शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

यशवंत भालकर यांचा मनाला चटका लावणारा मृत्यू : जिंदादिल माणूस हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 17:41 IST

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून छातीत दुखत होते. बुधवारी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन ते तपासणी करून घेणार होते; परंतु तेवढाही धीर मृत्यूने धरला नाही. त्याआधीच नियतीने त्यांचे ‘पॅकअप’ केले. त्यांचा अचानक मृत्यू मनाला चटका लावून गेला. एक जिंदादिल माणूस हरपल्याची भावना समाजमनांतून व्यक्त झाली.

ठळक मुद्देयशवंत भालकर यांचा मनाला चटका लावणारा मृत्यू : जिंदादिल माणूस हरपलाडॉक्टरांच्या अ‍ॅपॉइंटमेंटआधीच मृत्यूने केले ‘पॅकअप’

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून छातीत दुखत होते. बुधवारी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन ते तपासणी करून घेणार होते; परंतु तेवढाही धीर मृत्यूने धरला नाही. त्याआधीच नियतीने त्यांचे ‘पॅकअप’ केले. त्यांचा अचानक मृत्यू मनाला चटका लावून गेला. एक जिंदादिल माणूस हरपल्याची भावना समाजमनांतून व्यक्त झाली.नेहमी हसत-खेळत असणारे, मंगळवारी (दि. १८) रात्री बारा वाजता सौंदत्ती यात्रेला निघालेल्या गल्लीतील भविकांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या भालकर यांना पहाटे मृत्यूने कवेत घेतले. त्यामुळे सकाळी जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी समजली, तेव्हा अनेकांना त्याचा मोठा धक्काच बसला.

भालकर हे ज्येष्ठ दिग्दर्शक होते. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान मोठे आणि मोलाचे असले तरी एक माणूस, सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख अधिक गडद होती; म्हणूनच त्यांच्या अंत्यसंस्कारांवेळी समाजाच्या सर्वच क्षेत्रांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणूस अचानक निघून जाणे म्हणजे काय असते, असेच काहीसे मरण भालकर यांना आले. त्यांची प्रकृती उत्तम होती. ते गेली अनेक वर्षे रोज सकाळी रंकाळ्यावर फिरायला जात असत. त्यांना यापूर्वी कधी हृदयविकाराचा त्रासही जाणवला नव्हता.

मात्र गेल्या चार दिवसांपूर्वी आजाराची व कदाचित मृत्यूचीही चाहूल त्यांना लागली होती. त्यांच्या एका निकटच्या स्नेह्याच्या मुलीचे लग्न ठरले होते. त्याची लग्नपत्रिका घेऊन ते भालकर यांना भेटले व लग्नाला यायचे आणि शेवटपर्यंत थांबायचे, असा आग्रह करून गेले; परंतु दुर्दैवाने त्यांचे दोन दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले. भालकर यांच्या मनाला त्याचा चटका बसला. त्यामुळे गेले दोन दिवस ते रंकाळ्यावर त्यांच्यासोबत फिरणाऱ्यांना सर्वांशी ‘चांगले वागा, माझ्याकडून कुणी दुखावले असेल तर मला माफ करा,’ असे बोलत होते. त्यांना कदाचित मृत्यूची चाहूल लागली होती की काय, अशी शंका व्यक्त झाली.दिग्दर्शकाइतकाच त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता सजग व धडपडणारा होता. मंगळवार पेठेसारख्या जुन्या कोल्हापुरात त्यांची जडणघडण झाली. त्यामुळे सर्वांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती होती. अलीकडील काही वर्षांत त्यांचा रंकाळ्यावर फारच जीव जडला होता. तिथे काही चुकीचे झालेले त्यांना अजिबात आवडायचे नाही. रंकाळ्याची पर्यावरण समृद्धी जोपासण्याची त्यांची धडपड होती. स्वत: लावलेल्या झाडांच्या सान्निध्यातच त्यांनी परवा एकसष्टी साजरी केली होती. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर