शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा गळीत हंगाम पाच नोव्हेंबरपासूनच

By admin | Updated: October 20, 2016 01:26 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा : ‘एफआरपी’पेक्षा ५०० रुपये जादा देण्यास मदत हवी

कोल्हापूर : उसाचे उत्पादन कमी असल्यामुळे यंदाचा हंगाम डिसेंबरऐवजी ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास बुधवारी मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली. त्यामुळे राज्यभरातील कारखान्यांची धुराडी दिवाळीनंतर पेटण्याचा मार्ग मोकळा झाला. कारखाने उसाची शंभर टक्के एफआरपी एकरकमी देणारच; परंतु ऊस उत्पादकांना टनास जादा ५०० रुपये देण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी, अशी मागणी कारखानदारांच्यावतीने बैठकीत करण्यात आली.मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात दुपारी सव्वादोन वाजता सुमारे अर्धा तास ही बैठक झाली. त्यास सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार अजितदादा पवार, आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर, खासदार धनंजय महाडिक, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, भारत भालके, साखर आयुक्त विपीन शर्मा, सहकार सचिव एस. एस. संधू, आदी मान्यवर उपस्थित होते. राज्याचा प्रतिवर्षी हंगाम एक आॅक्टोबरपासून सुरू होतो; परंतु यंदा दुष्काळामुळेउत्पादनच कमी असल्यामुळे हंगाम आॅक्टोबरऐवजी नोव्हेंबरपासून सुरू व्हावा, अशी साखर कारखानदारीची मागणी होती; परंतु राज्य शासनाच्या मंत्री समितीने एक डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली. कर्नाटकातील हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने आधीच कमी असलेल्या उसाची पळवापळवी होईल म्हणून महाराष्ट्रातही हंगाम नोव्हेंबरमध्येच सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी साखर कारखानदार व शेतकरी संघटनांच्याकडूनही झाली होती. त्यामुळे यंदाच प्रथमच राज्य शासनाला दुसऱ्यांदा मंत्री समितीची बैठक घ्यावी लागली. त्यामध्ये हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले. राज्याची प्रतिदिन गाळप क्षमता पाच लाख ६० हजारांपर्यंत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ४५० लाख टन उसाचे गाळप करायचे झाल्यासही १०० दिवस पुरेसे आहेत; परंतु कांही कारखान्यांचा यंदाचा हंगाम सरासरी ३० दिवसच चालू शकेल. पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखानेच १४० दिवसांपर्यंतच चालू शकतील. अलीकडील काही वर्षांत परतीचा पाऊस दिवाळीपर्यंत असतो शिवाय दिवाळी झाल्याशिवाय ऊसतोडणी मजूर येत नाहीत. यंदा दिवाळी आॅक्टोबरच्या अखेरीस आहे. साखरेचा उतारा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत चांगला असतो. त्याच्या अगोदर गाळपाची घाई केल्यास नुसतेच पाणी उकळत बसावे लागत असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. या सगळ्यांचा एकत्रित विचार करून हंगाम नोव्हेंबरमध्येच सुरू व्हावा, अशी कारखानदारांची मागणी होती.————-तीन कोटी टनांची तूटगतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात सुमारे तीन कोटी टनांची घट दिसते आहे. दुष्काळामुळे पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक काढले आणि जे होते त्याची पाण्याअभावी पुरेशी वाढ न झाल्याने हा फटका बसला आहे.————————-गतवर्षी राज्यात कारखान्यांनी ७४३ लाख टनांचे गाळप केले आहे. यंदाच्या हंगामात ऊसच कमी असल्यामुळे एकरकमी एफआरपी द्यायला कुणालाच अडचण येणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद २५ आॅक्टोबरला होत आहे. या संघटनेनेही एकरकमी ३ हजार पहिली उचलीची मागणी केली आहे. ——————————एफआरपी देतानाही फेसकोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्णांतील कारखानेवगळता उर्वरित महाराष्ट्रातील कारखान्यांना एकरकमी एफआरपी देतानाही तोंडाला फेस येणार आहे. कर्जाचे हप्ते व कमी होणारे गाळप ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत.—————————अशा झाल्या मागण्या..१) ‘एफआरपी’पेक्षा टनास ५०० देण्यासाठी शासनाने मदत करावी२) सहवीज प्रकल्पांतील वीज खरेदीचे करार तातडीने करावेत३) साखर साठा मर्यादेस दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी—————————-२०१५-१६ चा हंगामहंगाम घेतलेले कारखाने : १७७ऊस गाळप : ७४३.२८ लाख टनसाखर उत्पादन : ८४.०० लाख टनसरासरी साखर उतारा : ११.३१.————————————२०१६-१७ चे संभाव्य गाळपऊस गाळप : ४५० लाख टनसाखर उत्पादन : ५० लाख टनसरासरी हंगाम दिवस : ३० ते १४०.हंगाम घेणारे कारखाने : १६५‘लोकमत’ने आॅगस्टमध्येच दिले होते वृत्त यंदा राज्यातच उसाचे उत्पादन कमी असल्यामुळे यंदाचा हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सुरू व्हावा, अशी मागणी साखर कारखानदारांनी केली असून, राज्य शासनही तसाच निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे वृत्त ‘लोकमत’ने १० आॅगस्ट २०१६ च्या अंकात दिले होते. प्रत्यक्षात निर्णयही तसाच झाला आहे.