऊ शकते याचा अभ्यास करून त्यादृष्टीने योजना आखल्या. त्याच्या अंमलबजावणीसाठी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना गावे नेमून दिली. हर घर नल, प्रत्येक घरी गॅस, शौचालय, वीज दिली. याची गावागावात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने गोवा आज स्वयंपूर्ण झाले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राने जलयुक्त शिवार योजना प्रभावी राबवून २२ हजार गावे पाणीदार केली आहेत. शेतकऱ्यांना पिक विमा, पिकांना हमीभाव यामुळे शेतकऱ्याचा मार्ग सुकर होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात थेरीपेक्षा प्रॅक्टिलला महत्व दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपण जे शिकतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. प्रभावी योजनांद्वारे अवलंबित्व कमी केलेसरकार तुमच्या दारी, स्वयंपूर्ण युवा, स्वयंपूर्ण जेल, ग्रीन स्कूल अशा संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणल्या. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ई-बाजार सुरु केला. यामुळे गोव्यातील नागरिकांना आज दुसऱ्यावर अवलंबून राहवे लागत नसल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPramod Sawantप्रमोद सावंत