शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

ोल्हापूरच्या साखर उताऱ्यात यंदा घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:46 IST

उसाच्या वाढीचा फटका : विभागातील २९ कारखान्यांच्या हंगामाची सांगता

कोल्हापूर : उसाची कमी झालेली वाढ, अपरिपक्व उसाच्या गाळपामुळे यंदा कोल्हापूर विभागाच्या उताऱ्यात घट झाली आहे. आतापर्यंत ११.९८ टक्के उतारा आहे, विभागातील २९ कारखान्यांची धुराडी थंड झाली आहेत. त्यामुळे यात फारशी सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. साखर कारखान्यांचा यंदाचा हंगाम ऊस टंचाईमुळे तसा अडखळतच सुरू झाला. एफआरपी व १७५ रुपयांचा पहिला हप्ता जरी निश्चित झाला असला तरी कर्नाटकात बहुतांशी कारखान्यांनी प्रतिटन २७०० रुपये पहिली उचल दिल्याने सीमाभागातील कारखान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. कोल्हापूर व सांगली जिल्हा अंतर्गत उसाची पळवापळवी झालीच, पण कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात ऊस गेल्याने बहुतांशी कारखान्यांची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच धुराडी शांत झाली. पाणीटंचाईमुळे उसाची वाढ कमी झाली. उसाची पळवापळव होणार म्हणून मिळेल तो ऊस गाळप करण्याचा सपाटा कारखान्यांनी लावला होता. स्थानिक उसाची वाट न पाहता मिळेल त्या ठिकाणाहून ऊस आणल्याने ताज्या उसाचे गाळप झाले नाही. या सर्वाचा फटका उसाच्या उताऱ्यावर झाला. गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १ कोटी ४७ लाख टन उसाचे गाळप झाले होते. साधारणत: १२.६९ टक्के साखर उतारा राहिला. सांगलीमध्ये ८० लाख टन उसाचे गाळप होऊन १२.१० टक्के उतारा राखण्यात कारखान्यांना यश आले. यंदा कोल्हापुरात ९९ लाख ४१ हजार टन, तर सांगलीमध्ये ४८ लाख ६९ हजार टन असे १ कोटी ४७ लाख टनाचे गाळप झाले आहे. विभागाचा सरासरी उतारा हा ११.९८ टक्के राहिला आहे.