शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

यड्रावकरांनी ‘विधानसभे’चे रणशिंग फुंकले : नेत्यांच्या पाठबळाने पक्षाला उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:37 IST

जयसिंगपूर : विराट शक्तिप्रदर्शनाने जयसिंगपूर येथे झालेल्या हल्लाबोल सभेच्या निमित्ताने डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे.

ठळक मुद्देगावागावांत केलेल्या बांधणीमुळेच सभेला उत्स्फूर्तपणे गर्दी, हल्लाबोलच्या निमित्ताने पहिली फेरी जिंकली

संदीप बावचे ।जयसिंगपूर : विराट शक्तिप्रदर्शनाने जयसिंगपूर येथे झालेल्या हल्लाबोल सभेच्या निमित्ताने डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर साडेतीन वर्षांच्या काळात त्यांनी केलेली तयारी या सभेच्या निमित्ताने दिसून आली. गावागावांत केलेल्या बांधणीमुळेच उत्स्फूर्तपणे या सभेला लोक आले. विक्रमसिंह मैदानावर झालेली गर्दी, शिवाय राष्ट्रवादीला ही जागा देण्यासाठी प्रयत्न करण्याची नेत्यांनी दिलेली कबुली त्यामुळे पहिली फेरी तरी यड्रावकर यांनी जिंकलेली आहे.

स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची खऱ्या अर्थाने धुरा डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी तालुक्यात सांभाळली आहे. सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर चौरंगी लढतीत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली. त्यानंतर झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ते निवडून आले आणि खºया अर्थाने त्यांना गुलाल लागला. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती, गोकुळ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अनेक पदापर्यंत पोहोचविले. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर डॉ. यड्रावकरांनी तालुक्यात यड्रावकर गटाची चांगली बांधणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप सरकारविरोधी पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने पक्षाची ताकद दाखविण्याची संधी यानिमित्ताने पुढे आल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांत गावागावांत पक्षाची केलेली बांधणी हल्लाबोल सभेच्या निमित्ताने गर्दीतून दिसून आली. मंगळवारी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विक्रमसिंह मैदानावर झालेल्या गर्दीने ही आगामी निवडणुकीत यड्रावकरांच्या बाजूने असल्याचे संकेत दिले.

हल्लाबोल सभेच्या निमित्ताने तालुक्यातील क्षारपड जमिनीबरोबरच ऊस उत्पादक त्याचबरोबर भाजीपाला पिकविणाºया शेतकºयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला. यड्रावकर यांनी तालुक्यात २० हजार एकर शेतजमीन क्षारपड बनली आहे. एकरी एक लाख रुपये खर्च केले तर ही जमीन पुन्हा उत्पादनाखाली येईल. यासाठी जिल्हा बँकेतून ११ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले. मात्र, सरकारने क्षारपड सुधारण्यासाठी सबसिडी दिली पाहिजे. भाजप सरकारने आजपर्यंत पोकळ आश्वासन दिले आहे. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी हल्लाबोल सभेला ही गर्दी जमल्याचे सांगून ही ताकद राष्ट्रवादीच्या पाठीमागे यापुढेही राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.दोन्ही काँग्रेसची आघाडीसा. रे. पाटील गट व यड्रावकर गट अशा दोन गटांच्या माध्यमातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तालुक्याच्या राजकारणात निर्णायक राहिली आहे. जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जयसिंगपूर नगरपालिका, आदी निवडणुकीत एकत्रितपणे दोन्ही पक्षाची ताकद दिसून आली आहे.यावेळची संधी सोडायची नाहीसभेच्या निमित्ताने येणाºया विधानसभा निवडणुकीत सत्ता बदल निश्चित होईल. स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांचे स्वप्न साकारण्यासाठी शिरोळ तालुक्यात राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस हिमालयाप्रमाणे उभी राहील. गेल्या दहा वर्षांत यड्रावकर यांनी जनतेसाठी काम केले आहे. त्यामुळे यावेळची संधी सोडायची नाही, असे पाठबळ नेत्यांनी सभेत दिल्यामुळे यड्रावकर गटाचा उत्साह दुणावला आहे. एकूणच हल्लाबोल सभेच्या निमित्ताने पहिली फेरी यड्रावकर यांनी जिंकलेली आहे, असेच म्हणावे लागेल.शाबासकीची थापहल्लाबोल सभेच्या निमित्ताने भाजप व शिवसेना पक्षांवर झालेली टीका व त्यातून सरकारविरोधी जनतेचा रोष नेत्यांनी बोलून दाखविला. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गावागावांत केलेली बांधणी या गर्दीच्या निमित्ताने दिसून आली. आगामी निवडणुकीसाठी नेत्यांनी दिलेली शाबासकीची थाप व सभेला जमलेली गर्दी यातून यड्रावकर गटाला उभारी देणारी ठरणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक