शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘लोकशाही’त न्याय मिळत नसल्याने रस्त्यावर उतरणे हाच पर्याय: योगेंद्र यादव

By भारत चव्हाण | Updated: November 2, 2022 13:55 IST

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीत बसून देशाचे संविधान तोडणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध सर्वसामान्यांची भारत जोडण्याची हाक देणारी यात्रा आहे, असे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकशाहीतील चारही स्तंभाकडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही तेंव्हा शेवटचा न्याय हा रस्त्यावर मिळतो. म्हणूनच आता जनतेने जात, धर्म, पक्ष विसरुन रस्त्यावर उतरले तरच देशातील सध्याची परिस्थिती बदलेल, अशा विश्वास ज्येष्ठ विचारवंत, शेतकरी नेते आणि स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी बुधवारी कोल्हापुरात बोलताना व्यक्त केला.

राहुल गांधी यांची सुरु असणारी ‘भारत जोडो यात्रा’ ही कोणा एक पक्षाची यात्रा नसून सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीत बसून देशाचे संविधान तोडणाऱ्या प्रवृत्ती विरुध्द सर्वसामान्य जनेतेची भारत जोडण्याची हाक देणारी यात्रा आहे. या यात्रेद्वारे उतरुन एकत्र लढूया, असे आवाहनही यादव यांनी यावेळी केले.

कॉग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या ‘नफरत छोडो, भारत जोडो’यात्रेला पाठींबा देण्याकरीता योगेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘समता भूमी कोल्हापूर ते नांदेड’ अशा दहा दिवसांच्या जनसंवाद यात्रेचा प्रारंभ बुधवारी ऐतिहासिक बिंदू चौकातून झाला. त्यानंतर पहिली सभा शाहू स्मारक भवनात झाली, त्यावेळी यादव मार्गदर्शन करत होते. डाव्या चळवळीत काम करणारे अनेक कार्यकर्ते या जनसंवाद यात्रेत तसेच सभेत सहभागी झाले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दिलीप पवार होते.

देशात जेंव्हा कधी असाधारण परिस्थिती येते, तेंव्हा सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांवर तसेच जनतेवर असाधारण काम करण्याची वेळ येते. सध्या देशाचे संविधान तोडण्याचे, लोकशाही मुल्ये उद्धवस्त करण्याचे, गांधीचा देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे. तीन हजार वर्षाचा देशाचा इतिहास गाडण्याचे प्रयत्न सत्तेत बसलेल्या भाजप तसेच ‘आरएसएस’कडून होत आहे. म्हणूनच जनतेने एकत्रपणे रस्त्यावर उतरुन संविधानाचे रक्षण करावे लागणार आहे, असे यादव म्हणाले.

लोकशाहीत चारही स्तंभाकडून जनतेला न्याय मिळत नाही. जो अन्यायाविरोधात आवाज उठवतो त्याच्या मागे ईडी, सीबीआय लावले जाते. कारागृहात टाकले जाते. हा सरकारी दहशतवाद आहे. एकीकडे सत्ताधिशांच्या विरोधात बोलले की कारवाई केली जाते, पण देशातील मुस्लीमांविरोधात बोलले तरी काहीच कारवाई केली जात नाही. म्हणूनच आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागणार आहे. एकत्रितपणे लढलो तर त्याच यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी भरत रसाळे, बाबासो नदाफ यांनी जनसंवाद यात्रेची माहिती सांगितली. दिलीप पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. तर बाबासाहेब देवकर यांनी आभार मानले. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, व्यंकाप्पा भोसले, सुभाष लोमटे, आर. के. पोवार, भरत लाटकर, सचिन चव्हाण, दुर्वास कदम,शारंगधर देशमुख सतिश कांबळे, रघुनाथ कांबळे उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kolhapurकोल्हापूरYogendra Yadavयोगेंद्र यादव