शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकशाही’त न्याय मिळत नसल्याने रस्त्यावर उतरणे हाच पर्याय: योगेंद्र यादव

By भारत चव्हाण | Updated: November 2, 2022 13:55 IST

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीत बसून देशाचे संविधान तोडणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध सर्वसामान्यांची भारत जोडण्याची हाक देणारी यात्रा आहे, असे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकशाहीतील चारही स्तंभाकडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही तेंव्हा शेवटचा न्याय हा रस्त्यावर मिळतो. म्हणूनच आता जनतेने जात, धर्म, पक्ष विसरुन रस्त्यावर उतरले तरच देशातील सध्याची परिस्थिती बदलेल, अशा विश्वास ज्येष्ठ विचारवंत, शेतकरी नेते आणि स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी बुधवारी कोल्हापुरात बोलताना व्यक्त केला.

राहुल गांधी यांची सुरु असणारी ‘भारत जोडो यात्रा’ ही कोणा एक पक्षाची यात्रा नसून सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीत बसून देशाचे संविधान तोडणाऱ्या प्रवृत्ती विरुध्द सर्वसामान्य जनेतेची भारत जोडण्याची हाक देणारी यात्रा आहे. या यात्रेद्वारे उतरुन एकत्र लढूया, असे आवाहनही यादव यांनी यावेळी केले.

कॉग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या ‘नफरत छोडो, भारत जोडो’यात्रेला पाठींबा देण्याकरीता योगेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘समता भूमी कोल्हापूर ते नांदेड’ अशा दहा दिवसांच्या जनसंवाद यात्रेचा प्रारंभ बुधवारी ऐतिहासिक बिंदू चौकातून झाला. त्यानंतर पहिली सभा शाहू स्मारक भवनात झाली, त्यावेळी यादव मार्गदर्शन करत होते. डाव्या चळवळीत काम करणारे अनेक कार्यकर्ते या जनसंवाद यात्रेत तसेच सभेत सहभागी झाले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी दिलीप पवार होते.

देशात जेंव्हा कधी असाधारण परिस्थिती येते, तेंव्हा सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांवर तसेच जनतेवर असाधारण काम करण्याची वेळ येते. सध्या देशाचे संविधान तोडण्याचे, लोकशाही मुल्ये उद्धवस्त करण्याचे, गांधीचा देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे. तीन हजार वर्षाचा देशाचा इतिहास गाडण्याचे प्रयत्न सत्तेत बसलेल्या भाजप तसेच ‘आरएसएस’कडून होत आहे. म्हणूनच जनतेने एकत्रपणे रस्त्यावर उतरुन संविधानाचे रक्षण करावे लागणार आहे, असे यादव म्हणाले.

लोकशाहीत चारही स्तंभाकडून जनतेला न्याय मिळत नाही. जो अन्यायाविरोधात आवाज उठवतो त्याच्या मागे ईडी, सीबीआय लावले जाते. कारागृहात टाकले जाते. हा सरकारी दहशतवाद आहे. एकीकडे सत्ताधिशांच्या विरोधात बोलले की कारवाई केली जाते, पण देशातील मुस्लीमांविरोधात बोलले तरी काहीच कारवाई केली जात नाही. म्हणूनच आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्यावी लागणार आहे. एकत्रितपणे लढलो तर त्याच यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी भरत रसाळे, बाबासो नदाफ यांनी जनसंवाद यात्रेची माहिती सांगितली. दिलीप पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. तर बाबासाहेब देवकर यांनी आभार मानले. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, व्यंकाप्पा भोसले, सुभाष लोमटे, आर. के. पोवार, भरत लाटकर, सचिन चव्हाण, दुर्वास कदम,शारंगधर देशमुख सतिश कांबळे, रघुनाथ कांबळे उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kolhapurकोल्हापूरYogendra Yadavयोगेंद्र यादव