शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

यंदा धुराडी १५ आॅक्टोबरपासून पेटणार

By admin | Updated: September 22, 2015 00:11 IST

साखर हंगामास पावसाची भीती : गुरुवारी मंत्री समितीची मुंबईत बैठक

विश्वास पाटील- कोल्हापूर  --आगामी साखर हंगामाचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीची बैठक गुरुवारी (दि. २४) सकाळी अकरा वाजता मुंबईत होत आहे. परतीचा पाऊस नाही झाला तर यंदाच्या हंगामातील कारखान्यांची धुराडी १५ आॅक्टोबरपासून पेटण्याची चिन्हे आहेत. मागील हंगामातील वाजवी आणि किफायतशीर किंमत (एफआरपी)अजून देता आलेली नाही, त्यामुळे पुढील हंगामातील ‘एफआरपी’कशी द्यायची या विवंचनेत कारखानदारी आहे.यंदाचा हंगाम सुरू होण्यास घसरलेले साखरेचे दर, ‘एफआरपी’आणि परतीचा पाऊस या तीन गोष्टी परिणामकारक ठरणाऱ्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता जास्त असल्याने पुढे पाणीटंचाई होऊन आलेले पीक वाळून जावू नये म्हणून त्या जिल्ह्यातील हंगाम एक आॅक्टोबरपासूनच सुरू करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांचाही तसाच प्रयत्न आहे. त्यानुसार कारखान्यांनी बॉयलर पेटविण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर विभागातील कारखाने १५ आॅक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदा घटस्थापना दि. १३ आॅक्टोबरला आहे. दसरा दि. २२ ला तर दिवाळी दि. १२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर येण्यात सणांचा अडथळा असतो. साधारणत: दिवाळी झाल्यावरच हे मजूर ऊसतोडणीसाठी येतात परंतु यंदा ऊस जास्त असल्याने हंगाम लांबला तर अडचणी वाढतील त्यामुळे दिवाळीच्या अगोदरच हंगाम सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. कोल्हापूरला अनंत चतुर्दशीनंतर अथवा दसऱ्याच्या सुमारास हमखास पाऊस पडतो तसा पाऊस झाल्यास हंगाम १५ आॅक्टोबरच्याही पुढे जाईल. पाऊस काय करतो आणि संघटनांची भूमिका काय राहते या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.केंद्र सरकारने एफआरपी देण्यासाठी सॉफ्ट लोन मंजूर केले आहे परंतु काही कारखान्यांचे नेटवर्थ उणे आहे. बँकेच्या कर्जाच्या निकषांमध्ये काही कारखाने बसत नाहीत. शिवाय यंदा कर्ज काढून ‘एफआरपी’ दिली, पुढच्या हंगामाचे काय..? हंगाम सुरू केला आणि ‘एफआरपी’का दिली नाही म्हणून सरकारने बेड्या ठोकण्याची भाषा सुरू केली तर काय करणार, अशीही भीती कारखानदारांमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री गट समितीची बैठक गुरुवारी (दि.२४) मुंबईत होत आहे. त्यामध्ये यंदाच्या साखर हंगामाबाबत शासन म्हणून काय भूमिका घ्यावी यासंबंधीचे धोरण आम्ही ठरवू. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे बिले द्यावीच लागतील याबाबत सरकार ठाम आहे.- चंद्रकांतदादा पाटीलसहकार मंत्री.मंत्री समितीची बैठक झाल्यानंतर शेतकरी संघटनेचे हंगामाबाबतचे धोरण निश्चित करू. कारखानदार म्हणतात तेवढे पुढच्या वर्षीच्या हंगामाचे चित्र भयावह नाही. पाऊस झालाच नाही तर साखर साधारणत: एक नोव्हेंबरच्या सुमारास जयसिंगपूरची ऊस परिषद घेण्याचा विचार आहे. गतवर्षीही ती एक नोव्हेंबरलाच झाली होती.- राजू शेट्टी, खासदार.एफआरपीची देणी..आॅगस्टअखेर राज्यातील शेतकऱ्यांची देय रक्कम : २८०० कोटी‘सॉफ्ट लोन’मधून मिळणारी रक्कम : १८५० कोटीआतापर्यंत वाटप झालेली रक्कम : ६०० कोटी‘सॉफ्ट लोन’ देऊनही शिल्लक राहणारी रक्कम : १००० कोटीसंभाव्य गाळप २०१६कारखाने सुरू : १६०गाळप टन : ७५०साखर : ८५ लाख टन