शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

यड्रावकरांचा वाटा; पण सदस्यांच्या निधीत घाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या राजकारणात फारसा संबंध नसलेले शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पंधराव्या वित्त ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या राजकारणात फारसा संबंध नसलेले शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पंधराव्या वित्त आयोगातील निधी देण्यास सदस्य नाखूष असल्याचे चित्र आहे. यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची हे सदस्य भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीतील एका सहकारी मंत्र्याला ‘डावातच’न घेण्यासाठी हे दोन मंत्री तयार होणार का हा प्रश्न आहे. यड्रावकरांना निधीतील वाटा दिला, तर सदस्यांना घाटा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत यड्रावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

वित्त आयोगाचा निधी भाजप-शिवसेना युतीच्या काळात १०० टक्के ग्रामपंचायतींना दिला जात होता. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन ८० टक्के निधी ग्रामपंचायतीला, १० टक्के पंचायत समितीला आणि १० टक्के जिल्हा परिषदेला अशी विभागणी केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांत याच निधीवरून वाद सुरू आहे. यातून गेल्यावर्षी प्रकरण न्यायालयातही गेले होते.

सत्तारूढ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि सदस्यांमध्येच एकवाक्यता नसल्याने अखेर निधी वाटपासाठी दोन्ही मंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे त्यांनी हा निधी वाटताना आपल्याकडील खास कामांसाठीही निधी राखून ठेवला. मुश्रीफ यांनी ग्रामविकास खात्याकडून आणि पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा नियोजनमधून सदस्यांना निधी दिल्यामुळे या दोन मंत्र्यांनी आपल्या कामांसाठी निधी घेतल्यानंतर कोणालाच काही बोलता येईना, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु सदस्यांना एक रुपयांचाही निधी आणून न देणारे आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांना वित्त आयोगातील निधी कशासाठी द्यायचा? असा प्रश्न आता सत्तारूढ सदस्यच उपस्थित करत आहेत. त्यांना जितका निधी दिला जाईल तितका निधी सदस्यांसाठी कमी पडणार आहे. त्यामुळे त्यांना निधीच्या लाभार्थीमधून वगळण्याची मागणी आहे.

चौकट

इंगवले यांनी उठवला होता आवाज

जिल्हा परिषद सदस्यांसाठी आलेल्या वित्त आयोगातील निधी मंत्री, खासदार, आमदार यांना देण्याची प्रथा पाडू नका, असे आवाहन सत्तारूढ पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी सर्वसाधारण सभेत केले होते. परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली कारभार सुरू आहे, त्यांनाच निधी नाही, कसे म्हणायचे असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर आहे.