शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘दुय्यम निबंधक’मध्ये दस्तनोंदणी रेंगाळली-संगणक कर्मचारी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:00 IST

कोल्हापूर : पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचप्रकरणी सहाजणांवर कारवाई झाली असली तरीही जिल्ह्यातील सर्व १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत गेली १६ वर्षे

ठळक मुद्दे लाच प्रकरणाचा फटका; नागरिक दिवसभर ताटकळत

कोल्हापूर : पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचप्रकरणी सहाजणांवर कारवाई झाली असली तरीही जिल्ह्यातील सर्व १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत गेली १६ वर्षे ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत काम करणाऱ्या संगणक चालकांना त्याचा फटका बसला आहे. या संगणक चालकांना कामावरून अचानक कमी केल्याने कार्यालयातील दस्तनोंदणी प्रक्रिया रेंगाळली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दस्तनोंदणीसाठी येणाºयांना कार्यालयात दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिपत्याखालील कोल्हापूर शहरातील तीन आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरीय दुय्यम निबंधक कार्यालयात एक दुय्यम निबंधक अधिकारी, एक लिपिक, एक शिपाई यांसह दोन संगणक चालक व एक खासगी शिपाईवजा सहकारी असे सहा कर्मचारी कार्यरत आहेत. यांपैकी कॉम्प्युटर डाटा एंट्री आॅपरेटर या पदांची भरती शासनाच्या एस.एम. कॉम्युटर्स प्रा. लि., अहमदनगर कंपनीतर्फे ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत केली. २००२ पासून २०१५ अखेरपर्यंत हे सुमारे ३८ कर्मचारी शहरासह तालुकास्तर कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांना तीन ते चार हजार रुपये मानधन देण्यात येत होते; पण ‘बीओटी’चा करार संपल्यानंतरही हे सर्व संगणक चालक एप्रिल २०१८ अखेरपर्यंत दस्त नोंदणीधारकांची डाटा एंट्रीची कामे त्यांच्याकडून मिळणाऱ्या स्वखुशीवर करीत होते.

मात्र, पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयात २८ एप्रिलला लाच घेताना दुय्यम निबंधकांसह महिला लिपिक, शिपाई तसेच दोन संगणक चालक आणि एका खासगी व्यक्तीवर कारवाई झाली. कारवाईत संगणक चालक यांचा कार्यालयाशी काहीही संबंध नसल्याचे कारण पुढे केल्याने सर्वच कार्यालयांतील संगणक चालकांना फटका बसला असून, त्यांना १ मार्चपासून कामावर येण्यास प्रतिबंध केले. परिणामी, दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी प्रक्रियेवेळी ताटकळत बसावे लागते; पण आता चालकांची कपात केल्याने त्यांच्या दस्त स्कॅनसह इतर कामे आता शिपायाला करावी लागत आहेत. काही कार्यालयांत हे दस्त स्कॅनिंगचे काम पक्षकारांकडूनच केले जात आहे. कामाचा अतिरिक्त भार मोजक्याच कर्मचाºयांवर पडू लागला. त्यामुळे दस्तनोंदणीची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी पक्षकारांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे.सोळा वर्षांनंतरही आश्वासनचशासनाने कंपनीमार्फत २००२ पासून २०१५ पर्यंत जिल्ह्यातील १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत संगणक चालकांची भरती केली. या कर्मचाºयांना ‘सेतू’ कार्यालयातर्फे सेवेत घेण्याबाबत राज्य शासनाकडून आश्वासनावर ठेवले. यावर आधारित हे संगणक चालक सेवेत राहिले. आता अचानक त्यांना प्र्रतिबंध केल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. या कर्मचाºयांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमल महाडिक यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.दस्तनोंदणी रेंगाळलीकोल्हापूर शहरात असणाºया दुय्यम निबंधक वर्ग १ करवीर, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४ या कार्यालयांत रोज किमान ४० हून अधिक दस्त नोंदणी केले जात होते. आता संगणक चालकांची कपात केल्याने हे काम मंदावले असून, ते आता रोज १५ ते २० दस्त नोंदणीवर आले आहे. 

 

दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदीचे काम जबाबदारीचे असल्याने येथे अधिकृत कर्मचारीच हवेत. संगणक चालकांचा करार संपल्याने त्यांची कपात केली. दस्तनोंदणीचे काम सर्वच कार्यालयांत सुरळीत आहे. फक्त शिरोळ आणि हातकणंगले कार्यालयांत दस्तनोंदणीची कामे अधिक असल्याने त्यांचा भार पडत आहे.- सुंदर जाधव, जिल्हाधिकारी, मुद्रांक

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMONEYपैसा