शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

तुम्ही एकटे नाही; सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे उभा; शरद पवार यांच्याकडून पुरग्रस्तांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 17:27 IST

चिखली, आंबेवाडी, बापट कँप, कुंभारगल्ली येथील पूरग्रस्तांशी साधला संवाद

कोल्हापूर : प्रलयकारी महापुरात होत्याचे नव्हते झालेल्या पूरग्रस्तांची भेट घेऊन, ‘तुम्ही एकटे नसून तुमच्या मागे सर्व महाराष्ट्र उभा आहे’ असा दिलासा गुरुवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे दिला. तसेच नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी कर्जमाफीसह आर्थिक मदतीचीही मागणी केंद्र व राज्य सरकारकडे करू, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. 

पवार यांनी गुरुवारी पूरबाधित असलेल्या करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी, वरणगे पाडळी या गावांसह शहरातील शाहुपुरी कुंभार गल्ली, बापट कँप येथील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, करवीर पंचायत समिती राजू सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

आंबेवाडी येथील मारुती मंदीर येथे पूरग्रस्तांशी खा. पवार यांनी संवाद साधला. यावेळी सरपंच सिकंदर मुजावर म्हणाले, पुरामुळे बाधित झालेली मातीची घरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घरे पंतप्रधान आवास योजनेतून बांधून द्यावीत.

खा. पवार यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधत घरात ओल आली असेल तर तुम्ही राहता कुठे? अशी विचारणा केली. तेव्हा आम्ही सध्या कोल्हापूरातील बुधवार पेठेत तात्पुरते स्थलांतरीत असल्याचे पूरग्रस्तांनी सांगितले. पुरामुळे कुणाची घरे पडली आहेत त्यांनी हात वर करावा असे सांगितले. यावर बहुतांश जणांनी हात वर केले. त्यावर खा. पवार यांनी आंबेवाडीतील लोकांचे पुनर्वसन झाले आहे मग तिथे जायला काय अडचण आहे ,अशी विचारणा केली. तेव्हा ग्रामस्थांनी त्या ठिकाणी वीज नाही, प्रॉपर्टी कार्डला नावे लागलेली नाहीत. अशा विविध कारणांमुळे स्थलांतर झाले नसल्याचे सांगितले. यावर खा. पवार यांनी तुमची तेथे राहायला जायची तयारी असेल तर आम्ही सरकारकडे याबाबत मागणी करु, असे सांगितले.

ऊसाच्या स्थितीबाबतही पवार यांनी विचारणा केल्यावर येथील बहुतांश सर्वच ऊस पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात आले. त्यावर ऊरलेल्या ऊसाबाबत आडसाळी लागवडीबाबत काय करता येईल, याच्या मार्गदर्शनासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटच्या तज्ज्ञांच्या दहा टीम येथे येणार आहे. तसेच ४० हजार एकरात तयार केलेल्या ऊसाच्या बियाणाचाही वापर केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. तुम्ही एकटे नसून सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे आहे. त्यामुळे धीर सोडू नका, पुन्हा उभारा अशा शब्दात दिलासा दिला.

यानंतर चिखली येथे भेट देऊन पूरग्रस्थांशी चर्चा केली. सरपंच उमा पाटील, माजी जि.प. सदस्य एस. आर. पाटील, पोलिस पाटील अरुणा दळवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. एस.आर. पाटील यांनी पुनर्वसन झालेल्या जागेवर जाण्यास आमची काहीच अडचण नाही शेतीचे काय? अशी भावना व्यक्त करत पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी केली. यावर पवार यांनी पहिल्यांदा राहण्याचा प्रश्न महत्वाचा असून तुमची तयारी असेल तर आम्ही याबाबत सरकारशी चर्चा करु असे सांगितले. तसेच येथील शेतकऱ्यांचे सर्व कर्जमाफ करावे, त्यांना उभे करण्यासाठी आर्थिक मदती करावी, अशी मागणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यानंतर पवार यांनी वरणगे पाडळी, बापट कँप येथे जाऊन पूरग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी सरपंच अनिता कांबळे, सदस्य शिवाजी गायकवाड, शिवाजी पाटील, पोलिस पाटील महादेवी कांबळे आदी उपस्थित होते.

दौऱ्यात नरके-पीएन एकत्रराजकीय विरोधक असलेले करवीरचे आमदार चंद्रदीप नरके व माजी आमदार पी. एन. पाटील हे शरद पवार यांच्या दौऱ्यात एकत्र होते. संपूर्ण दौऱ्यात जाईल त्या गावात ते पवार यांच्या आजबाजूला असल्याचे दिसत होते. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSharad Pawarशरद पवार