शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

३५७ जागा, आले ९२; निवडले १५ जण; कोल्हापुरात रोजगार मेळाव्याकडे तरुणांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 12:26 IST

कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजन

कोल्हापूर : एकीकडे रोजगार नसल्याची ओरड सुरू असताना दुसरीकडे रोजगार उपलब्ध करूनही अनेक तरुण त्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र कोल्हापुरात गुरुवारी पाहायला मिळाले. जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुरुवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध प्रकारच्या ६ कंपन्यांमध्ये ३५७ जागा रिक्त होत्या. यामध्ये ९२ उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखत दिली. यामध्ये ६२ जणांची प्राथमिक, तर १५ जणांची अंतिम निवड करण्यात आली. जिल्ह्यातील ६ कंपन्यांमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, टेक्निशियन, हेल्पर, सीएनसी ऑपरेटर, साइट सुपरवायझर, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह अशा विविध पदांच्या जागा रिक्त होत्या. यासाठी हा रोजगार मेळावा घेण्यात आला. यासाठी आठवी ते एमबीएपर्यंत शैक्षणिक पात्रता होती. सदर बाजार परिसरातील जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात कंपनीच्या प्रतिनिधींकडून या मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान, रिक्त जागा जास्त असल्या तरी कंपन्यांना कौशल्याधारित उमेदवारांची गरज असते. मात्र, असे उमेदवार मिळत नसल्याने जागा रिक्त राहत आहेत. जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्याला तुलनेने अधिक प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी सांगितले.मोठ्या शहराचे फॅडकोल्हापूर जिल्ह्यात आयटीआयची प्रत्येक तालुक्यात शासकीय कॉलेज आहेत. शिवाय कोल्हापूर शहरातही तीन हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयटीआय कॉलेज आहे. येथून प्रत्येकवर्षी हजारो विद्यार्थी कौशल्याची पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र, या विद्यार्थ्यांना कोल्हापूरपेक्षा पुणे किंवा मुंबई येथील कंपन्या अधिक खुणावतात. कोल्हापूरपेक्षा अधिक पगार या शहरांमध्ये मिळतो, त्यामुळे हे विद्यार्थी कोल्हापूरच्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्यास तितकेसे उत्सुक नसल्याचे दिसते. त्यामुळे येथील कंपन्यांना कौशल्याधारित विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjobनोकरी