शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष; यावर्षीही परिस्थिती तशीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:17 IST

आरटीईअंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये इयत्ता पहिलीमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. गेल्यावर्षी कोल्हापूर ...

आरटीईअंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये इयत्ता पहिलीमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ३४५ शाळांमध्ये १८६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद करण्यात आल्या. प्रत्यक्षात वर्ग भरण्याऐवजी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेटची सुविधा होती. त्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहिले. पण, अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठीची साधने उपलब्ध नव्हती. त्यांचे गेले शैक्षणिक वर्ष अभ्यासाविना गेले. जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. जुलैमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शाळा प्रत्यक्षात भरणार नाहीत. ऑनलाईन शिक्षणच सुरू राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठीची साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे यंदाचे वर्षही अभ्यासविना जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासन, सामाजिक संस्थांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारा स्मार्टफोन, डाटा उपलब्धतेसाठी मदतीचा हात देण्याची गरज आहे.

पॉंईटर्स

आरटीईअंतर्गत जिल्ह्यात किती शाळांची नोंदणी : ३४५

किती अर्ज आले : २५००

किती जणांना प्रवेश : १८६०

गेले वर्ष वाया गेले!

कोरोनामुळे वर्ग प्रत्यक्षात भरले नसल्याने ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. त्याद्वारे शिक्षणासाठी थोडाफार दिलासा मिळाला. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची परिमाणकारकता वाढवावी.

-गौतम कांबळे, कळंबा

यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने आरटीईतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे. त्यामध्ये सुधारणा व्हावी. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजेल अशा भाषेत शिक्षण द्यावे.

- हितेश नलावडे, कागल.

कोरोनामुळे गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. यावर्षीही याच पद्धतीने शिक्षण मिळणार आहे. त्यादृष्टीने पालकांनी तयारी करावी.

-अभिजित कुंभार, उजळाईवाडी.

गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी साधनेही द्यायला हवीत

गरीब कुटुंबांतील मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध होत नाहीत. अशा विद्यार्थ्यांची गेल्यावर्षी अडचण झाली. ही अडचण दूर करण्यासाठी अशा मुलांना स्मार्टफोन, डाटा, आदी साधने द्यायला हवीत. त्यादृष्टीने शासन, शाळा व्यवस्थापन समिती आणि सामाजिक संस्थांनी समन्वयातून नियोजन करावे. शाळा व्यवस्थापन समितीने अशा गरजू गरीब विद्यार्थ्यांची नावे निश्चित करून त्यांना मदतीचा हात देण्याचे काम करावे, अशी मागणी उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी केली.

प्रतिक्रिया

आरटीईची यावर्षीची प्रवेश प्रक्रिया उद्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्यात यावे, अशी सूचना शाळांना करण्यात येणार आहे.

-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.

===Photopath===

100621\10kol_3_10062021_5.jpg

===Caption===

डमी (१००६२०२१-कोल-स्टार ७९८)