शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

एका वर्षात पावणेदोन लाख गाड्यांची भर

By admin | Updated: April 2, 2017 00:44 IST

दक्षिण महाराष्ट्रातील परिस्थिती : कोल्हापुरात एकूण १२ लाख ४४ हजार ७७७ वाहने

सचिन भोसले -- कोल्हापूर --वाढत्या स्पर्धेच्या युगात कामे झटपट होण्यासाठी प्रत्येकाकडे वाहन असणे आता गरजेचे बनले आहे. वाढती गरज व वाहनप्रेमामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, कऱ्हाड या चार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या अंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात वाहनांची संख्या २७ लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ लाख ७५ हजार ३२३ वाहनांची भर पडली आहे. गेल्या वर्षी या चार उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात २५ लाख २५ हजार १७६ वाहने होती. यंदा त्यात १ लाख ७५ हजार ३२३ वाहनांची भर पडली आहे. एकूण वाहनांमध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. २०१५-१६ या वर्षात ती १९ लाख ५१ हजार ६६८ इतकी होती; तर २०१६-१७ या वर्षात यात १ लाख ३८ हजार ९६२ दुचाकींची भर पडली आहे. त्यामुळे दुचाकींची संख्या २० लाख ९० हजार ६३०इतकी झाली आहे. २०१४-१५च्या तुलनेत ही वाढ कमी झाल्याचेमानले जात आहे; कारण ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. यामुळे क्रयशक्ती कमी होऊन त्याचा थेट परिणाम वाहनविक्रीवरही झाला. यात चारचाकींची संख्या ५ लाख ७३ हजार ५०८ होती. त्यात ३६ हजार ३६१ चारचाकींची नव्याने भर पडून आता ही संख्या ६ लाख ९ हजार ८६९ इतकी झाली आहे. यात बीएस-३ इंजिन असलेली ४००० हून अधिक वाहनांची नोंद नाही. कोल्हापूर प्रादेशिक परिवहनचे ४१०.९२ कोटी इतके उद्दिष्ट होते. ३१ मार्च अखेर २०१७ अखेरचे हे उद्दिष्ट विभागाने गाठले असून, यंदा ४६० कोटी ५ लाख ६६ हजार इतके शासनाच्या तिजोरीत महसुली रूपाने जमा केले आहेत. याशिवाय अंमलबजावणी पथकाने ३५.८ कोटी, तर सीमा तपासणी पथकाने २७ कोटी ३३ लाख ४५ हजार भर घातली आहे. - डॉ. डी. टी. पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर. फॅन्सी क्रमांकापोटी १४ कोटी विभाग रुपये कोल्हापूर ६ कोटी १६ लाख ८४ हजार सांगली३ कोटी ६४ लाख ७७७सातारा २ कोटी ९८ लाख ७६५कऱ्हाड१ कोटी ५४ लाख ९९ हजार. वाढत्या अपघातांमुळे युवावर्गाचे नुकसान होत आहे. यात विनाहेल्मेट, वाहन चालविताना मोबाईलचा वापर ही कारणे पुढे येऊ लागली आहेत. पालकांनी मुलांंचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्यांना वाहने द्यावीत. यात प्रथम ५० सीसी वाहन चालविण्यास द्यावे. १०० सीसी वाहन चालविण्याचे वय झाल्यानंतर त्याचाही परवाना काढावा. याबाबत कार्यालयातर्फे एप्रिलमध्ये तपासणी मोहीम घेण्यात येणार असल्याचे संकेतही प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून व परिवहन आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार अशा वाहनांची नोंदणी केली जाणार आहे. चेसीस क्रमांक, मालकाचे नाव, विमा पॉलिसी क्रमांक व नाव, मॉडेल क्रमांक यांची पडताळणी केली जाईल. जे वाहन निकषात बसेल अशाच वाहनांची नोंदणी केली जाणार आहे. विक्रेत्यांनी चुकीची माहिती दिल्यास कडक कारवाई केली जाईल असे पवार यांनी सांगितले.