शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CoronaVirus In Kolhapur : माझी मम्मा कुठं आहे हो, मला दाखवा; छोट्याची हृदय हेलावणारी विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 10:51 IST

CoronaVirus In Kolhapur : छोटी मृन्मयी अवघ्या चार वर्षांची आहे. आईशिवाय एक क्षण तिचा कधी गेला नाही. गेले दोन दिवस तिने बाबांसह सर्वांना भंडावून सोडले आहे. ती एकच विचारणा करते आहे, माझी मम्मा कुठे आहे हो, मला दाखवा.. या तिच्या प्रश्नाचे उत्तर आज कुणाकडेच नाही. कारण तिच्या मम्माला क्रूर नियतीने हिरावून नेले आहे. कोरोना काळ बनून आला व एक उमलते आयुष्य तो कुस्करून गेला. कुणाचेही मन गलबलून टाकावी अशी ही घटना आरे (ता. करवीर) येथे घडली.

ठळक मुद्देमाझी मम्मा कुठं आहे हो, मला दाखवा; छोट्याची हृदय हेलावणारी विचारणा वयाच्या तिशीतच उमलते आयुष्य कोमेजले

कोल्हापूर : छोटी मृन्मयी अवघ्या चार वर्षांची आहे. आईशिवाय एक क्षण तिचा कधी गेला नाही. गेले दोन दिवस तिने बाबांसह सर्वांना भंडावून सोडले आहे. ती एकच विचारणा करते आहे, माझी मम्मा कुठे आहे हो, मला दाखवा.. या तिच्या प्रश्नाचे उत्तर आज कुणाकडेच नाही. कारण तिच्या मम्माला क्रूर नियतीने हिरावून नेले आहे. कोरोना काळ बनून आला व एक उमलते आयुष्य तो कुस्करून गेला. कुणाचेही मन गलबलून टाकावी अशी ही घटना आरे (ता. करवीर) येथे घडली.कोरोनाचा संसर्ग तरुणांना तितकासा धोकादायक नाही हा समज खोटा ठरवणारी ही घटना आहे. ऋतुजा शैलेश पाटील (वय ३०, रा. आरे, ता. करवीर) यांचे कोरोनामुळे सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये निधन झाले. ऋतुजा ही दत्त आसुर्ले-पोर्ले कारखान्याचे संस्थापक संचालक असलेले दिवंगत दिनकर बळवंत पाटील (रा. आकुर्डे, ता. पन्हाळा) यांची नात व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांची नात्याने भाची. परंतु, त्यांनी तिला मुलीसारखे वाढवलेलं.. तिचे लग्न २०१४ ला आरे (ता. करवीर) येथील शैलेश पाटील यांच्याशी झाले.

गावचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांचा तो मुलगा. एम.टेक झालेला. त्याला दोन वर्षांपूर्वी अदानी ग्रुपमध्ये अहमदाबादला नोकरी मिळाली. एक कुटुंब सुखाने डोलू लागलं. चार वर्षांपूर्वी त्यांना कन्या झाली. सगळे कसे आनंदात आयुष्य चालले होते. एप्रिलमध्ये कोरोनाच्या लाटेत शैलेशला प्रथम संसर्ग झाला. त्याने ऋतुजाचीही तपासणी करून घेतली.

ती पॉझिटिव्ह आली. परंतु, प्रकृती एकदम चांगली होती. तपासण्या, औषधोपचार व्यवस्थित सुरू होते. गेल्या शनिवारपासून तिला श्वास घ्यायला जास्त त्रास सुरू झाला. रविवारी सायंकाळी ती फोनवर कुटुंबीयांशी बोलली. परंतु, रात्रीत असे काय घडले आणि सोमवारी (दि. ३ मे) सकाळी तरी सगळं संपले. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. तिथेच अंत्यसंस्कार करून बुधवारी आरे येथे रक्षाविसर्जन करण्यात आले. सुट्टीला येतो असे सांगून गेलेली ऋतुजा आता न परतीच्या वाटेने निघून गेली. खरंच नियतीही इतकी निष्ठूर का वागत असेल..? 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर