शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

तुम्ही एकटे नाही; सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे उभा; शरद पवार यांच्याकडून पुरग्रस्तांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 17:27 IST

चिखली, आंबेवाडी, बापट कँप, कुंभारगल्ली येथील पूरग्रस्तांशी साधला संवाद

कोल्हापूर : प्रलयकारी महापुरात होत्याचे नव्हते झालेल्या पूरग्रस्तांची भेट घेऊन, ‘तुम्ही एकटे नसून तुमच्या मागे सर्व महाराष्ट्र उभा आहे’ असा दिलासा गुरुवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे दिला. तसेच नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी कर्जमाफीसह आर्थिक मदतीचीही मागणी केंद्र व राज्य सरकारकडे करू, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. 

पवार यांनी गुरुवारी पूरबाधित असलेल्या करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी, वरणगे पाडळी या गावांसह शहरातील शाहुपुरी कुंभार गल्ली, बापट कँप येथील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, करवीर पंचायत समिती राजू सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

आंबेवाडी येथील मारुती मंदीर येथे पूरग्रस्तांशी खा. पवार यांनी संवाद साधला. यावेळी सरपंच सिकंदर मुजावर म्हणाले, पुरामुळे बाधित झालेली मातीची घरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घरे पंतप्रधान आवास योजनेतून बांधून द्यावीत.

खा. पवार यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधत घरात ओल आली असेल तर तुम्ही राहता कुठे? अशी विचारणा केली. तेव्हा आम्ही सध्या कोल्हापूरातील बुधवार पेठेत तात्पुरते स्थलांतरीत असल्याचे पूरग्रस्तांनी सांगितले. पुरामुळे कुणाची घरे पडली आहेत त्यांनी हात वर करावा असे सांगितले. यावर बहुतांश जणांनी हात वर केले. त्यावर खा. पवार यांनी आंबेवाडीतील लोकांचे पुनर्वसन झाले आहे मग तिथे जायला काय अडचण आहे ,अशी विचारणा केली. तेव्हा ग्रामस्थांनी त्या ठिकाणी वीज नाही, प्रॉपर्टी कार्डला नावे लागलेली नाहीत. अशा विविध कारणांमुळे स्थलांतर झाले नसल्याचे सांगितले. यावर खा. पवार यांनी तुमची तेथे राहायला जायची तयारी असेल तर आम्ही सरकारकडे याबाबत मागणी करु, असे सांगितले.

ऊसाच्या स्थितीबाबतही पवार यांनी विचारणा केल्यावर येथील बहुतांश सर्वच ऊस पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात आले. त्यावर ऊरलेल्या ऊसाबाबत आडसाळी लागवडीबाबत काय करता येईल, याच्या मार्गदर्शनासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटच्या तज्ज्ञांच्या दहा टीम येथे येणार आहे. तसेच ४० हजार एकरात तयार केलेल्या ऊसाच्या बियाणाचाही वापर केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. तुम्ही एकटे नसून सर्व महाराष्ट्र तुमच्या मागे आहे. त्यामुळे धीर सोडू नका, पुन्हा उभारा अशा शब्दात दिलासा दिला.

यानंतर चिखली येथे भेट देऊन पूरग्रस्थांशी चर्चा केली. सरपंच उमा पाटील, माजी जि.प. सदस्य एस. आर. पाटील, पोलिस पाटील अरुणा दळवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. एस.आर. पाटील यांनी पुनर्वसन झालेल्या जागेवर जाण्यास आमची काहीच अडचण नाही शेतीचे काय? अशी भावना व्यक्त करत पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी केली. यावर पवार यांनी पहिल्यांदा राहण्याचा प्रश्न महत्वाचा असून तुमची तयारी असेल तर आम्ही याबाबत सरकारशी चर्चा करु असे सांगितले. तसेच येथील शेतकऱ्यांचे सर्व कर्जमाफ करावे, त्यांना उभे करण्यासाठी आर्थिक मदती करावी, अशी मागणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यानंतर पवार यांनी वरणगे पाडळी, बापट कँप येथे जाऊन पूरग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी सरपंच अनिता कांबळे, सदस्य शिवाजी गायकवाड, शिवाजी पाटील, पोलिस पाटील महादेवी कांबळे आदी उपस्थित होते.

दौऱ्यात नरके-पीएन एकत्रराजकीय विरोधक असलेले करवीरचे आमदार चंद्रदीप नरके व माजी आमदार पी. एन. पाटील हे शरद पवार यांच्या दौऱ्यात एकत्र होते. संपूर्ण दौऱ्यात जाईल त्या गावात ते पवार यांच्या आजबाजूला असल्याचे दिसत होते. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSharad Pawarशरद पवार