शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘दुय्यम निबंधक’मध्ये दस्तनोंदणी रेंगाळली-संगणक कर्मचारी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:00 IST

कोल्हापूर : पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचप्रकरणी सहाजणांवर कारवाई झाली असली तरीही जिल्ह्यातील सर्व १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत गेली १६ वर्षे

ठळक मुद्दे लाच प्रकरणाचा फटका; नागरिक दिवसभर ताटकळत

कोल्हापूर : पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचप्रकरणी सहाजणांवर कारवाई झाली असली तरीही जिल्ह्यातील सर्व १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत गेली १६ वर्षे ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत काम करणाऱ्या संगणक चालकांना त्याचा फटका बसला आहे. या संगणक चालकांना कामावरून अचानक कमी केल्याने कार्यालयातील दस्तनोंदणी प्रक्रिया रेंगाळली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दस्तनोंदणीसाठी येणाºयांना कार्यालयात दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिपत्याखालील कोल्हापूर शहरातील तीन आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरीय दुय्यम निबंधक कार्यालयात एक दुय्यम निबंधक अधिकारी, एक लिपिक, एक शिपाई यांसह दोन संगणक चालक व एक खासगी शिपाईवजा सहकारी असे सहा कर्मचारी कार्यरत आहेत. यांपैकी कॉम्प्युटर डाटा एंट्री आॅपरेटर या पदांची भरती शासनाच्या एस.एम. कॉम्युटर्स प्रा. लि., अहमदनगर कंपनीतर्फे ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत केली. २००२ पासून २०१५ अखेरपर्यंत हे सुमारे ३८ कर्मचारी शहरासह तालुकास्तर कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांना तीन ते चार हजार रुपये मानधन देण्यात येत होते; पण ‘बीओटी’चा करार संपल्यानंतरही हे सर्व संगणक चालक एप्रिल २०१८ अखेरपर्यंत दस्त नोंदणीधारकांची डाटा एंट्रीची कामे त्यांच्याकडून मिळणाऱ्या स्वखुशीवर करीत होते.

मात्र, पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयात २८ एप्रिलला लाच घेताना दुय्यम निबंधकांसह महिला लिपिक, शिपाई तसेच दोन संगणक चालक आणि एका खासगी व्यक्तीवर कारवाई झाली. कारवाईत संगणक चालक यांचा कार्यालयाशी काहीही संबंध नसल्याचे कारण पुढे केल्याने सर्वच कार्यालयांतील संगणक चालकांना फटका बसला असून, त्यांना १ मार्चपासून कामावर येण्यास प्रतिबंध केले. परिणामी, दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी प्रक्रियेवेळी ताटकळत बसावे लागते; पण आता चालकांची कपात केल्याने त्यांच्या दस्त स्कॅनसह इतर कामे आता शिपायाला करावी लागत आहेत. काही कार्यालयांत हे दस्त स्कॅनिंगचे काम पक्षकारांकडूनच केले जात आहे. कामाचा अतिरिक्त भार मोजक्याच कर्मचाºयांवर पडू लागला. त्यामुळे दस्तनोंदणीची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी पक्षकारांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे.सोळा वर्षांनंतरही आश्वासनचशासनाने कंपनीमार्फत २००२ पासून २०१५ पर्यंत जिल्ह्यातील १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत संगणक चालकांची भरती केली. या कर्मचाºयांना ‘सेतू’ कार्यालयातर्फे सेवेत घेण्याबाबत राज्य शासनाकडून आश्वासनावर ठेवले. यावर आधारित हे संगणक चालक सेवेत राहिले. आता अचानक त्यांना प्र्रतिबंध केल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. या कर्मचाºयांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमल महाडिक यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.दस्तनोंदणी रेंगाळलीकोल्हापूर शहरात असणाºया दुय्यम निबंधक वर्ग १ करवीर, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४ या कार्यालयांत रोज किमान ४० हून अधिक दस्त नोंदणी केले जात होते. आता संगणक चालकांची कपात केल्याने हे काम मंदावले असून, ते आता रोज १५ ते २० दस्त नोंदणीवर आले आहे. 

 

दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदीचे काम जबाबदारीचे असल्याने येथे अधिकृत कर्मचारीच हवेत. संगणक चालकांचा करार संपल्याने त्यांची कपात केली. दस्तनोंदणीचे काम सर्वच कार्यालयांत सुरळीत आहे. फक्त शिरोळ आणि हातकणंगले कार्यालयांत दस्तनोंदणीची कामे अधिक असल्याने त्यांचा भार पडत आहे.- सुंदर जाधव, जिल्हाधिकारी, मुद्रांक

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMONEYपैसा