शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
4
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
5
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
6
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
7
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
8
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
9
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
10
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
11
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
12
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
13
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
14
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
15
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
18
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
19
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
20
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता

यड्रावकरांचा वाटा; पण सदस्यांच्या निधीत घाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या राजकारणात फारसा संबंध नसलेले शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पंधराव्या वित्त ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या राजकारणात फारसा संबंध नसलेले शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पंधराव्या वित्त आयोगातील निधी देण्यास सदस्य नाखूष असल्याचे चित्र आहे. यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची हे सदस्य भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीतील एका सहकारी मंत्र्याला ‘डावातच’न घेण्यासाठी हे दोन मंत्री तयार होणार का हा प्रश्न आहे. यड्रावकरांना निधीतील वाटा दिला, तर सदस्यांना घाटा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत यड्रावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

वित्त आयोगाचा निधी भाजप-शिवसेना युतीच्या काळात १०० टक्के ग्रामपंचायतींना दिला जात होता. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन ८० टक्के निधी ग्रामपंचायतीला, १० टक्के पंचायत समितीला आणि १० टक्के जिल्हा परिषदेला अशी विभागणी केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांत याच निधीवरून वाद सुरू आहे. यातून गेल्यावर्षी प्रकरण न्यायालयातही गेले होते.

सत्तारूढ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि सदस्यांमध्येच एकवाक्यता नसल्याने अखेर निधी वाटपासाठी दोन्ही मंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे त्यांनी हा निधी वाटताना आपल्याकडील खास कामांसाठीही निधी राखून ठेवला. मुश्रीफ यांनी ग्रामविकास खात्याकडून आणि पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा नियोजनमधून सदस्यांना निधी दिल्यामुळे या दोन मंत्र्यांनी आपल्या कामांसाठी निधी घेतल्यानंतर कोणालाच काही बोलता येईना, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु सदस्यांना एक रुपयांचाही निधी आणून न देणारे आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांना वित्त आयोगातील निधी कशासाठी द्यायचा? असा प्रश्न आता सत्तारूढ सदस्यच उपस्थित करत आहेत. त्यांना जितका निधी दिला जाईल तितका निधी सदस्यांसाठी कमी पडणार आहे. त्यामुळे त्यांना निधीच्या लाभार्थीमधून वगळण्याची मागणी आहे.

चौकट

इंगवले यांनी उठवला होता आवाज

जिल्हा परिषद सदस्यांसाठी आलेल्या वित्त आयोगातील निधी मंत्री, खासदार, आमदार यांना देण्याची प्रथा पाडू नका, असे आवाहन सत्तारूढ पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी सर्वसाधारण सभेत केले होते. परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली कारभार सुरू आहे, त्यांनाच निधी नाही, कसे म्हणायचे असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर आहे.