शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

गणेशोत्सवावर यंदा ‘चायना’ मार्केटचे सावट

By admin | Updated: August 24, 2014 22:37 IST

स्वरूप बदलले : विद्युत रोषणाईसाठी आजकाल सर्रास चायना वस्तूंचा वापर

एजाज पटेल- फुणगूस --विदेशी वस्तूंचा भारतीय बाजारपेठेवरील प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. गणेशोत्सवही त्याला अपवाद ठरणार नाही, असे दिसू लागले आहे. गणेशोत्सवात करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईसाठी आता चायना मेड माळांची संगमेश्वर बाजारपेठेत चांगली चलती असून, हळूहळू अशा प्रकारच्या चायना मेडच्या इतर वस्तू येथील बाजारपेठ लवकरच काबीज करणार असे दिसू लागले आहे.परदेशातून मोठ्या प्रमाणावर माल येत असल्याने भारतीय कारागीर बेरोजगार होत चालल्याचे अनेक क्षेत्रात दिसून येत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावरही विदेशी वस्तूंचा प्रभाव असल्याचे दिसून येत असून रोषणाईसाठी चायनीज माळांना मोठी मागणी आहे. गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळापासून घरगुती स्वरुपात करण्यात येणाऱ्या सजावटीसाठी रोषणाई करण्यात येते. आतापर्यंत यासाठी देशी बनावटीच्या माळा वापरल्या जायच्या. परंतु आता त्यामध्ये फारसे काही नावीन्य राहिले नसल्याने गणेशभक्तांना ‘चायना मेड’ माळांचा मोळ पडू लागला आहे.या माळांच्या किमती कमी आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये विविधताही असल्याने संगमेश्वर बाजारपेठेत त्याना मागणी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. आज चायनीज माळांनाच बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असून, भारतीय तोरणांची मागणी घटली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येते.काही वर्षांपूर्वी गणेशोत्सव किंवा इतर उत्सवांमध्ये विद्युत रोषणाई करण्यासाठी महागडी भारतीय तोरणे लावण्याची फार हौस होती. मात्र, या रोषणाईच्या व्यापारावर चायनीज तोरणांनी आक्रमण केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून बाजारपेठेत चायनीज तोरणांची मागणी वाढत आहे. स्वस्त दरात मिळणारी ही तोरणे ३० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध असून, देशी बनावटीच्या माळांच्या तुलनेत त्या खूप स्वस्त आहेत.प्रकाशमान होणाऱ्या विविध फुलांच्या माळा, वेली, रंग बदलणारे बल्ब, झालरी, गोळे, कंदील पक्षांच्या आकाराचे दिवे, नाजूक नक्षीच्या माळा, पाण्याचे कारंजे, फळासारखे दिसणारे बल्ब हे अगदी कमी किमतीपासून बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या मालाची नो गॅरंटी असली तरीही या चायनीज तोरणांचा एक बल्ब केवळ २ ते ३ रुपयांना मिळतो. भारतीय विद्युत तोरणामध्ये वेगळेपणा नाही. त्याच त्याच आकारातील आणि तेच तेच रंग घेऊन ग्राहक कंटाळले आहेत. या माळा चायनीजपेक्षा महागड्याही ठरत आहेत. ३०० ते ३५० रुपयांमध्ये पन्नास बल्ब असल्याने तोरणांकडे ग्राहक पाठ फिरवत आहेत.सध्या चायना मार्केटने प्रत्येक वस्तूचे मार्केट मोठ्या प्रमाणावर व्यापले आहे. त्याचा प्रभाव गणपती उत्सवासाठीच्या वस्तू खरेदीवर पाहायला मिळत आहे. ( वार्ताहर)