शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

CoronaVirus In Kolhapur : माझी मम्मा कुठं आहे हो, मला दाखवा; छोट्याची हृदय हेलावणारी विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 10:51 IST

CoronaVirus In Kolhapur : छोटी मृन्मयी अवघ्या चार वर्षांची आहे. आईशिवाय एक क्षण तिचा कधी गेला नाही. गेले दोन दिवस तिने बाबांसह सर्वांना भंडावून सोडले आहे. ती एकच विचारणा करते आहे, माझी मम्मा कुठे आहे हो, मला दाखवा.. या तिच्या प्रश्नाचे उत्तर आज कुणाकडेच नाही. कारण तिच्या मम्माला क्रूर नियतीने हिरावून नेले आहे. कोरोना काळ बनून आला व एक उमलते आयुष्य तो कुस्करून गेला. कुणाचेही मन गलबलून टाकावी अशी ही घटना आरे (ता. करवीर) येथे घडली.

ठळक मुद्देमाझी मम्मा कुठं आहे हो, मला दाखवा; छोट्याची हृदय हेलावणारी विचारणा वयाच्या तिशीतच उमलते आयुष्य कोमेजले

कोल्हापूर : छोटी मृन्मयी अवघ्या चार वर्षांची आहे. आईशिवाय एक क्षण तिचा कधी गेला नाही. गेले दोन दिवस तिने बाबांसह सर्वांना भंडावून सोडले आहे. ती एकच विचारणा करते आहे, माझी मम्मा कुठे आहे हो, मला दाखवा.. या तिच्या प्रश्नाचे उत्तर आज कुणाकडेच नाही. कारण तिच्या मम्माला क्रूर नियतीने हिरावून नेले आहे. कोरोना काळ बनून आला व एक उमलते आयुष्य तो कुस्करून गेला. कुणाचेही मन गलबलून टाकावी अशी ही घटना आरे (ता. करवीर) येथे घडली.कोरोनाचा संसर्ग तरुणांना तितकासा धोकादायक नाही हा समज खोटा ठरवणारी ही घटना आहे. ऋतुजा शैलेश पाटील (वय ३०, रा. आरे, ता. करवीर) यांचे कोरोनामुळे सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये निधन झाले. ऋतुजा ही दत्त आसुर्ले-पोर्ले कारखान्याचे संस्थापक संचालक असलेले दिवंगत दिनकर बळवंत पाटील (रा. आकुर्डे, ता. पन्हाळा) यांची नात व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांची नात्याने भाची. परंतु, त्यांनी तिला मुलीसारखे वाढवलेलं.. तिचे लग्न २०१४ ला आरे (ता. करवीर) येथील शैलेश पाटील यांच्याशी झाले.

गावचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांचा तो मुलगा. एम.टेक झालेला. त्याला दोन वर्षांपूर्वी अदानी ग्रुपमध्ये अहमदाबादला नोकरी मिळाली. एक कुटुंब सुखाने डोलू लागलं. चार वर्षांपूर्वी त्यांना कन्या झाली. सगळे कसे आनंदात आयुष्य चालले होते. एप्रिलमध्ये कोरोनाच्या लाटेत शैलेशला प्रथम संसर्ग झाला. त्याने ऋतुजाचीही तपासणी करून घेतली.

ती पॉझिटिव्ह आली. परंतु, प्रकृती एकदम चांगली होती. तपासण्या, औषधोपचार व्यवस्थित सुरू होते. गेल्या शनिवारपासून तिला श्वास घ्यायला जास्त त्रास सुरू झाला. रविवारी सायंकाळी ती फोनवर कुटुंबीयांशी बोलली. परंतु, रात्रीत असे काय घडले आणि सोमवारी (दि. ३ मे) सकाळी तरी सगळं संपले. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. तिथेच अंत्यसंस्कार करून बुधवारी आरे येथे रक्षाविसर्जन करण्यात आले. सुट्टीला येतो असे सांगून गेलेली ऋतुजा आता न परतीच्या वाटेने निघून गेली. खरंच नियतीही इतकी निष्ठूर का वागत असेल..? 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर