शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

युवकच नवभारत घडवितील, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास

By पोपट केशव पवार | Updated: December 1, 2023 16:49 IST

कोल्हापूर : देशात सध्या १८ ते २८ या वयोगटातील तरुणाईंची संख्या सर्वाधिक आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पेनेत तरुणाईला मोठ्या प्रमाणात ...

कोल्हापूर : देशात सध्या १८ ते २८ या वयोगटातील तरुणाईंची संख्या सर्वाधिक आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पेनेत तरुणाईला मोठ्या प्रमाणात केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे हे युवकच येणारा नवभारत घडवतील, असा विश्वास गाेव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 'आत्मनिर्भर भारत: युवकांचा सहभाग' या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. सावंत बोलत होते. कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉ. सावंत म्हणाले, स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना आम्ही पूर्णत्वास नेली आहे. दुध, भाजीपाल्यासाठी गोवा पूर्णपणे महाराष्ट्र व कर्नाटकवर अवलूबन होते. हेच अवलंबित्व कमी करण्यासाठी गावागावात जाऊन नागरिकांची गरज, अपेक्षा जाणून घेतल्या. आपण काय करू शकतो, सरकार काय देऊ शकते याचा अभ्यास करून त्यादृष्टीने योजना आखल्या. त्याच्या अंमलबजावणीसाठी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना गावे नेमून दिली. हर घर नल, प्रत्येक घरी गॅस, शौचालय, वीज दिली. याची गावागावात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने गोवा आज स्वयंपूर्ण झाले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राने जलयुक्त शिवार योजना प्रभावी राबवून २२ हजार गावे पाणीदार केली आहेत. शेतकऱ्यांना पिक विमा, पिकांना हमीभाव यामुळे शेतकऱ्याचा मार्ग सुकर होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात थेरीपेक्षा प्रॅक्टिलला महत्व दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपण जे शिकतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. प्रभावी योजनांद्वारे अवलंबित्व कमी केलेसरकार तुमच्या दारी, स्वयंपूर्ण युवा, स्वयंपूर्ण जेल, ग्रीन स्कूल अशा संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणल्या. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ई-बाजार सुरु केला. यामुळे गोव्यातील नागरिकांना आज दुसऱ्यावर अवलंबून राहवे लागत नसल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPramod Sawantप्रमोद सावंत