शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

अभ्यासाविना गेले गरीब विद्यार्थ्यांचे वर्ष; यावर्षीही परिस्थिती तशीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:17 IST

आरटीईअंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये इयत्ता पहिलीमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. गेल्यावर्षी कोल्हापूर ...

आरटीईअंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये इयत्ता पहिलीमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ३४५ शाळांमध्ये १८६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद करण्यात आल्या. प्रत्यक्षात वर्ग भरण्याऐवजी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेटची सुविधा होती. त्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहिले. पण, अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठीची साधने उपलब्ध नव्हती. त्यांचे गेले शैक्षणिक वर्ष अभ्यासाविना गेले. जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. जुलैमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शाळा प्रत्यक्षात भरणार नाहीत. ऑनलाईन शिक्षणच सुरू राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठीची साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे यंदाचे वर्षही अभ्यासविना जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासन, सामाजिक संस्थांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारा स्मार्टफोन, डाटा उपलब्धतेसाठी मदतीचा हात देण्याची गरज आहे.

पॉंईटर्स

आरटीईअंतर्गत जिल्ह्यात किती शाळांची नोंदणी : ३४५

किती अर्ज आले : २५००

किती जणांना प्रवेश : १८६०

गेले वर्ष वाया गेले!

कोरोनामुळे वर्ग प्रत्यक्षात भरले नसल्याने ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. त्याद्वारे शिक्षणासाठी थोडाफार दिलासा मिळाला. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची परिमाणकारकता वाढवावी.

-गौतम कांबळे, कळंबा

यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने आरटीईतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे. त्यामध्ये सुधारणा व्हावी. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजेल अशा भाषेत शिक्षण द्यावे.

- हितेश नलावडे, कागल.

कोरोनामुळे गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. यावर्षीही याच पद्धतीने शिक्षण मिळणार आहे. त्यादृष्टीने पालकांनी तयारी करावी.

-अभिजित कुंभार, उजळाईवाडी.

गरीब मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी साधनेही द्यायला हवीत

गरीब कुटुंबांतील मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध होत नाहीत. अशा विद्यार्थ्यांची गेल्यावर्षी अडचण झाली. ही अडचण दूर करण्यासाठी अशा मुलांना स्मार्टफोन, डाटा, आदी साधने द्यायला हवीत. त्यादृष्टीने शासन, शाळा व्यवस्थापन समिती आणि सामाजिक संस्थांनी समन्वयातून नियोजन करावे. शाळा व्यवस्थापन समितीने अशा गरजू गरीब विद्यार्थ्यांची नावे निश्चित करून त्यांना मदतीचा हात देण्याचे काम करावे, अशी मागणी उमेद फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी केली.

प्रतिक्रिया

आरटीईची यावर्षीची प्रवेश प्रक्रिया उद्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्यात यावे, अशी सूचना शाळांना करण्यात येणार आहे.

-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.

===Photopath===

100621\10kol_3_10062021_5.jpg

===Caption===

डमी (१००६२०२१-कोल-स्टार ७९८)