शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनापासून पूरग्रस्त गावांचा यल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:27 IST

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासह महापुराला कारणीभूत घटकांबाबत शासनस्तरावर तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी जिल्ह्यातील पूरग्रस्त एकवटले आहेत. स्वातंत्र्यदिनी ...

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासह महापुराला कारणीभूत घटकांबाबत शासनस्तरावर तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी जिल्ह्यातील पूरग्रस्त एकवटले आहेत. स्वातंत्र्यदिनी रविवारी झेंडावंदनानंतर भरणाऱ्या ग्रामसभेत जिल्हा व गावनिहाय पूरग्रस्त समित्या स्थापन करुन लढ्याचे रणशिंग फुंकले जाईल, असा निर्णय गुरुवारी कोल्हापुरात पूरग्रस्त समितींतर्गत भरलेल्या सरपंच मेळाव्यात झाला. सरकारने लक्ष दिले तर ठीक अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा मार्गही मोकळा ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.

महापुरामुळे शेती, व्यवसाय, प्रपंचाचे मोठे नुकसान होत आहे. येथून पुढे हे संकट दरवर्षी येण्याची शक्यता असल्याने त्यापासून वाचण्यासाठी म्हणून काॅंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षविरहीत पूरग्रस्त समिती स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. पुराचा मोठा फटका बसलेल्या १५०हून अधिक गावांतील सरपंचांना एकत्र बोलावून त्यांच्याच अध्यक्षतेखाली गुरुवारी दसरा चौकातील शहाजी कॉलेजमध्ये पहिली बैठक झाली. या बैठकीत ६०हून अधिक सरंपच व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी झेंडावंदन झाल्यानंतर सरपंचांनी पुढाकार घेऊन सर्वानुमते पूरग्रस्त गावनिहाय समिती स्थापन करण्याचे ठरले. जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय एक समिती स्थापन करावी आणि त्यानंतर जिल्ह्यातील एकत्रित पूरग्रस्त समिती काम करेल. पुराचा फटका बसलेल्या ग्रामीण जनतेबरोबरच शहरातील नागरिकांनीही प्रभागनिहाय समिती स्थापन करुन संलग्न राहिल्यास त्यांचेही प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेऊ, अशी ग्वाही बाजीराव खाडे यांनी दिली.

या सरपंच मेळाव्यातील चर्चेत सचिन चौगले (वडणगे), राजू मगदूम (माणगाव), एस. आर. पाटील (चिखली), प्रकाश रोटे (शिंगणापूर), भिकाजी पाटील (पाडळी बुद्रुक), सज्जन पाटील (महे), सदाशिव खाडे (सांगरुळ), संदीप पाटील (पाटपन्हाळा), शोभा पाटील (वाळोली), वसंत तोडकर (वाकरे), सिकंदर मुजावर (आंबेवाडी), सागर पाटील (देवाळे), सर्जेराव तिबिले (बीड), शंकरराव शिंदे (वाठार), सचिन पाटील (पाटेकरवाडी), सुदर्शन उपाध्ये (चिंचवाड) यांनी भाग घेतला.

चौकट

सरपंच म्हणतात, सांगा कसं जगायचं?

रहिवास क्षेत्रात पाणी येत असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण पुनर्वसन कुठे आणि कसे करणार, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने जागा दिली तरी घर बांधण्याइतपत आर्थिक कुवत राहिलेली नाही. पिकाऊ शेती पाण्याखाली जात असल्याने त्यावर केलेला खर्च आणि येणारे उत्पन्नही पाण्यात जात असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने सांगा कसं जगायचं, असा प्रश्न सरपंचांनी बैठकीत केला.

चौकट

सप्टेंबरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

महापुराला राष्ट्रीय, राज्य मार्गासह नदी, नाल्यांवरील पुलांचे भराव कारणीभूत असल्याने ते हटविण्यासाठी जलसंपदा व सार्वजनिक विभागाने सविस्तर अभ्यास अहवाल द्यावा. हा आलेला अहवाल जनतेसमोर मांडून पुढील उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी पूरग्रस्त समितीने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे ठरले.

फोटो: १२०८२०२१-कोल-पूरग्रस्त समिती ०१

फोटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी दुपारी पूरग्रस्त समितीने सरपंच मेळावा घेऊन महापुरानंतरच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

फोटो: १२०८२०२१-कोल-पूरग्रस्त समिती ०२

फोटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी दुपारी पूरग्रस्त समितीने घेतलेल्या सरपंच मेळाव्यात काॅंग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांनी मार्गदर्शन केले.