शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘दुय्यम निबंधक’मध्ये दस्तनोंदणी रेंगाळली-संगणक कर्मचारी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:00 IST

कोल्हापूर : पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचप्रकरणी सहाजणांवर कारवाई झाली असली तरीही जिल्ह्यातील सर्व १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत गेली १६ वर्षे

ठळक मुद्दे लाच प्रकरणाचा फटका; नागरिक दिवसभर ताटकळत

कोल्हापूर : पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाचप्रकरणी सहाजणांवर कारवाई झाली असली तरीही जिल्ह्यातील सर्व १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत गेली १६ वर्षे ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत काम करणाऱ्या संगणक चालकांना त्याचा फटका बसला आहे. या संगणक चालकांना कामावरून अचानक कमी केल्याने कार्यालयातील दस्तनोंदणी प्रक्रिया रेंगाळली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दस्तनोंदणीसाठी येणाºयांना कार्यालयात दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिपत्याखालील कोल्हापूर शहरातील तीन आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरीय दुय्यम निबंधक कार्यालयात एक दुय्यम निबंधक अधिकारी, एक लिपिक, एक शिपाई यांसह दोन संगणक चालक व एक खासगी शिपाईवजा सहकारी असे सहा कर्मचारी कार्यरत आहेत. यांपैकी कॉम्प्युटर डाटा एंट्री आॅपरेटर या पदांची भरती शासनाच्या एस.एम. कॉम्युटर्स प्रा. लि., अहमदनगर कंपनीतर्फे ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत केली. २००२ पासून २०१५ अखेरपर्यंत हे सुमारे ३८ कर्मचारी शहरासह तालुकास्तर कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांना तीन ते चार हजार रुपये मानधन देण्यात येत होते; पण ‘बीओटी’चा करार संपल्यानंतरही हे सर्व संगणक चालक एप्रिल २०१८ अखेरपर्यंत दस्त नोंदणीधारकांची डाटा एंट्रीची कामे त्यांच्याकडून मिळणाऱ्या स्वखुशीवर करीत होते.

मात्र, पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयात २८ एप्रिलला लाच घेताना दुय्यम निबंधकांसह महिला लिपिक, शिपाई तसेच दोन संगणक चालक आणि एका खासगी व्यक्तीवर कारवाई झाली. कारवाईत संगणक चालक यांचा कार्यालयाशी काहीही संबंध नसल्याचे कारण पुढे केल्याने सर्वच कार्यालयांतील संगणक चालकांना फटका बसला असून, त्यांना १ मार्चपासून कामावर येण्यास प्रतिबंध केले. परिणामी, दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी प्रक्रियेवेळी ताटकळत बसावे लागते; पण आता चालकांची कपात केल्याने त्यांच्या दस्त स्कॅनसह इतर कामे आता शिपायाला करावी लागत आहेत. काही कार्यालयांत हे दस्त स्कॅनिंगचे काम पक्षकारांकडूनच केले जात आहे. कामाचा अतिरिक्त भार मोजक्याच कर्मचाºयांवर पडू लागला. त्यामुळे दस्तनोंदणीची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी पक्षकारांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे.सोळा वर्षांनंतरही आश्वासनचशासनाने कंपनीमार्फत २००२ पासून २०१५ पर्यंत जिल्ह्यातील १४ दुय्यम निबंधक कार्यालयांत ‘बीओटी’ तत्त्वाअंतर्गत संगणक चालकांची भरती केली. या कर्मचाºयांना ‘सेतू’ कार्यालयातर्फे सेवेत घेण्याबाबत राज्य शासनाकडून आश्वासनावर ठेवले. यावर आधारित हे संगणक चालक सेवेत राहिले. आता अचानक त्यांना प्र्रतिबंध केल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. या कर्मचाºयांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमल महाडिक यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.दस्तनोंदणी रेंगाळलीकोल्हापूर शहरात असणाºया दुय्यम निबंधक वर्ग १ करवीर, वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४ या कार्यालयांत रोज किमान ४० हून अधिक दस्त नोंदणी केले जात होते. आता संगणक चालकांची कपात केल्याने हे काम मंदावले असून, ते आता रोज १५ ते २० दस्त नोंदणीवर आले आहे. 

 

दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदीचे काम जबाबदारीचे असल्याने येथे अधिकृत कर्मचारीच हवेत. संगणक चालकांचा करार संपल्याने त्यांची कपात केली. दस्तनोंदणीचे काम सर्वच कार्यालयांत सुरळीत आहे. फक्त शिरोळ आणि हातकणंगले कार्यालयांत दस्तनोंदणीची कामे अधिक असल्याने त्यांचा भार पडत आहे.- सुंदर जाधव, जिल्हाधिकारी, मुद्रांक

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMONEYपैसा