शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

होय, शिवसेनेसोबत युतीसाठी भाजपा अगतिक : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 18:42 IST

होय, शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपा अगतिक आहे. कारण युती नाही झाली तर राज्यात पुन्हा काँग्रेसचा विजय होईल अशी भीती महसूलमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

ठळक मुद्देहोय, शिवसेनेसोबत युतीसाठी भाजप अगतिक : चंद्रकांत पाटीलयुती नाही झाली तर काँग्रेसचा विजय  

कोल्हापूर : होय, शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपा अगतिक आहे. कारण युती नाही झाली तर राज्यात पुन्हा काँग्रेसचा विजय होईल, अशी भीती महसूलमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आमची अगतिकता महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. सर्वसामान्य माणसाच्या सुखासाठी ही युती होणे आवश्यक आहे. काँग्रेसचे सरकार आले तर महाराष्ट्रात पुन्हा काय होईल, याचा अनुभव जनतेने घेतला आहेच, परंतु तरीही शिवसेनेला युती करायची नसेल तर ‘इटस ओके..!’ जे व्हायचे ते होईल त्याला आम्ही घाबरत नाही, असाही इशारा पाटील यांनी दिला.केंद्रातील भाजपा सरकारच्या चार वर्षातील कामगिरीची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद झाली. पालघरमध्ये सत्तेतील या दोन पक्षांत इतका टोकाचा संघर्ष सुरु असल्याने राज्यात पुन्हा युती होण्याची शक्यता आहे का असे विचारता मंत्री पाटील म्हणाले,‘तुम्ही युती तुटली म्हणता परंतु सत्तेत आल्यापासून गेल्या चार वर्षात आमची युती होती कुठे..? आम्ही एकही निवडणूक एकत्र लढलेली नाही.

(...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील)

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणूकीमुळे दोन पक्षांत जास्त कटूता निर्माण झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खालच्या पातळीवर येऊन राजकारण केले. श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीचा विषय हा दोन पक्षांतील कौटुंबिक प्रश्न  होता. वनगा कुटुंबात गेली चाळीस वर्षे सत्तेची पदे आहेत.

श्रीनिवास वनगा यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत. संघामुळेच त्यांचे शिक्षण झाले. इतके उपकार असतानाही ते आपल्यावर अन्याय झाला म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे रडत गेले. ठाकरे घराण्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून एखाद्याला उचलून आणून न्यायनिवाडा करण्याची एक परंपरा आहे. कुणावरही अन्याय झाला तर ते त्याचा निकाल त्यांच्या पद्धतीने लावतात. परंतु हा विषय दोन पक्षांशी संबंधित होता. वनगा कुटुंबात मुलास उमेदवारी द्यायची की सुनेला एवढाच प्रश्न होता.

वनगा त्यांच्याकडे न्याय मागायला गेल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून मुलग्यास उमेदवारी द्या असे सांगितले असते तरी हा प्रश्र्न मिटला असता. परंतू त्यांनी फिर्याद ऐकून घेवून थेट निकालच देवून टाकला. शिवसेनेला वनगा परत भाजपकडे जातील याची भिती होती त्यामुळेच त्यांना व त्यांच्या आईलाही शिवसेनेने दोन दिवस गायब केले होते.’

चोरलेली खुर्ची आणि शिवसेना..उद्धव ठाकरे यांनी मैत्रीत राजकारण आणल्याची टीका करून मंत्री पाटील म्हणाले,‘शिवसेनेने केलेले राजकारण मनाला लागणारे आहे. दुसऱ्याच्या घरातील खुर्ची उचलून नेता आणि ती माझीच असल्याचा हक्क सांगण्यातला हा प्रकार आहे. शिवसेनेच्या कृत्याचा पक्षावर आघात झाला. त्यामुळेच मुख्यमंत्रीही त्वेषाने या निवडणूकीत उतरले आहेत.’ 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर