शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

यंदा धुराडी १५ आॅक्टोबरपासून पेटणार

By admin | Updated: September 22, 2015 00:11 IST

साखर हंगामास पावसाची भीती : गुरुवारी मंत्री समितीची मुंबईत बैठक

विश्वास पाटील- कोल्हापूर  --आगामी साखर हंगामाचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीची बैठक गुरुवारी (दि. २४) सकाळी अकरा वाजता मुंबईत होत आहे. परतीचा पाऊस नाही झाला तर यंदाच्या हंगामातील कारखान्यांची धुराडी १५ आॅक्टोबरपासून पेटण्याची चिन्हे आहेत. मागील हंगामातील वाजवी आणि किफायतशीर किंमत (एफआरपी)अजून देता आलेली नाही, त्यामुळे पुढील हंगामातील ‘एफआरपी’कशी द्यायची या विवंचनेत कारखानदारी आहे.यंदाचा हंगाम सुरू होण्यास घसरलेले साखरेचे दर, ‘एफआरपी’आणि परतीचा पाऊस या तीन गोष्टी परिणामकारक ठरणाऱ्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता जास्त असल्याने पुढे पाणीटंचाई होऊन आलेले पीक वाळून जावू नये म्हणून त्या जिल्ह्यातील हंगाम एक आॅक्टोबरपासूनच सुरू करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांचाही तसाच प्रयत्न आहे. त्यानुसार कारखान्यांनी बॉयलर पेटविण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर विभागातील कारखाने १५ आॅक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदा घटस्थापना दि. १३ आॅक्टोबरला आहे. दसरा दि. २२ ला तर दिवाळी दि. १२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर येण्यात सणांचा अडथळा असतो. साधारणत: दिवाळी झाल्यावरच हे मजूर ऊसतोडणीसाठी येतात परंतु यंदा ऊस जास्त असल्याने हंगाम लांबला तर अडचणी वाढतील त्यामुळे दिवाळीच्या अगोदरच हंगाम सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. कोल्हापूरला अनंत चतुर्दशीनंतर अथवा दसऱ्याच्या सुमारास हमखास पाऊस पडतो तसा पाऊस झाल्यास हंगाम १५ आॅक्टोबरच्याही पुढे जाईल. पाऊस काय करतो आणि संघटनांची भूमिका काय राहते या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.केंद्र सरकारने एफआरपी देण्यासाठी सॉफ्ट लोन मंजूर केले आहे परंतु काही कारखान्यांचे नेटवर्थ उणे आहे. बँकेच्या कर्जाच्या निकषांमध्ये काही कारखाने बसत नाहीत. शिवाय यंदा कर्ज काढून ‘एफआरपी’ दिली, पुढच्या हंगामाचे काय..? हंगाम सुरू केला आणि ‘एफआरपी’का दिली नाही म्हणून सरकारने बेड्या ठोकण्याची भाषा सुरू केली तर काय करणार, अशीही भीती कारखानदारांमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री गट समितीची बैठक गुरुवारी (दि.२४) मुंबईत होत आहे. त्यामध्ये यंदाच्या साखर हंगामाबाबत शासन म्हणून काय भूमिका घ्यावी यासंबंधीचे धोरण आम्ही ठरवू. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे बिले द्यावीच लागतील याबाबत सरकार ठाम आहे.- चंद्रकांतदादा पाटीलसहकार मंत्री.मंत्री समितीची बैठक झाल्यानंतर शेतकरी संघटनेचे हंगामाबाबतचे धोरण निश्चित करू. कारखानदार म्हणतात तेवढे पुढच्या वर्षीच्या हंगामाचे चित्र भयावह नाही. पाऊस झालाच नाही तर साखर साधारणत: एक नोव्हेंबरच्या सुमारास जयसिंगपूरची ऊस परिषद घेण्याचा विचार आहे. गतवर्षीही ती एक नोव्हेंबरलाच झाली होती.- राजू शेट्टी, खासदार.एफआरपीची देणी..आॅगस्टअखेर राज्यातील शेतकऱ्यांची देय रक्कम : २८०० कोटी‘सॉफ्ट लोन’मधून मिळणारी रक्कम : १८५० कोटीआतापर्यंत वाटप झालेली रक्कम : ६०० कोटी‘सॉफ्ट लोन’ देऊनही शिल्लक राहणारी रक्कम : १००० कोटीसंभाव्य गाळप २०१६कारखाने सुरू : १६०गाळप टन : ७५०साखर : ८५ लाख टन