शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनापासून पूरग्रस्त गावांचा यल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:27 IST

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासह महापुराला कारणीभूत घटकांबाबत शासनस्तरावर तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी जिल्ह्यातील पूरग्रस्त एकवटले आहेत. स्वातंत्र्यदिनी ...

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासह महापुराला कारणीभूत घटकांबाबत शासनस्तरावर तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी जिल्ह्यातील पूरग्रस्त एकवटले आहेत. स्वातंत्र्यदिनी रविवारी झेंडावंदनानंतर भरणाऱ्या ग्रामसभेत जिल्हा व गावनिहाय पूरग्रस्त समित्या स्थापन करुन लढ्याचे रणशिंग फुंकले जाईल, असा निर्णय गुरुवारी कोल्हापुरात पूरग्रस्त समितींतर्गत भरलेल्या सरपंच मेळाव्यात झाला. सरकारने लक्ष दिले तर ठीक अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा मार्गही मोकळा ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.

महापुरामुळे शेती, व्यवसाय, प्रपंचाचे मोठे नुकसान होत आहे. येथून पुढे हे संकट दरवर्षी येण्याची शक्यता असल्याने त्यापासून वाचण्यासाठी म्हणून काॅंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षविरहीत पूरग्रस्त समिती स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. पुराचा मोठा फटका बसलेल्या १५०हून अधिक गावांतील सरपंचांना एकत्र बोलावून त्यांच्याच अध्यक्षतेखाली गुरुवारी दसरा चौकातील शहाजी कॉलेजमध्ये पहिली बैठक झाली. या बैठकीत ६०हून अधिक सरंपच व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी झेंडावंदन झाल्यानंतर सरपंचांनी पुढाकार घेऊन सर्वानुमते पूरग्रस्त गावनिहाय समिती स्थापन करण्याचे ठरले. जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय एक समिती स्थापन करावी आणि त्यानंतर जिल्ह्यातील एकत्रित पूरग्रस्त समिती काम करेल. पुराचा फटका बसलेल्या ग्रामीण जनतेबरोबरच शहरातील नागरिकांनीही प्रभागनिहाय समिती स्थापन करुन संलग्न राहिल्यास त्यांचेही प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेऊ, अशी ग्वाही बाजीराव खाडे यांनी दिली.

या सरपंच मेळाव्यातील चर्चेत सचिन चौगले (वडणगे), राजू मगदूम (माणगाव), एस. आर. पाटील (चिखली), प्रकाश रोटे (शिंगणापूर), भिकाजी पाटील (पाडळी बुद्रुक), सज्जन पाटील (महे), सदाशिव खाडे (सांगरुळ), संदीप पाटील (पाटपन्हाळा), शोभा पाटील (वाळोली), वसंत तोडकर (वाकरे), सिकंदर मुजावर (आंबेवाडी), सागर पाटील (देवाळे), सर्जेराव तिबिले (बीड), शंकरराव शिंदे (वाठार), सचिन पाटील (पाटेकरवाडी), सुदर्शन उपाध्ये (चिंचवाड) यांनी भाग घेतला.

चौकट

सरपंच म्हणतात, सांगा कसं जगायचं?

रहिवास क्षेत्रात पाणी येत असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण पुनर्वसन कुठे आणि कसे करणार, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने जागा दिली तरी घर बांधण्याइतपत आर्थिक कुवत राहिलेली नाही. पिकाऊ शेती पाण्याखाली जात असल्याने त्यावर केलेला खर्च आणि येणारे उत्पन्नही पाण्यात जात असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने सांगा कसं जगायचं, असा प्रश्न सरपंचांनी बैठकीत केला.

चौकट

सप्टेंबरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

महापुराला राष्ट्रीय, राज्य मार्गासह नदी, नाल्यांवरील पुलांचे भराव कारणीभूत असल्याने ते हटविण्यासाठी जलसंपदा व सार्वजनिक विभागाने सविस्तर अभ्यास अहवाल द्यावा. हा आलेला अहवाल जनतेसमोर मांडून पुढील उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी पूरग्रस्त समितीने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे ठरले.

फोटो: १२०८२०२१-कोल-पूरग्रस्त समिती ०१

फोटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी दुपारी पूरग्रस्त समितीने सरपंच मेळावा घेऊन महापुरानंतरच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

फोटो: १२०८२०२१-कोल-पूरग्रस्त समिती ०२

फोटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी दुपारी पूरग्रस्त समितीने घेतलेल्या सरपंच मेळाव्यात काॅंग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांनी मार्गदर्शन केले.